शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

बोंड अळीच्या प्रादुर्भाव संदर्भात पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, सामूहिक सर्वेक्षण करून दिलासा देण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 21:26 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतक-यांचे हातचे पीक वाया गेले आहे. यासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली.

यवतमाळ  : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतक-यांचे हातचे पीक वाया गेले आहे. यासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. या नुकसानीसंदर्भात सामूहिक सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन शेतक-यांना तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.जिल्ह्यातील नेर, दारव्हा, महागाव आदी तालुक्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून भविष्यात आणखी उग्र रुप धारण करू शकतो. कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाल्याची बाब नैसर्गिक आपत्ती, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयात समाविष्ठ नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचा सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून आदेश आवश्यक आहे. अशा भागाचा सामूहिक सर्वे करून शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. कापूस अधिनियम 2010 नुसार नुकसानग्रस्त शेतक-याने यासंदर्भात वैयक्तिक तक्रार करणे गरजेचे आहे. यासंदर्भात 7 तक्रारी करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या तक्रारींवर कृषी विभागाने सर्वेक्षण केले असले तरी त्यासाठी  तलाठी, , ग्रामसेवक, आणि कृषी सहाय्यक यांच्या मार्फत  संयुक्त सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव सादर करण्याबाबत पालकमंत्री मदन येरावार यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिका-यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे व आयुक्तांकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूस