शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

अभियांत्रिकीच्या प्रवेशाचे निकष शिथील, बारावीच्या गुणांची अट झाली कमी ; राज्य शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 18:57 IST

बारावीच्या गुणांची अट झाली कमी 

यवतमाळ: अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीच्या पात्रता निकषात राज्य शासनाने शिथीलता आणली आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी राजपत्राद्वारे जारी केला.

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे निकष शुक्रवारी जाहीर झाले. त्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, विधी, दृश्य कला अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ताज्या निर्णयानुसार, अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत भौतिकशास्त्र व गणित या अनिवार्य विषयायसह  रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा तांत्रिक व्यवसायिक विषय किंवा शासनाने नमूद केलेले इतर पयार्यी विषय या तीन विषयात किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय,आर्थिक दुर्बल घटक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.

यापूर्वी अनुक्रमे ५० व ४५ टक्के गुणांची अट होती. मात्र आता गुणांची ही अट शिथील झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना सध्याच्या कोरोना परिस्थिती मध्ये  दिलासा मिळाला असून  अभियांत्रिकी अभ्यासक्रमात  प्रवेश घेण्याची संधी  मिळणार आहे. त्याचप्रमाणे इतर काही  व्यावसायिक अभ्यासक्रमातही बारावीच्या किमान गुणांची अट कमी करण्यात आली आहे. हा निर्णय अतिशय चांगला आहे. अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अनेकांना संधी मिळणार आहे. - प्रा. डॉ. विवेक गंधेवार,  प्रवेश प्रक्रिया प्रमुख,  जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ

टॅग्स :Studentविद्यार्थीYavatmalयवतमाळ