शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

अतिक्रमण काढा, रस्ता मोकळा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पालिकेच्या विस्कटलेल्या प्रशासनाची घडी योग्यरीत्या बसविली आहे. आता पालिका प्रशासन शहरात अस्तित्वात आहे, हे दृश्यस्वरूपात दिसत आहे. शहर स्वच्छतेसोबतच अतिक्रमणासारखी गंभीर समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पथकच गठित करण्यात आले आहे. अभियंता निखिल पुराणिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी अतिक्रमणधारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील रस्त्यांवर सर्वच बाजूंनी अतिक्रमण झालेले आहे. गोरगरिबांपेक्षा धनदांडग्यांनीच रस्त्यावर दुकाने वाढवून ताबा घेतला आहे. ते रस्ते तत्काळ मोकळे करा, अन्यथा नगरपालिकेचा बुलडोझर चालणार, अशा स्वरूपाच्या नोटिसा अतिक्रमणधारकांना बजावण्यात येत आहेत. दारव्हा मार्गावरील २०० च्या वर अतिक्रमणधारकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पालिकेच्या विस्कटलेल्या प्रशासनाची घडी योग्यरीत्या बसविली आहे. आता पालिका प्रशासन शहरात अस्तित्वात आहे, हे दृश्यस्वरूपात दिसत आहे. शहर स्वच्छतेसोबतच अतिक्रमणासारखी गंभीर समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पथकच गठित करण्यात आले आहे. अभियंता निखिल पुराणिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी अतिक्रमणधारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला जात आहे. वाघापूर ते लोहारा बायपासचे अतिक्रमण काढले जाणार आहे. भोसा मार्गावर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. दारव्हा नाका ते लोहारा रस्त्यावरचे अतिक्रमण जेथे शोरूम व मोठ्या व्यावसायिकांनी ॲप्रोच रोड हडपला आहे, त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. पांढरकवडा मार्ग, आर्णी मार्गसुद्धा अतिक्रमणमुक्त होणार आहे.

१५० जणांचे अतिक्रमण काढले- कळंब चौक व सेवानगर भागातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. कधी नव्हे तो हा परिसर मोकळा झाला आहे. या ठिकाणी १५० जणांचे अतिक्रमण काढण्यात आले. आता ही मोहीम कळंब चौकापुढेही नागपूर मार्गावर राबविली जाणार आहे. रस्त्यावर फोफावलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अपघात घडतात. अतिक्रमण झाल्याने गुन्हेगारीलाही पाठबळ मिळते. एक ना अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अतिक्रमण बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. 

अतिक्रमणामुळे रस्ते बाधित झाले आहेत, तर काही ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्या आहेत. यातून वाहतुकीची समस्या व आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी या दोन्ही प्रमुख समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे. अतिक्रमण मोहीम ही नागरिकांच्या सुविधेसाठीच राबविली जात आहे.- माधुरी मडावी, मुख्याधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण