शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

रेमंडची २५ वर्षे यवतमाळला समृद्ध करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

तत्कालीन उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे यवतमाळमध्ये मोठे प्रकल्प यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. मागासवर्गीय, आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्यात या उद्योगामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, याबरोबरच रोजगार निर्मितीही होईल, अशी बाबूजींची यामागे दूरदृष्टी होती. त्यांच्याच प्रयत्नातून यवतमाळ येथे उभारलेल्या औद्योगिक वसाहतीत १९९६ मध्ये इटालियन डेनिम मेजरच्या सहकार्याने अत्याधुनिक डेनिम फेब्रिक उत्पादन सुविधेसह हा मोठा प्रकल्प सुरू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लांब धाग्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळची पांढरे सोने पिकवणारा जिल्हा अशी राज्यभरात ओळख आहे. मात्र, विक्रमी कापूस उत्पादन होऊनही पूरक व्यवसाय नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कापूस विकावा लागत होता. २५ वर्षांपूर्वी रेमंड कंपनीने यवतमाळमध्ये पाऊल ठेवले. आज या उद्योगाद्वारे जवळपास तीन हजारांहून अधिक जणांना थेट रोजगार उपलब्ध झाला असून, या कंपनीमुळे यवतमाळच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळाली आहे.विदर्भातील कोरडे हवामान आणि काळी कसदार जमीन कापसासाठी पोषक असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. यातही यवतमाळ जिल्ह्याचा वाटा मोठा आहे. त्यामुळे कापूसपूरक उद्योग जिल्ह्यात यावा, यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी प्रयत्नशील होते. त्यांच्या पुढाकारातूनच यवतमाळ येथे औद्योगिक वसाहतीची उभारणी झाली. या वसाहतीत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रयत्नातून ‘रेमंड’ हा पहिला मोठा उद्योग सुरू झाला. २५ वर्षांपूर्वी व्यवस्थापनासह अवघ्या ४०० कर्मचाऱ्यांवर सुरू झालेल्या या उद्योगात आज तीन हजारांहून अधिकजण थेट रोजगारात आहेत. तर कापूस उत्पादकांसह कित्येकपट अधिक लोकांना या प्रकल्पाचा अप्रत्यक्षपणे लाभ होत आहे. कापूस उत्पादक शेतकरी, कामगार, कर्मचाऱ्यांच्या बळावरच रेमंडने १९९६ मध्ये ८० लाख मीटरवर असलेली कापड उत्पादन क्षमता आज चार कोटी २० लाख मीटरवर पोहोचवली आहे. विशेष म्हणजे, यातील ६० टक्के उत्पादन निर्यात केले जाते. आज रेमंड सर्वोत्तम श्रेणीतील डेनिम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. याच  कंपनीने भारतात सर्वप्रथम रिंग डेनिम सुरू केली. सध्या ती जगभरातील अग्रगण्य जीन्स ब्रँडना सेवा देते. ही बाबही यवतमाळसाठी गाैरवास्पद आहे. मध्यंतरीच्या काळात कामगार युनियनच्या संपामुळे यवतमाळातील ओरिएंट सिन्टेक्स आणि हिंदुस्तान लिवर हे उद्योग बंद पडले. त्यामुळे हजारो तरुणांना बेरोजगार व्हावे लागले. असाच संप रेमंडमध्येही करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, रेमंड बंद पडल्यास अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल, हे लक्षात आणून दिल्यानंतर तोडगा निघाला आणि रेमंडचा प्रवास पूर्ववत सुरू राहिला.एकूणच रेमंडचा मागील २५ वर्षांचा इतिहास या भागाला समृद्ध करणारा आहे. स्थानिक उपलब्ध साधनसामुग्रीचा योग्य वापर केल्यास संबंधित भागाच्या विकासाला दिशा देता येऊ शकते. उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, कर्मचाऱ्यांचे आयुष्य फुलवता येऊ शकते, हे रेमंडने यवतमाळमध्ये सिद्ध करून दाखवले आहे. आगामी काळातही हा उद्योग समूह या भागाच्या विकासाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची साक्ष     मिळते.राज्यात ३८ लाख क्विंटलहून अधिक कापसाचे उत्पादन होते. त्यात यवतमाळचा वाटा मोठा आहे. आज ही कंपनी दरवर्षी एक लाख २५ हजारहून अधिक कापूसगाठी वापरते. यातील बहुतांश कापूस हा यवतमाळात स्थानिक स्तरावर खरेदी केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा आधार मिळाला आहे. दुसरीकडे रेमंडने उत्पादन वाढवतानाच उद्योगाला आधुनिकतेची जोड दिली आहे. यूसीओची शाश्वत डेनिम श्रेणी ‘द ग्रीन लाईन’ तयार केली असून, कमी पाणी आणि मीठमुक्त डाईंगसारख्या कमी प्रभावी डाईंग तंत्राचा वापर करण्यासाठी व्हर्जिन कच्च्या मालाचा वापर कमी करण्यावर या श्रेणीचा भर आहे. हे उत्पादन तरुणाईला आकर्षित करत आहे.

एमआयडीसीतील पहिला मोठा प्रकल्प ठरला ‘रेमंड’तत्कालीन उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे यवतमाळमध्ये मोठे प्रकल्प यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. मागासवर्गीय, आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्यात या उद्योगामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, याबरोबरच रोजगार निर्मितीही होईल, अशी बाबूजींची यामागे दूरदृष्टी होती. त्यांच्याच प्रयत्नातून यवतमाळ येथे उभारलेल्या औद्योगिक वसाहतीत १९९६ मध्ये इटालियन डेनिम मेजरच्या सहकार्याने अत्याधुनिक डेनिम फेब्रिक उत्पादन सुविधेसह हा मोठा प्रकल्प सुरू झाला. त्यानंतर २००६ मध्ये रेमंडने बेल्जियम डेनिम प्रमुखसह संयुक्त उपक्रम हाती घेत जगभरात आपले उत्पादन पोहोचविण्यास सुरुवात केली. पुढे रेमंडचे गाैतम सिंघानिया यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधातून तत्कालीन राज्यसभा सदस्य तथा लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी रेमंडने यवतमाळात वाढीव उत्पादन घ्यावा असा आग्रह धरला आणि त्यानुसार गाैतम सिंघानिया यांनी यवतमाळातील उद्योगाचा विस्तार केला. आज या उद्योगामुळे हजारो कुटुंबीयांना हक्काची रोजीरोटी मिळाली असून, शेतकऱ्यांच्या कापसालाही बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. 

पर्यावरण सुरक्षेतही रेमंडचे नाणे खणखणीत- मागील चार वर्षांमध्ये रेमंडने ताज्या पाण्याचा वापरही सुमारे ४० टक्क्याने कमी केला आहे. कारखाना परिसरात ७५ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षात ६५ मेट्रिक टन ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी होऊ शकले. या सर्व उपक्रमांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली. केंद्र सरकारचा राष्ट्रीय जल अभियान, पर्यावरण व्यवस्थापनासाठी राज्य प्रदूषण मंडळाच्या पुरस्कारासह पर्यावरण उत्कृष्टतेसाठी दिला जाणारा सुवर्ण मयुर पुरस्कारही कंपनीने तब्बल चारवेळा मिळविला आहे. आज रजत जयंती महोत्सव सोहळा- रेमंडच्या २५ वर्षांनिमित्त शनिवार, २३ ऑक्टोबर रोजी रेमंड इको डेनिम प्रा. लि. गेस्ट हाऊस, लोहारा येथे दुपारी २ वाजता रजत जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा, रेमंडचे गाैतम सिंघानिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाRaymondरेमंड