शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

७३० हेक्टर शेतजमीन वर्ग १ मध्ये परावर्तित, ३० गावातील २६८ शेतकऱ्यांना लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 10:42 IST

महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली.

ठळक मुद्दे महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली.तहसीलदार अरुण शेलार यांनी पुढाकार घेऊन दारव्हा तालुक्यातील ३० गावातील २६८ शेतकऱ्यांच्या जमिनीचा वर्ग बदलला.शेतजमिनी वर्ग २ मध्ये असल्यामुळे  शेतकऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित राहावे लागत होते.

मुकेश इंगोले

यवतमाळ - तालुक्यात महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली. तहसीलदार अरुण शेलार यांनी पुढाकार घेऊन दारव्हा तालुक्यातील ३० गावातील २६८ शेतकऱ्यांच्या जमिनीचा वर्ग बदलल्याने त्यांना अनेक लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पायलट स्किम अंतर्गत मध्यप्रदेश जमीन महसूल संहिता १९५४ चे कलम १६४ (३) अन्वये भूमिधारी धारणाधिकाराकाराने किंवा हस्तांतरणाच्या हक्कावरील निर्बंधासह भूमिस्वामी हक्कान्वे वाटप करण्यात आलेल्या जमिनींचा धारणाधिकार भोगवटदार वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या वतीने कार्यक्रम राबविण्यात आला. ज्या नागरिकांकडे मध्यप्रदेश जमीन महसूल संहिता १९५४ च्या तरतुदीनुसार जमीन वाटप केल्याचा पुरावा, सनद, हक्क नोंदणी आदी कागदपत्रे उपलब्ध आहे त्यांच्या जमिनीचा वर्ग बदलण्याची कार्यवाही करण्यात आली.

तालुक्यातील राजुरा, कुऱ्हाड, कुंड, साजेगाव, ब्रह्मनाथ, निळोण, शिंदी, तळेगाव, इरथळ, मांगकिन्ही, हरू, उमरी, ईजारा, वागद (खु.), लोही, सेवादासनगर, जवळा, शेलोडी, गणेशपूर, सावळी, दुधगाव, वाकी,महागाव(क.), चिकणी, लाखखिंड, वडगाव(आंध), मोझर तरोडा, सावळी, पळशी या तीस गावातील २६८ शेतकऱ्यांची ७३० हेक्टर जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्यात आली. यापूर्वी  या सर्व शेतजमिनी वर्ग २ मध्ये असल्यामुळे  शेतकऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित राहावे लागत होते. परंतु २१ एप्रिल २०१८ च्या शासन राजपत्रांन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम २९ मध्ये सुधारणा करण्यात आली. कलम २९ चे पोटकलम (३) खंड (ब) उपखंड (एक) वगळण्यात आल्यामुळे शेतजमिनीच्या वर्गात हा बदल करण्यात आला असून याचे अनेक फायदे संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे.

दारव्हा तालुका जिल्ह्यात अव्वल 

विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या शेतजमिनीच्या वर्गांमध्ये बदल करण्यात आला असला तरी याबाबतीत दारव्हा तहसील कार्यालयाची कामगिरी जिल्ह्यात अव्वल ठरल्याचे बोलले जात आहे. कमी वेळात मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याने महसूलच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ