शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आदिवासी बांधवांचा आरक्षण बचाव मोर्चा

By admin | Updated: August 4, 2014 23:58 IST

आदिवासी समाजाला असलेले आरक्षण भारताच्या संविधानाने दिले आहे. इतर कुठल्याही जातीचा समावेश या आरक्षणात करू नये या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर आदिवासी बांधवांनी

आर्णी : आदिवासी समाजाला असलेले आरक्षण भारताच्या संविधानाने दिले आहे. इतर कुठल्याही जातीचा समावेश या आरक्षणात करू नये या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढून निवेदन सादर केले. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीसाठी जी विशेष सूची आहे त्यामध्ये इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये, घटनेनुसार कुणाला आदिवासी म्हणावे आणि कुणाला नाही याचा स्पष्ट उल्लेख राज्यघटनेच्या कलम ३६६ (२५) मध्ये केला आहे. त्यानंतर कलम २४१ (अ) अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींना विशेष अधिकार देऊन स्पष्ट केले आहे. सध्या महाराष्ट्रात राज्यघटनेच्या कुठल्याही संकेताचा आदर न करता आम्हाला आदिवासी सूचीत टाका या मागणीसाठी मोठ्याप्रमाणात आंदोलने सुरू आहेत. परंतु ही बाब आदिवासी समाजाच्या हक्काावर गदा आणणारी आहे. आदिवासींचा अनुशेष अद्याप पूर्ण करण्यात आलेला नाही, आदिवासींसाठी असलेल्या योजना योग्यरित्या राबविल्या जात नाही, त्यामुळे पुन्हा इतर कुण्या समाजाचा या सूचीत उल्लेख करणे म्हणजे आदिवासींवर अन्याय करणे होईल, असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आर्णी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यासमोरून दुपारी १.०० वाजता मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मेन रोडने तहसील कार्यालयावर पोहोचला. तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मोर्चाला जितेंद्र मोघे, विजय मोघे, संजय मोघे, डॉ. विष्णु उकंडे, बाबाराव मडावी, किरण कुमरे, प्रा. माधव सरकुंडे, गोपाल घोडाम, विनोद सोयाम, गुलाब कुडमथे, तुळशीदास मोरकर, सोनबा मंगाम, प्रमोद घोडाम, डॉ. शाम शिंदे, आदींनी मार्गदर्शन केले. या मोर्चात आदिवासी बांधवांनी परंपरात्मक वेशभूषा करून मोठ्यासंख्येने सहभाग नोंदविला. (तालुका प्रतिनिधी)