शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अभियांत्रिकीच्या प्रवेशाचे निकष शिथील, बारावीच्या गुणांची अट झाली कमी ; राज्य शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 18:57 IST

बारावीच्या गुणांची अट झाली कमी 

यवतमाळ: अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीच्या पात्रता निकषात राज्य शासनाने शिथीलता आणली आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी राजपत्राद्वारे जारी केला.

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे निकष शुक्रवारी जाहीर झाले. त्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, विधी, दृश्य कला अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ताज्या निर्णयानुसार, अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत भौतिकशास्त्र व गणित या अनिवार्य विषयायसह  रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा तांत्रिक व्यवसायिक विषय किंवा शासनाने नमूद केलेले इतर पयार्यी विषय या तीन विषयात किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय,आर्थिक दुर्बल घटक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.

यापूर्वी अनुक्रमे ५० व ४५ टक्के गुणांची अट होती. मात्र आता गुणांची ही अट शिथील झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना सध्याच्या कोरोना परिस्थिती मध्ये  दिलासा मिळाला असून  अभियांत्रिकी अभ्यासक्रमात  प्रवेश घेण्याची संधी  मिळणार आहे. त्याचप्रमाणे इतर काही  व्यावसायिक अभ्यासक्रमातही बारावीच्या किमान गुणांची अट कमी करण्यात आली आहे. हा निर्णय अतिशय चांगला आहे. अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अनेकांना संधी मिळणार आहे. - प्रा. डॉ. विवेक गंधेवार,  प्रवेश प्रक्रिया प्रमुख,  जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ

टॅग्स :Studentविद्यार्थीYavatmalयवतमाळ