शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:29 IST

सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपुनर्गठनाचे शासन स्तरावर केलेले प्रयत्न निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.पाच तालुक्यांत विस्तार असलेल्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे चाक मागील तीन हंगामापासून फिरले नाही. त्यामुळे सहकारी तत्वावर चालणारा विदर्भातील एकमेव साखर कारखाना ही वसंतची ओळख आता मिटली आहे. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये शेतकरी सभासदांनी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारुन अविरोधपणे संचालक मंडळाची निवड केली होती. त्यानंतर कारखाना अध्यक्ष व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी भाजपचे अ‍ॅड.माधवराव माने यांची वर्णी लागली होती. भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष असल्याने अ‍ॅड.माने यांनी कारखान्याच्या भवितव्यासाठी अनेक प्रयत्न केले. सर्वपक्षीय संचालक मंडळाने देखील त्यांना सहकार्य केले. मात्र कारखाना सुरू होऊ शकला नाही.१२० कोटींपैकी बँकेच्या २० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी संचालक मंडळाने सहकार मंत्र्यांशीही चर्चा केली. मुंबईला जाऊन या कर्जाचे पुनर्गठन करण्याची मागणी केली. सहकार मंत्र्यांनी या कर्जमुक्तीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार कारखान्यातर्फे १५ ऑगस्ट रोजी कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आगामी हंगामात कारखाना सुरू होण्याच्या सर्व शक्यता मावळल्या. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर व सर्व संचालकांनी आपले राजीनामे कार्यकारी संचालक अरूण भालेराव यांच्याकडे सोपविले. आता कारखान्यावर प्रशासक मंडळाची नेमणूक होण्याची शक्यता आहे. कारखाना सुरू होणार नसल्याने त्याचे पडसाद या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जाते.युती सरकार शेतकरी विरोधी - मानेकारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन न करणारे राज्यातील भाजप-शिवसेनेचे युती सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव माने यांनी करून भाजपला घरचा अहेर दिला आहे. सरकारच्या या निर्णयाने आम्ही हताश झालो अशी प्रतिक्रिया माने यांनी नोंदविली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने