शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

दीड हजार कोटींच्या कृषी बिलांची वसुली; वीज कंपनीच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

By रूपेश उत्तरवार | Updated: December 7, 2022 11:05 IST

वसुली मोहीम तीव्र; आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांना थकबाकी भरावी लागणार

यवतमाळ : राज्यभरातील शेतकऱ्यांकडे ४५ हजार कोटी रुपयांची वीजबिले थकली आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज कंपनीकडून पावले उचलण्यात आली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुने थकीत बिल न घेता नियमित बिल भरून घेण्याचे सूतोवाच केले होते. यानंतर आता वीज कंपनीला दीड हजार कोटी रुपयांच्या वीजबिलाची वसुली करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांना थकबाकी भरावी लागणार असल्याने शेतकऱ्यांतून असंतोष व्यक्त केला जात आहे.

अतिवृष्टीने राज्यभरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले होते. त्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. या नैसर्गिक आपत्तीचा निधी पूर्णपणे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्याचवेळी वीज कंपनीकडून आता बिलाच्या मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे. गावपातळीवर कृषी फीडर पूर्णत: कोलमडले आहेत. पूर्णवेळ वीज मिळत नाही. 

अनेक ठिकाणी डीपी जळाल्या, तर काही ठिकाणी डीपीत फेज नाही. नवीन डीपी देताना वीज कंपनीने शेतकऱ्यांकडून चालू बिल भरल्यानंतरच नवीन डीपी दिली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही शेतकऱ्याकडून वीजबिल भरून घेतले. यामुळे कंपनीविरोधात नाराजी असतानाच आता पुन्हा चालू थकबाकीसाठीच्या वसुली मोहिमेला सामोरे जावे लागणार आहे. नव्या आदेशानुसार थकीत बिलापेक्षा नियमित एक बिल भरून घेण्याच्या सूचना आहेत. यातून नियमित दीड हजार कोटी रुपयांच्या वीजबिलाच्या वसूलीचे नियोजन आहे.

सर्पदंशातील मृत्यूंच्या अहवालाकडे कानाडोळा

पश्चिम विदर्भाच्या वाट्याला रात्रीचा वीज पुरवठा कायम आहे. त्यातही पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, यातून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. पूर्व विदर्भात जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली. मात्र, त्याचवेळी पश्चिम विदर्भातील रात्रपाळीत ओलीत करताना शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूची दखल घेतली नाही. या ठिकाणी जंगली जनावरांचाही तितकाच उपद्रव आहे. अशा स्थितीत न्याय सर्वांनाच सारखा मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

टॅग्स :agricultureशेतीmahavitaranमहावितरणelectricityवीजFarmerशेतकरी