शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल वसुलीत १० तालुके माघारले

By admin | Updated: April 9, 2016 02:34 IST

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा गृहजिल्हा असलेल्या यवतमाळात महसूल वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात १६ पैकी १० तालुके अपयशी ठरले आहेत.

राज्यमंत्र्यांचा गृहजिल्हा : दुष्काळाचे सावट, गौण खनिजातून ७२ तर करमणूक करातून ८२ टक्के वसुली यवतमाळ : महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा गृहजिल्हा असलेल्या यवतमाळात महसूल वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात १६ पैकी १० तालुके अपयशी ठरले आहेत. ना. राठोड यांच्या विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यांनी मात्र १०० टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती केली आहे. महसूल राज्यमंत्र्यांचा गृहजिल्हा असल्याने यवतमाळ जिल्ह्याच्या महसूल वसुलीकडे संपूर्ण अमरावती विभागाचे लक्ष लागले होते. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात जिल्ह्याने ८४ कोटी ५० लाख रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करीत १०३.५१ टक्क्यांची वसुली करण्यात आली आहे. एकूण ८८ कोटी ३१ लाख २७ हजारांचा महसूल वर्षभरात वसूल करण्यात आला. महसूल वसुलीचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले असले तरी तालुक्यांची कामगिरी मात्र तेवढी समाधानकारक राहिलेली नाही. जिल्ह्यात १६ तालुके आहेत. त्यातील यवतमाळ, आर्णी, दारव्हा, नेर, दिग्रस आणि घाटंजी या सहाच तालुक्यांना आपले महसूल वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट पार करता आले. बाभूळगाव, पुसद, उमरखेड, महागाव, राळेगाव, कळंब, केळापूर, झरी, वणी आणि मारेगाव या तालुक्याची महसूल वसुलीची कामगिरी खालावली आहे. सर्वात कमी ५२ टक्के उद्दिष्ट पुसद तालुक्याने गाठले. अशीच काहीशी स्थिती महागाव, कळंब, मारेगाव या तालुक्यांची आहे. जिल्ह्याला गौण खनिजातून ७२ टक्के तर करमणूक करातून ८२ टक्के महसूल मिळाला. गौण खनिजातून ५८ कोटींचे उद्दीष्ट ठेवले असताना केवळ ४२ कोटी २७ लाखांचे उद्दिष्ट गाठता आले. करमणूक करातून ३ कोटी ८५ लाखांच्या उद्दिष्टांपैकी ३ कोटी १९ लाखांचीच वसुली होऊ शकली. महसूल राज्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघातील दारव्हा, नेर, दिग्रस या तीनही तालुक्यांनी उद्दिष्ट पूर्ण केले. दुष्काळाचा फटका शासनाच्या महसूल वसुलीवर दुष्काळाचे सावट दिसू लागले आहे. १६ पैकी केवळ सहा तालुक्यांची महसूल वसुली १०० टक्क्यावर होऊ शकली. उर्वरित १० तालुके १०० च्या आतच आहेत. कित्येक तालुक्यांना तर महसुलाची सत्तरीही गाठता आलेली नाही. यावर्षी संपूर्ण यवतमाळ जिल्हाच दुष्काळाचा सामना करतो आहे. जिल्ह्यातील तब्बल २ हजार ५३ गावे पीक पैसेवारी ५० पैश पेक्षा कमी निघाल्याने दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. परंतु अद्याप या गावांना शासनाकडून ‘दुष्काळी’ म्हणून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ प्रत्यक्ष मिळालेला नाही. शेतकऱ्यांना अद्यापही हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)