शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

पर्यावरण असंतुलनामुळे ऋतुचक्र प्रभावित झाले आहे. कधी पावसाळा लांबतो तर कधी मोठा खंड पडतो. मागील चार वर्षात परतीच्या पावसाचा कालावधी वाढला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना याचा फटका बसत आहे. पीक घरात येईपर्यंत कुठले संकट ओढवेल याची शाश्वतीच राहिली नाही. त्यामुळे शेतकरी परंपरागत पिकांच्या लागवडीबाबत साशंक झाला आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम धोक्यात : १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीचा पाऊस हा १५ सप्टेंबरपर्यंत कोसळतो. यावर्षी पावसाचा मुक्काम वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. हा पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम धोक्यात आला असून शेतकरी संकटात आला आहे.पर्यावरण असंतुलनामुळे ऋतुचक्र प्रभावित झाले आहे. कधी पावसाळा लांबतो तर कधी मोठा खंड पडतो. मागील चार वर्षात परतीच्या पावसाचा कालावधी वाढला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना याचा फटका बसत आहे. पीक घरात येईपर्यंत कुठले संकट ओढवेल याची शाश्वतीच राहिली नाही. त्यामुळे शेतकरी परंपरागत पिकांच्या लागवडीबाबत साशंक झाला आहे. अति पाऊस - कमी पाऊस हे संकट सातत्याने सहन करावे लागत आहे. बदलत्या ऋतुमानानुसार कृषी शास्त्रज्ञांनी नव्या वाणाचा शोध लावण्याची गरज निर्माण झाली आहे. दुर्दैवाने देशात पिकांबाबत ऋतुमानानुसार संशोधन झालेच नाही. यावर हवामान अभ्यासकाच्या परिषदेत डॉ. सुरेश चोपणे यांनी चिंता व्यक्त केली. यावर्षीही अति पावसाने सोयाबीन व कपाशीचे पीक सडण्याच्या मार्गावर आहे. सर्वाधिक लागवड खर्च असलेली कपाशी यावर्षी संकटात सापडली आहे. या वातावरणामुळे कृषी अभ्यासकांनी यावर्षी उत्पादनामध्ये मोठी घट येण्याचा धोका वर्तविला आहे. शेतकऱ्यांना पर्यायी पीक उपलब्ध नसल्याने परंरागत पद्धतीने शेती करावी लागत आहे. कृषी विद्यापीठांनी बदल्या ऋतुमानानुसार संशोधित वाण बाजारात आणले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चही उत्पादनातून मिळत नाही.कृषीचे अर्थचक्र मोसमी पावसावर अवलंबून आहे. यावर्षी परतीच्या पावसाने हे अर्थचक्र बिघडविले आहे. २४ सप्टेंबरला नागपूर विद्यापीठात विदर्भाचे अर्थशास्त्र आणि पर्यावरण यावर परिषद झाली. त्यात विदर्भातील हवामान अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली.- डॉ. सुरेश चोपणेहवामान अभ्यासक

टॅग्स :Rainपाऊस