शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

महसूल, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या १५ फेब्रुवारीपूर्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 11:20 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या अनुषंगाने निवडणुकीशी संबंध येणाऱ्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या १५ फेब्रुवारीपूर्वी करण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीची प्रशासकीय तयारी ४ मार्चला निवडणूक कार्यक्रम जारी होण्याचा अंदाज

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या अनुषंगाने निवडणुकीशी संबंध येणाऱ्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या १५ फेब्रुवारीपूर्वी करण्याचे शासनाने निश्चित केले आहे.२०१४ च्या निवडणुकांच्या वेळी अधिकाऱ्यांच्या बदल्या ऐन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या तोंडावर झाल्या होत्या. त्यामुळे अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी रुजू होऊन तेथील आपले कार्यक्षेत्र समजावून घेण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी १५ फेब्रुवारीपूर्वी बदल्या केल्या जाणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्याला नव्या ठिकाणी तयारीसाठी किमान तीन आठवडे मिळणार आहे. ते पाहता जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बदल्यांचे आदेश जारी होतील, असा अंदाज आहे.महसूल खात्यासाठी एका पदावर तीन वर्षे व एका जिल्ह्यात चार पेक्षा अधिक वर्ष सेवा हा बदल्यांचा प्रमुख निकष आहे. मात्र या बदल्यांमधून भूसंपादन, नझूल या सारख्या साईडब्रँचच्या अधिकाऱ्यांना वगळले जाणार आहे. राज्यात दुष्काळी स्थिती आहे. त्याच्या उपाययोजनांचा बहुतांश अभ्यास निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना असतो. त्यामुळे बदलीला पात्र नसेल तर (एका पदावर तीन वर्ष) त्यांनाही या निवडणूक बदल्यांमधून वगळले जाणार आहे. मात्र निवडणूक आयोगाची एक अट महसूल अधिकाऱ्यांसाठी जाचक ठरली आहे. नुकत्याच इतर राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये आयोगाने यापूर्वी जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) व सहायक निवडणूक अधिकारी पदावर काम केलेले नसावे हा बदलीचा निकष ठेवला. मात्र असे अधिकारी बहुतांश आहेत. कारण कोणत्या ना कोणत्या निवडणुकीत त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली असते. म्हणून हा निकष वगळावा यासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातून आयोगाला साकडे घातले जात आहे.

१२ ते १५ उपजिल्हाधिकारी पात्रएकट्या महसूल खात्याचा विचार केल्यास प्रत्येक महसूल विभागातून किमान १२ ते १५ उपजिल्हाधिकारी व २५ ते ३० तहसीलदारांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. अशीच काहीशी स्थिती पोलीस खात्याची आहे. तेथेही निरीक्षक, उपअधीक्षक, आयपीएसच्या बदल्या आयोगाच्या सूचनेनुसार होणार आहेत.राजकीय वाटेवरील अधिकाऱ्यांची पंचाईतनिवडणूक बदल्यांमध्ये पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या सोईच्या ठिकाणी नियुक्ती मिळविण्यासाठी राजकीय मार्गाने मोर्चेबांधणी चालविली होती. त्यासाठी आमदारांची पत्रेही घेतली गेली. परंतु एका प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन यांनी राजकीय शिफारसीवरून बदल्या करणार नाही, असे शपथपत्र दिल्याने राजकीय वाटेवरील अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यातच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांचे या बदल्यांवर बारकाईने लक्ष आहे. ४ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकत्र निवडणुकांची चर्चा नाहीराज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका सोबत होणार अशी चर्चा असली तरी प्रत्यक्षात प्रशासकीय स्तरावर याबाबत आयोगाकडून कोणतीही विचारणा अथवा आढावा घेतला गेलेला नाही. सोबत निवडणुका घ्यायच्या झाल्यास मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅड यंत्रे लागणार आहेत. राज्याकडे तेवढे ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे एकत्र निवडणुकांची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस