शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:29 IST

सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपुनर्गठनाचे शासन स्तरावर केलेले प्रयत्न निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.पाच तालुक्यांत विस्तार असलेल्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे चाक मागील तीन हंगामापासून फिरले नाही. त्यामुळे सहकारी तत्वावर चालणारा विदर्भातील एकमेव साखर कारखाना ही वसंतची ओळख आता मिटली आहे. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये शेतकरी सभासदांनी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारुन अविरोधपणे संचालक मंडळाची निवड केली होती. त्यानंतर कारखाना अध्यक्ष व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी भाजपचे अ‍ॅड.माधवराव माने यांची वर्णी लागली होती. भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष असल्याने अ‍ॅड.माने यांनी कारखान्याच्या भवितव्यासाठी अनेक प्रयत्न केले. सर्वपक्षीय संचालक मंडळाने देखील त्यांना सहकार्य केले. मात्र कारखाना सुरू होऊ शकला नाही.१२० कोटींपैकी बँकेच्या २० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी संचालक मंडळाने सहकार मंत्र्यांशीही चर्चा केली. मुंबईला जाऊन या कर्जाचे पुनर्गठन करण्याची मागणी केली. सहकार मंत्र्यांनी या कर्जमुक्तीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार कारखान्यातर्फे १५ ऑगस्ट रोजी कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आगामी हंगामात कारखाना सुरू होण्याच्या सर्व शक्यता मावळल्या. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर व सर्व संचालकांनी आपले राजीनामे कार्यकारी संचालक अरूण भालेराव यांच्याकडे सोपविले. आता कारखान्यावर प्रशासक मंडळाची नेमणूक होण्याची शक्यता आहे. कारखाना सुरू होणार नसल्याने त्याचे पडसाद या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जाते.युती सरकार शेतकरी विरोधी - मानेकारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन न करणारे राज्यातील भाजप-शिवसेनेचे युती सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव माने यांनी करून भाजपला घरचा अहेर दिला आहे. सरकारच्या या निर्णयाने आम्ही हताश झालो अशी प्रतिक्रिया माने यांनी नोंदविली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने