शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पीक पैसेवारी काढताना गाव समित्याच अंधारात

By admin | Updated: November 22, 2015 02:31 IST

पीक पैसेवारी काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘ग्राम पीक पैसेवारी समिती’लाच महसूल प्रशासनाने अंधारात ठेवले.

जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितला : सुधारित पैसेवारीचे आदेशयवतमाळ : पीक पैसेवारी काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘ग्राम पीक पैसेवारी समिती’लाच महसूल प्रशासनाने अंधारात ठेवले. परिणामी आठ तालुक्यात पीक पैसेवारी ५० टक्क्याच्या आत, तर आठ तालुक्यात ५५ टक्के इतकी काढण्यात आली. त्यामुळे सर्वच स्तरातून या पैसेवारीवर आक्षेप घेण्यात आला होता. आता सुधारित पीक पैसेवारी काढताना दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. जिल्हा परिषदेने स्वतंत्र ठराव घेवूनच महसूल यंत्रणेने कार्यालयात बसून पैसेवारी काढल्याचा आरोप केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ शुक्रवारी सर्व तहसीलदारांना आदेश देऊन सुधारित पीक पैसेवारी काढण्याचे निर्देश दिले. यासाठी ग्राम पीक पैसेवारी समितीला विश्वासात घेऊनच पद्धत राबविण्याची सूचना केली. पीक पैसेवारी काढताना सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर झाली. यात जिल्ह्यातील पीक स्थिती अतिशय उत्तम असल्याचे महसूल यंत्रणेने दाखविले. त्यानंतर सर्वच स्तरातून विरोध होताना दिसून आला. तेव्हा सुधारित पैसेवारी जाहीर करताना ३१ आॅक्टोबरनंतर नेर, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, महागाव, बाभूळगाव, यवतमाळ, कळंब या तालुक्यात ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी दाखविण्यात आली. वणी, झरी, मारेगाव, राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, पुसद येथील पीक स्थिती ५५ टक्के इतकी दाखविली. प्रत्यक्षात ४ मार्च १९८९ च्या शासन आदेशाप्रमाणे पीक पैसेवारी काढण्यासाठी ग्रामस्तरावरच्या समितीला विश्वासात घेणे आवश्यक आहे. या समितीमध्ये कृषी सहायक, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, गावातील प्रगतिशील शेतकरी त्यात अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, सधन शेतकरी असा समावेश असणे आवश्यक आहे. या समितीचे अध्यक्ष मंडळ अधिकारी तर सचिव म्हणून तलाठी असतो. अधिकृत नोटीस काढून पैसेवारी काढण्याचा कार्यक्रम या समितीने जाहीर करणे आवश्यक असते. मात्र जिल्ह्यात कोणत्याच गावात अशा पद्धतीने पीक पैसेवारी समितीला विश्वासात घेण्यात आले नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसूनच पीक पैसेवारी काढली. त्यामुळे दुष्काळी स्थितीत जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखविण्यात आले. सोयाबीन पूर्णत: हातून गेले, तर कपाशीचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्या उपरही अर्ध्या जिल्ह्यात दुष्काळ आणि उर्वरित ठिकाणी सुस्थिती असे चित्र आढळून आले. पीक आणेवारीला छेद देणारा अहवाल जिल्हास्तरीय तपासणी समितीने दिला. यामध्ये कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ असतात. त्यांनी सोयाबीन, कापूस या पिकांचे उत्पन्न ८० ते ९० टक्क्यांनी घटल्याचा अहवाल दिला. यामुळे महसूल यंत्रणेने काढलेल्या पीक पैसेवारीतील फोलपणा उघड झाला. चुकीच्या पीक पैसेवारीमुळे त्याला शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागते. महसूल यंत्रणेचा हा डाव जिल्हास्तरीय समितीच्या अहवालाने उधळला. यात जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घेऊन हा मुद्दा लावून धरला. जिल्हा परिषद सभागृहाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत पीक पैसेवारीतील फोलपणा उघड केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सर्व तहसीलदारांना सुधारित पीक पैसेवारी काढण्यापूर्वी शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीची योग्य अंमलबजावणी करावी, पीक कापणी प्रयोगाचे गावनिहाय तालुक्याचा कार्यक्रम आखावा. पीक पैसेवारी काढताना ग्राम पैसेवारी समितीच्या सर्व सदस्यांना पूर्वसूचना द्याव्या आणि त्यानंतरच पीक कापणी प्रयोगाचे इतिवृत्त तयार करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले. (कार्यालय प्रतिनिधी)चुकीच्या दुरुस्तीचा प्रयत्नपीक पैसेवारी जाहीर करण्यात झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न महसूल प्रशासनाकडून झाला. पूर्वीच्या पैसेवारीतील फोलपणा उघड झाला. आता अंतिम पीक पैसेवारी जाहीर करताना खरोखरच ग्राम पैसेवारी समित्यांना विश्वासात घेऊन काम केले जाते का, याकडे लक्ष राहणार आहे.