शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

अतिक्रमण काढा, रस्ता मोकळा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पालिकेच्या विस्कटलेल्या प्रशासनाची घडी योग्यरीत्या बसविली आहे. आता पालिका प्रशासन शहरात अस्तित्वात आहे, हे दृश्यस्वरूपात दिसत आहे. शहर स्वच्छतेसोबतच अतिक्रमणासारखी गंभीर समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पथकच गठित करण्यात आले आहे. अभियंता निखिल पुराणिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी अतिक्रमणधारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील रस्त्यांवर सर्वच बाजूंनी अतिक्रमण झालेले आहे. गोरगरिबांपेक्षा धनदांडग्यांनीच रस्त्यावर दुकाने वाढवून ताबा घेतला आहे. ते रस्ते तत्काळ मोकळे करा, अन्यथा नगरपालिकेचा बुलडोझर चालणार, अशा स्वरूपाच्या नोटिसा अतिक्रमणधारकांना बजावण्यात येत आहेत. दारव्हा मार्गावरील २०० च्या वर अतिक्रमणधारकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पालिकेच्या विस्कटलेल्या प्रशासनाची घडी योग्यरीत्या बसविली आहे. आता पालिका प्रशासन शहरात अस्तित्वात आहे, हे दृश्यस्वरूपात दिसत आहे. शहर स्वच्छतेसोबतच अतिक्रमणासारखी गंभीर समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पथकच गठित करण्यात आले आहे. अभियंता निखिल पुराणिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी अतिक्रमणधारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला जात आहे. वाघापूर ते लोहारा बायपासचे अतिक्रमण काढले जाणार आहे. भोसा मार्गावर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. दारव्हा नाका ते लोहारा रस्त्यावरचे अतिक्रमण जेथे शोरूम व मोठ्या व्यावसायिकांनी ॲप्रोच रोड हडपला आहे, त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. पांढरकवडा मार्ग, आर्णी मार्गसुद्धा अतिक्रमणमुक्त होणार आहे.

१५० जणांचे अतिक्रमण काढले- कळंब चौक व सेवानगर भागातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. कधी नव्हे तो हा परिसर मोकळा झाला आहे. या ठिकाणी १५० जणांचे अतिक्रमण काढण्यात आले. आता ही मोहीम कळंब चौकापुढेही नागपूर मार्गावर राबविली जाणार आहे. रस्त्यावर फोफावलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अपघात घडतात. अतिक्रमण झाल्याने गुन्हेगारीलाही पाठबळ मिळते. एक ना अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अतिक्रमण बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. 

अतिक्रमणामुळे रस्ते बाधित झाले आहेत, तर काही ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्या आहेत. यातून वाहतुकीची समस्या व आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी या दोन्ही प्रमुख समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे. अतिक्रमण मोहीम ही नागरिकांच्या सुविधेसाठीच राबविली जात आहे.- माधुरी मडावी, मुख्याधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण