शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदार बदलीवरून ‘राज’कारण

By admin | Updated: June 2, 2017 01:38 IST

जिल्ह्यातील ठाणेदारांच्या नुकत्याच झालेल्या बदल्यांवरून ‘राज’कारण सुरू झाले आहेत. दोन ठाणेदारांना का हटविले नाही

शिवसेना-भाजपाची नाराजी : चार पोलीस ठाण्यांचा वादलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ठाणेदारांच्या नुकत्याच झालेल्या बदल्यांवरून ‘राज’कारण सुरू झाले आहेत. दोन ठाणेदारांना का हटविले नाही म्हणून शिवसेना नाराज आहे. तर आपल्या परवानगीशिवाय ठाणेदाराची केलेली बदली व दिलेली नेमणुक यावरून भाजपात नाराजी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी नुकत्याच ठाणेदारांच्या बदल्या केल्या. त्यात अनेक ठाण्यात फेरबदल करण्यात आले. राजकीय दबाव झुगारुन, मेरीटवर पारदर्शक पद्धतीने या बदल्या झाल्याचे मानले जाते. बदल्या करताना कार्यकाळ, भविष्यात येऊ घातलेले सण-उत्सव, कायदा व सुव्यवस्थेची संभाव्य स्थिती, कोर्ट-कचेरी आदीबाबी विचारात घेतल्या गेल्या. परंतु या बदल्यांबाबत सत्ताधारी भाजपा-सेनेची नेते मंडळी नाराज असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बुधवारी झालेल्या क्राईम मिटींगमध्येसुद्धा यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेला दिग्रस व दारव्हा या दोन ठाण्यात नवे चेहरे बसवायचे आहेत. तेथे अनुक्रमे शिवाजी बचाटे आणि अनिलसिंह गौतम हे ठाणेदार आहेत. त्यांची वागणूक व कामाच्या पद्धतीबाबत कार्यकर्त्यांनी नेत्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. या दोनही ठाणेदारांची कोणत्याही परिस्थितीत तत्काळ बदली करा, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अनिलसिंह गौतम हे उपअधीक्षक पदावरील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. यादी केव्हा निघते याकडे त्यांच्या नजरा लागल्या आहेत. शिवाजी बचाटे यांना दिग्रसमध्ये अद्याप वर्षही पूर्ण झाले नसताना त्यांची बदली करायची कशी असा प्रश्न पोलीस प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. त्यांची बदली केल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. दारव्हा व दिग्रस ही संवेदनशील ठिकाणे आहेत. तेथे अनुभवी ठाणेदारांची आवश्यकता आहे. समोर सण-उत्सव येऊ घातले आहे. त्या काळात तेथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान राहणार आहे. त्याचा विचारही प्रशासन करीत आहे. आर्णीतून उचलले व राळेगावात दिल्याने नाराजठाणेदारांच्या बदलीवरून आर्णी व राळेगावातील भाजपाची नेते मंडळी नाराज आहे. आपल्या पूर्वपरवानगीशिवाय आर्णीचे ठाणेदार संजय खंदाडे यांची बदली का केली, असा भाजपा नेत्यांचा सवाल आहे. तर खंदाडे यांना राळेगावचे ठाणेदार बनविले कसे, हा तेथील भाजपा नेत्यांचा प्रश्न आहे. राळेगाव ठाणेदाराच्या खुर्चीत अचानक नवा चेहरा दिला गेल्याने या खुर्चीतील जुन्या चेहऱ्यावर प्रचंड संताप पहायला मिळतो आहे. सत्ताधारी सेना-भाजपा नेत्यांच्या नाराजीमुळे पोलीस प्रशासनही पेचात सापडले आहे. प्रशासन कायदेशीर तरतुदी डोळ्यापुढे ठेऊन बदल्यांमधील मेरीटवर कायम राहते की, राजकीय नाराजी दूर करते याकडे लक्ष लागले आहे.