शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शेतमाल विक्रीसाठी आता जागा आरक्षित

By admin | Updated: March 4, 2016 02:34 IST

बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतमाल,

जिल्हाधिकारी : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्याचा प्रयत्नयवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतमाल, भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करता यावा यासाठी ओटा आरक्षित ठेवण्यात आला आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये उत्पादित केलेला भाजीपाला, धान्य बाजारात विक्रिसाठी आल्यानंतर अडते भाव पाडून खरेदी करतात. तसेच त्यांच्याकडून विक्री केलेल्या मालाची अडतही (रक्कम) घेतात. तर हाच शेतमाल व्यापारी विकत घेउन ग्राहकांना चढया दराने विक्री करतात. यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे थेट शेतकऱ्यांचा शेतमाल हा ग्राहकांना विक्री करता यावा यातून त्यांची आर्थिक समृद्धी व्हावी, यासाठी यवतमाळ बाजार समितीमधील ओटा आरक्षित ठेवण्यात आला आहे. सध्या यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीतील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. संचालक मंडळांचा कोणताही वचक व्यापारी व दलालांवर नाही. त्यामुळे या ठिकाणी सर्व सोयीसुविधा व्यापारी व अडत्यांना मिळतात. शेतकऱ्यांना मात्र आपला माल उघड्यावर ठेवावा लागतो. मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असताना बाजार समिती व्यवस्थापन मात्र मूग गिळून असते. शेतकरी या ठिकाणी ग्राहकांना आपला माल थेट विकू शकत नाही. याबाबत बळीराजा चेतना अभियान समितीकडून कृषी उत्पन्न बाजार समितीला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता शेतकरी बाजार समितीत आपला माल थेट ग्राहकांना विकू शकतील. शेतकऱ्यांना आपला विक्रीस ठेवण्यासाठी ओटा आरक्षित ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीकडे देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपला माल थेट ग्राहकांना विक्री करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांना केले आहे. (प्रतिनिधी)