शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

७३० हेक्टर शेतजमीन वर्ग १ मध्ये परावर्तित, ३० गावातील २६८ शेतकऱ्यांना लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 10:42 IST

महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली.

ठळक मुद्दे महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली.तहसीलदार अरुण शेलार यांनी पुढाकार घेऊन दारव्हा तालुक्यातील ३० गावातील २६८ शेतकऱ्यांच्या जमिनीचा वर्ग बदलला.शेतजमिनी वर्ग २ मध्ये असल्यामुळे  शेतकऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित राहावे लागत होते.

मुकेश इंगोले

यवतमाळ - तालुक्यात महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली. तहसीलदार अरुण शेलार यांनी पुढाकार घेऊन दारव्हा तालुक्यातील ३० गावातील २६८ शेतकऱ्यांच्या जमिनीचा वर्ग बदलल्याने त्यांना अनेक लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पायलट स्किम अंतर्गत मध्यप्रदेश जमीन महसूल संहिता १९५४ चे कलम १६४ (३) अन्वये भूमिधारी धारणाधिकाराकाराने किंवा हस्तांतरणाच्या हक्कावरील निर्बंधासह भूमिस्वामी हक्कान्वे वाटप करण्यात आलेल्या जमिनींचा धारणाधिकार भोगवटदार वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या वतीने कार्यक्रम राबविण्यात आला. ज्या नागरिकांकडे मध्यप्रदेश जमीन महसूल संहिता १९५४ च्या तरतुदीनुसार जमीन वाटप केल्याचा पुरावा, सनद, हक्क नोंदणी आदी कागदपत्रे उपलब्ध आहे त्यांच्या जमिनीचा वर्ग बदलण्याची कार्यवाही करण्यात आली.

तालुक्यातील राजुरा, कुऱ्हाड, कुंड, साजेगाव, ब्रह्मनाथ, निळोण, शिंदी, तळेगाव, इरथळ, मांगकिन्ही, हरू, उमरी, ईजारा, वागद (खु.), लोही, सेवादासनगर, जवळा, शेलोडी, गणेशपूर, सावळी, दुधगाव, वाकी,महागाव(क.), चिकणी, लाखखिंड, वडगाव(आंध), मोझर तरोडा, सावळी, पळशी या तीस गावातील २६८ शेतकऱ्यांची ७३० हेक्टर जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्यात आली. यापूर्वी  या सर्व शेतजमिनी वर्ग २ मध्ये असल्यामुळे  शेतकऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित राहावे लागत होते. परंतु २१ एप्रिल २०१८ च्या शासन राजपत्रांन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम २९ मध्ये सुधारणा करण्यात आली. कलम २९ चे पोटकलम (३) खंड (ब) उपखंड (एक) वगळण्यात आल्यामुळे शेतजमिनीच्या वर्गात हा बदल करण्यात आला असून याचे अनेक फायदे संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे.

दारव्हा तालुका जिल्ह्यात अव्वल 

विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या शेतजमिनीच्या वर्गांमध्ये बदल करण्यात आला असला तरी याबाबतीत दारव्हा तहसील कार्यालयाची कामगिरी जिल्ह्यात अव्वल ठरल्याचे बोलले जात आहे. कमी वेळात मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याने महसूलच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ