शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राजस्व अभियान मंदावले

By admin | Updated: August 4, 2014 23:59 IST

जनतेच्या सुविधेसाठी महाराष्ट्र शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरू केले़ अभियानाच्या प्रारंभी या अभियानाने चांगलीच गती पकडली होती़ मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून महसूल विभागाने

सेतू केंद्रात अर्जाचे ढिगारे : विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रांसाठी धावपळवणी : जनतेच्या सुविधेसाठी महाराष्ट्र शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरू केले़ अभियानाच्या प्रारंभी या अभियानाने चांगलीच गती पकडली होती़ मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून महसूल विभागाने या लोक कल्याणकारी अभियानाकडे कानाडोळा करणे सुरू केल्याने त्याची गती मंदावली आहे़ ऐन प्रवेशाच्या काळात विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्रांसाठी धावपळ सुरू असून विद्यार्थ्यांच्या अर्जांचे सेतू केंद्रात ढिगारे गोळा होत आहे़ परिणामी विद्यार्थ्यांना आवश्यक तेव्हा प्रमाणपत्र मिळणे अशक्य होत आहे़राज्यातील जनतेला महसूल विभागातील कामे करणे सुलभ जावे, म्हणून राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरू केले़ या अभियानामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी किंवा शाळेतच आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप करणे, सात-बाराचे चावडी वाचन करून शेतकऱ्यांना जागेवरच सातबारा दुरूस्त करुण देणे, गावातील पांदण रस्त्यांचे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणे, यांच्यासह अनेक कामे जनतेच्या दारात जाऊन करण्याचे निर्देश कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. प्रथम दोन वर्ष महसूल विभागाने अभियानाचा धुमधडाका सुरू ठेवला होता. मात्र मागील दोन वर्षांपासून या राजस्व अभियानाची गती चांगली मंदावली आहे़ आता तर हे अभियान नावापुरतेच शिल्लक राहिले आहे़ विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी व शिष्यवृत्तीसाठी विविध प्रमाणपत्रे व उत्पन्नाचे दाखले आवश्यक आहे़ ते जर त्यांना शाळेतच मिळण्याची व्यवस्था राजस्व अभियानाअंतर्गत गावोगावी करण्यात आली असीत, तर सेतू केंद्रावरील मोठा भार कमी झाला असतात. मात्र तसे होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सेतू केंद्रासमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अर्ज दिल्यानंतर पावतीवर प्रमाणपत्रे मिळण्याची संभाव्य तारीख दिली जाते़ परंतु दिलेली तारीख उलटून गेल्यानंतरही कित्येक दिवस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळतच नाही, हे येथील वास्तव आहे़ वास्तविकता दिलेल्या मुदतीत प्रमाणपत्र न दिल्यास त्यांना आकारलेल्या सुविधा आकाराची रक्कम परत करावी लागते, असे शासनाचे परिपत्रक आहे़ मात्र त्याला महसूल अधिकारी व कर्मचारी जुमानतच नाहीत़ त्यामुळे जनतेचे प्रचंड हाल होत आहे़ फेरफार अदालती घेतल्या जात नाही़ घेतल्याच तर त्या केवळ नामधारी घेतल्या जातात़ काही गावांतील पांदण रस्ते अतिक्रमणाने बंद झाले. त्याची गावकऱ्यांकडून तक्रार येऊनही महसूल विभाग दखल घेत नाही, ही शोकांतिका आहे़ त्यामुळे हे अभियान काय कामाचे, असा प्रश्न विचारला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)