शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

पीक पैसेवारी काढताना गाव समित्याच अंधारात

By admin | Updated: November 22, 2015 02:31 IST

पीक पैसेवारी काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘ग्राम पीक पैसेवारी समिती’लाच महसूल प्रशासनाने अंधारात ठेवले.

जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितला : सुधारित पैसेवारीचे आदेशयवतमाळ : पीक पैसेवारी काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘ग्राम पीक पैसेवारी समिती’लाच महसूल प्रशासनाने अंधारात ठेवले. परिणामी आठ तालुक्यात पीक पैसेवारी ५० टक्क्याच्या आत, तर आठ तालुक्यात ५५ टक्के इतकी काढण्यात आली. त्यामुळे सर्वच स्तरातून या पैसेवारीवर आक्षेप घेण्यात आला होता. आता सुधारित पीक पैसेवारी काढताना दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. जिल्हा परिषदेने स्वतंत्र ठराव घेवूनच महसूल यंत्रणेने कार्यालयात बसून पैसेवारी काढल्याचा आरोप केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ शुक्रवारी सर्व तहसीलदारांना आदेश देऊन सुधारित पीक पैसेवारी काढण्याचे निर्देश दिले. यासाठी ग्राम पीक पैसेवारी समितीला विश्वासात घेऊनच पद्धत राबविण्याची सूचना केली. पीक पैसेवारी काढताना सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर झाली. यात जिल्ह्यातील पीक स्थिती अतिशय उत्तम असल्याचे महसूल यंत्रणेने दाखविले. त्यानंतर सर्वच स्तरातून विरोध होताना दिसून आला. तेव्हा सुधारित पैसेवारी जाहीर करताना ३१ आॅक्टोबरनंतर नेर, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, महागाव, बाभूळगाव, यवतमाळ, कळंब या तालुक्यात ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी दाखविण्यात आली. वणी, झरी, मारेगाव, राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, पुसद येथील पीक स्थिती ५५ टक्के इतकी दाखविली. प्रत्यक्षात ४ मार्च १९८९ च्या शासन आदेशाप्रमाणे पीक पैसेवारी काढण्यासाठी ग्रामस्तरावरच्या समितीला विश्वासात घेणे आवश्यक आहे. या समितीमध्ये कृषी सहायक, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, गावातील प्रगतिशील शेतकरी त्यात अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, सधन शेतकरी असा समावेश असणे आवश्यक आहे. या समितीचे अध्यक्ष मंडळ अधिकारी तर सचिव म्हणून तलाठी असतो. अधिकृत नोटीस काढून पैसेवारी काढण्याचा कार्यक्रम या समितीने जाहीर करणे आवश्यक असते. मात्र जिल्ह्यात कोणत्याच गावात अशा पद्धतीने पीक पैसेवारी समितीला विश्वासात घेण्यात आले नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसूनच पीक पैसेवारी काढली. त्यामुळे दुष्काळी स्थितीत जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखविण्यात आले. सोयाबीन पूर्णत: हातून गेले, तर कपाशीचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्या उपरही अर्ध्या जिल्ह्यात दुष्काळ आणि उर्वरित ठिकाणी सुस्थिती असे चित्र आढळून आले. पीक आणेवारीला छेद देणारा अहवाल जिल्हास्तरीय तपासणी समितीने दिला. यामध्ये कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ असतात. त्यांनी सोयाबीन, कापूस या पिकांचे उत्पन्न ८० ते ९० टक्क्यांनी घटल्याचा अहवाल दिला. यामुळे महसूल यंत्रणेने काढलेल्या पीक पैसेवारीतील फोलपणा उघड झाला. चुकीच्या पीक पैसेवारीमुळे त्याला शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागते. महसूल यंत्रणेचा हा डाव जिल्हास्तरीय समितीच्या अहवालाने उधळला. यात जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घेऊन हा मुद्दा लावून धरला. जिल्हा परिषद सभागृहाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत पीक पैसेवारीतील फोलपणा उघड केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सर्व तहसीलदारांना सुधारित पीक पैसेवारी काढण्यापूर्वी शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीची योग्य अंमलबजावणी करावी, पीक कापणी प्रयोगाचे गावनिहाय तालुक्याचा कार्यक्रम आखावा. पीक पैसेवारी काढताना ग्राम पैसेवारी समितीच्या सर्व सदस्यांना पूर्वसूचना द्याव्या आणि त्यानंतरच पीक कापणी प्रयोगाचे इतिवृत्त तयार करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले. (कार्यालय प्रतिनिधी)चुकीच्या दुरुस्तीचा प्रयत्नपीक पैसेवारी जाहीर करण्यात झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न महसूल प्रशासनाकडून झाला. पूर्वीच्या पैसेवारीतील फोलपणा उघड झाला. आता अंतिम पीक पैसेवारी जाहीर करताना खरोखरच ग्राम पैसेवारी समित्यांना विश्वासात घेऊन काम केले जाते का, याकडे लक्ष राहणार आहे.