शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार कोटींच्या कृषी बिलांची वसुली; वीज कंपनीच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

By रूपेश उत्तरवार | Updated: December 7, 2022 11:05 IST

वसुली मोहीम तीव्र; आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांना थकबाकी भरावी लागणार

यवतमाळ : राज्यभरातील शेतकऱ्यांकडे ४५ हजार कोटी रुपयांची वीजबिले थकली आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज कंपनीकडून पावले उचलण्यात आली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुने थकीत बिल न घेता नियमित बिल भरून घेण्याचे सूतोवाच केले होते. यानंतर आता वीज कंपनीला दीड हजार कोटी रुपयांच्या वीजबिलाची वसुली करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांना थकबाकी भरावी लागणार असल्याने शेतकऱ्यांतून असंतोष व्यक्त केला जात आहे.

अतिवृष्टीने राज्यभरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले होते. त्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. या नैसर्गिक आपत्तीचा निधी पूर्णपणे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्याचवेळी वीज कंपनीकडून आता बिलाच्या मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे. गावपातळीवर कृषी फीडर पूर्णत: कोलमडले आहेत. पूर्णवेळ वीज मिळत नाही. 

अनेक ठिकाणी डीपी जळाल्या, तर काही ठिकाणी डीपीत फेज नाही. नवीन डीपी देताना वीज कंपनीने शेतकऱ्यांकडून चालू बिल भरल्यानंतरच नवीन डीपी दिली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही शेतकऱ्याकडून वीजबिल भरून घेतले. यामुळे कंपनीविरोधात नाराजी असतानाच आता पुन्हा चालू थकबाकीसाठीच्या वसुली मोहिमेला सामोरे जावे लागणार आहे. नव्या आदेशानुसार थकीत बिलापेक्षा नियमित एक बिल भरून घेण्याच्या सूचना आहेत. यातून नियमित दीड हजार कोटी रुपयांच्या वीजबिलाच्या वसूलीचे नियोजन आहे.

सर्पदंशातील मृत्यूंच्या अहवालाकडे कानाडोळा

पश्चिम विदर्भाच्या वाट्याला रात्रीचा वीज पुरवठा कायम आहे. त्यातही पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, यातून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. पूर्व विदर्भात जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली. मात्र, त्याचवेळी पश्चिम विदर्भातील रात्रपाळीत ओलीत करताना शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूची दखल घेतली नाही. या ठिकाणी जंगली जनावरांचाही तितकाच उपद्रव आहे. अशा स्थितीत न्याय सर्वांनाच सारखा मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

टॅग्स :agricultureशेतीmahavitaranमहावितरणelectricityवीजFarmerशेतकरी