शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

भूसंपादनातून ‘रियल इस्टेट’ क्षेत्राला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:52 IST

आधीच मंदीची लाट व त्यात नोटाबंदी, जीएसटीने गेली काही वर्षे पूर्णत: कोलमडलेल्या ‘रियल इस्टेट’ क्षेत्राला आता भूसंपादनाच्या पैशांमुळे काहीशी का होईना नवसंजीवनी मिळू लागली आहे. रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्गाचा पैशाची गुंतवणूक होत असल्याने ‘रियल इस्टेट’ क्षेत्रात हलचल पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देमहामार्ग-रेल्वे मार्ग : यवतमाळात शेकडो कोटींची गुंतवणूक, फ्लॅट-दुकान गाळ्यांवर जोर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आधीच मंदीची लाट व त्यात नोटाबंदी, जीएसटीने गेली काही वर्षे पूर्णत: कोलमडलेल्या ‘रियल इस्टेट’ क्षेत्राला आता भूसंपादनाच्या पैशांमुळे काहीशी का होईना नवसंजीवनी मिळू लागली आहे. रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्गाचा पैशाची गुंतवणूक होत असल्याने ‘रियल इस्टेट’ क्षेत्रात हलचल पहायला मिळत आहे.भूसंपादनातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. शेतकऱ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. हा पैसा गुंतवावा कुठे याचा पेच या शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. पैसा बँकेत ठेवणे धोक्याचे आहे कारण सायबर गुन्हेगारी वाढली आहे. परस्परच खात्यातून पैसे वळविले जाऊ शकतात. सोन्यात गुंतवणूक केली तर त्याला एक मर्यादा आहे. शिवाय सोने सुरक्षित ठेवायचे कुठे ही समस्या आहे. बँकांच्या लॉकरमध्ये सोने ठेवले तरी बँका सरसकट त्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास तयार नाही. घरात सोने ठेवणे म्हणजे चोरांचे धन आहे. शेती खरेदी केली तर आधीच शेतीही तोट्याची झाली आहे. मक्ता-बटाईने देणे अथवा पडिक ठेवणे हे दोनच पर्याय त्यासाठी आहे. स्वत: शेती करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. म्हणूनच अनेकांनी भूसंपादनाच्या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी ‘रियल इस्टेट’चा मार्ग निवडला आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून मंदी आहे. गुंतवणूक होत नसली तरी गरजवंत मात्र राहण्यापुरते घर, फ्लॅट आवर्जुन खरेदी करीत आहे. मंदी असूनही हे क्षेत्र सुरक्षित वाटत असल्याने अलिकडे या क्षेत्रात गुंतवणूक होऊ लागली आहे. भूसंपादनाचा पैसा हाती आलेल्यांनीसुद्धा यवतमाळ जिल्हा मुख्यालयी किंवा तालुका मुख्यालयी प्लॉट, फ्लॅट यात गुंतवणूक वाढविली आहे. कुणी राहण्याची सोय म्हणून तर कुणी किरायाने देता येईल या इराद्याने ही गुंतवणूक चालविली आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून ‘रियल इस्टेट’ क्षेत्रात हलचल वाढली आहे. अनेक वर्ष थंडबस्त्यात पडून असलेल्या फ्लॅट स्किममधील फ्लॅट, दुकानगाळे विक्री जाऊ लागले आहे. गेल्या काही दिवसात अनेक स्किममधील फ्लॅटची मोठ्या प्रमाणात बुकींग झाली आहे. काहींनी टोकन दिले, कुणी इसार केला तर कुणी रिस्क नको म्हणून थेट खरेदीही केल्याची माहिती आहे. एकट्या यवतमाळात शेकडो कोटींची गुंतवणूक झाली असून हा आकडा लवकरच ७०० कोटींवर जाणार असल्याची माहिती आहे.दिवाळीनंतर आणखी वेगभूसंपादनाच्या पैशाच्या निमित्ताने का होईना ‘रियल इस्टेट’ क्षेत्रातील मंदी काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे. अन्य गुंतवणुकीतील धोका पाहता नागरिकांना ‘रियल इस्टेट’ क्षेत्र सुरक्षित वाटू लागले आहे. ही गुंतवणूक अशीच कायम राहिल्यास दिवाळीनंतर ‘रियल इस्टेट’चा बाजार आणखी खुलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण दिवाळीत नोकरदारांचा पैसा बाजारात येतो, त्यानंतर लगेच शेतमालाचीही उलाढाल होते. शिवाय यावेळी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका असल्याने ‘राजकीय फंड’ही मोठ्या प्रमाणात बाहेर निघणार आहे. त्यामुळे एकूणच बाजारात तेजीची चिन्हे असून त्याचा चांगला परिणाम रियल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीवर होणार असल्याचे मानले जाते.गुंतवणूकदारांनो, भूमाफियांपासून सावधान‘रियल इस्टेट’ क्षेत्रात गुंतवणूक होत असली तरी या गुंतवणूकदारांनी भूमाफियांपासून सावध रहाणे तेवढेच गरजेचे झाले आहे. कारण भूमाफियांनी दुसºयाचा भूखंड तिसºयाच्या नावावर परस्पर दाखविणे, त्यावर अनेक बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज उचलणे, हा कर्ज बोझा सातबारावर न चढविणे, तोच भूखंड आणखी कुणाला विकणे असे प्रकार सर्रास केले आहे.त्यावरून सात गुन्हे नोंदविले गेले. आतापर्यंत त्यात ११ आरोपींना अटकही करण्यात आली. सूत्रधार राकेश यादवसह साथीदार फरार आहे.‘मास्टर मार्इंड’ अद्याप शाबूतभूखंडाचा मालक बनावट आहे, त्याच्या खरेदी-विक्री व्यवहारातील कागदपत्रे, साक्षीदारसुद्धा बोगस आहेत, या भूखंडावर आधीच एका बँकेचे कर्ज आहे तरीही पुन्हा दुसºया बँकेकडे याच भूखंडावर कोट्यवधींचे कर्ज देण्यासाठी शिफारस करणारी मास्टर मार्इंड मंडळी राजकीय वरदहस्त असलेली व आर्थिक दृष्ट्या वजनदार आहे. त्यामुळेच आतापर्यंत सात गुन्हे दाखल होऊन व ११ आरोपी अटक होऊनसुद्धा हे मास्टर मार्इंड शाबूत आहेत. भविष्यात भूखंड घोटाळ्याचा तपास सीआयडी सारख्या स्वतंत्र यंत्रणेकडे गेल्यास या मास्टर मार्इंडच्या प्रतिष्ठेचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.रेल्वे भूसंपादनात १७७ कोटी वितरितवर्धा-यवतमाळ-नांदेड हा सुमारे १६०० कोटी रुपयांचा रेल्वे मार्ग होत आहे. जिल्ह्यातील त्याचे भूसंपादन पूर्णत्वाकडे आहे. रेल्वेसाठी ३३१ हेक्टर ३६ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. आतापर्यंत यातील ३०० हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. यापोटी १७७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. तर २२ कोटींचे बाकी आहे. वडगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील भूसंपादनाच्या ९४ प्रकरणांची प्रक्रिया सुरू आहे.राष्ट्रीय महामार्गासाठी ४६८ हेक्टर जमीननागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी ४६८ हेक्टर ६५ एकर जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यापैकी ३३९ हेक्टरचे भूसंपादन आतापर्यंत झाले आहे. त्यापोटी २१६ कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वितरण केले गेले. यातील तब्बल १५२ कोटी चार लाख रुपये एकट्या यवतमाळात वितरित झाले. भूसंपादनाचा हाच पैसा रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक म्हणून येत आहे. त्यामुळेच हलचल वाढली आहे.