शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

परतीचा पाऊस ठरला कापसाचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 5:00 AM

जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. सोयाबीनच्या पिकाला सप्टेंबरमधील पावसाने झोडपून काढले. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र, दसऱ्याच्या सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. एकीकडे कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस घरात कसा आणावा, याची चिंता असतानाच पावसाने हा लाखमोलाचा कापूस भिजविला. आता दोन दिवस उघाड पडल्याशिवाय हा कापूस वेचता येणेही शक्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :   जिल्ह्याला यंदा पाऊस पावला. मात्र, आता दोन दिवसांपासून बरसणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. मध्यंतरीच्या कडक उन्हाने फुटलेली कापसाची बोंडे पावसात भिजल्याने कपाशीची विक्री करताना शेतकऱ्यांना भाव पाडून दिला जाण्याचा धोका आहे. दरम्यान, पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य एका घटनेत एकजण बेपत्ता आहे.जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. सोयाबीनच्या पिकाला सप्टेंबरमधील पावसाने झोडपून काढले. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र, दसऱ्याच्या सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. एकीकडे कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस घरात कसा आणावा, याची चिंता असतानाच पावसाने हा लाखमोलाचा कापूस भिजविला. आता दोन दिवस उघाड पडल्याशिवाय हा कापूस वेचता येणेही शक्य नाही. शिवाय कपाशी वेचून विक्रीसाठी नेल्यावर आर्द्रतेच्या बहाण्यावरून व्यापारी भाव पाडण्याची भीती निर्माण झाली आहे.  शुक्रवारी  रात्री पांढरकवडा, घाटंजी, मारेगाव, झरी जामणी, वणी तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. तर शनिवारी  उमरखेड, आर्णी तालुक्यांतही  पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात शनिवारी सकाळी ११ वाजता संपलेल्या २४ तासांत १३.८ मिलिमीटर पाऊस बरसला. तर शनिवारी दिवसभरही यवतमाळ शहरासह, घाटंजी, महागाव, पांढरकवडा, नेर, आर्णी, वणी, पुसद आदी तालुक्यांमध्ये पाऊस कोसळत होता. 

जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू, एक जण बेपत्ता

पांढरकवडा/घोन्सा/रुंझा : एकीकडे सण-उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच पावसादरम्यान नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. यातील एक घटना वणी तालुक्यातील घोन्सा येथे तर दुसरी घटना पांढरकवडानजीक रुंझा येथे, तिसरी घटना साखरा येथे घडली. राजू श्रीहरी बोरकुटे रा.घोन्सा आणि रफीक हारून सैयद (३०) रा.रूंझा अशी मृतांची नावे आहेत. राजू बोरकुटे शनिवारी दुपारी घट विसर्जनासाठी विदर्भा नदीवर गेला होता. राजूचा पाय घसरून नागरिकांच्या डोळ्यादेखत तो पुरात वाहात गेला. पोलीस पाटील सचिन उपरे, तलाठी गणेश सहाने, मंडळ अधिकारी ए.बी. मडावी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार आदी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र शनिवारी रात्रीपर्यंत शोध लागला नव्हता. यवतमाळ येथून बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले. रफीक हारून सैयद (३०) रा.रूंझा हा गुराखी आहे. शनिवारी नदी पार करण्यासाठी त्याची जनावरे पाण्यात उतरली. त्यासोबतच रफीकही पाण्यातून निघाला. मध्ये भोवरा तयार झाल्याने तो बुडाला. त्याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ आहे. पांढरकवडा तालुक्यातील साखरा येथे देवी विसर्जनासाठी गेलेला श्रमिक निर्दोष तुराणकार रा. धारणा हा युवक नाल्याच्या डोहात बुडून दगावला. 

 

टॅग्स :Rainपाऊस