शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राठोड बंधूंची भरारी : बोरगाव येथे ऑईल मिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:00 AM

या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. त्यांनी ठरवलं की, आपण नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोघांनाही शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विश्वजितने स्वत:चे शिक्षण बंद करून मोठ्या भावाच्या अर्थात रंजितच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यासाठी दुसऱ्याच्या चहा टपरीवर, रसवंतीवर, स्टेशनरी दुकानात कामे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : माणसाच्या मनात जिद्द व परिश्रम घेण्याची उर्मी असली की, कोणतीही गोष्ट साध्य करता येते. याची प्रचिती तालुक्यातील बोरगाव येथील राठोड बंधूनी दिली अहे. रंजित आणि विश्वजित या भावंडांनी स्वत: बरोबरच गावातील ३00 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. त्यांनी ठरवलं की, आपण नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोघांनाही शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विश्वजितने स्वत:चे शिक्षण बंद करून मोठ्या भावाच्या अर्थात रंजितच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यासाठी दुसऱ्याच्या चहा टपरीवर, रसवंतीवर, स्टेशनरी दुकानात कामे केली. या कामातून तुटपुंजी मिळकत होत असल्याने कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले होते. अखेर विश्वजितने आपल्या गावी बोरगाव येथे शेतात राबण्यास सुरूवात केली.कापूस वेचणीपासून त्याने शेतातील कामास सुरूवात केली. नंतर गावात मिळेल ती कामे तो करू लागला. चार ते पाच वर्ष दुसºयाकडे शेतीची कामे केली. नंतर दुसऱ्यांची शेती भाडेतत्त्वावर करण्यास सुरूवात केली. त्यात कपाशीची पेरणी करून चांगले उत्पन्न घेतले. कापूस आर्णीत आणून विकला. सोबतच दुसºया शेतकºयांचा कापूसही विक्रीस आणू लागला. यातून त्याचे व्यापाºयांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण झाले. मग विश्वजितने स्वत:च कापूस खरेदीचा व्यवसाय सुरू केला.या दरम्यान, मोठा भाऊ रंजितचे शिक्षण पूर्ण करून तो पुण्याला नोकरीच्या शोधात गेला. तेथे माहेश्वरी मंडळात त्याल्या नोकरी मिळाली. त्या नोकरीच्या पगारात भागत नसल्यामुळे तो यवतमाळला परत आला. एका फायनान्स कंपनीत काम करू लागला. तेथे तीन-चार वर्षे काम केल्यानंतर रंजितने लहान भाऊ विश्वजित बरोबर काम करायचा निर्णय घेतला.या भावंडांनी कापूस खरेदीचा व्यवसाय वाढवला. त्यातून शेतकºयांची मने जिंकली. नंतर बोरगाव येथेच जिनिंग टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र जागा उपलब्ध नसल्याने स्वप्न साकार होईल की नाही, या काळजीत असताना त्यांना नानाजी लिंगावार, दीपक शामराव पाटील यांनी जागेचा प्रश्न सोडविला. तरुण राठोड बंधूंना त्यांनी उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा दिली. त्या जागी जिनिंगची वास्तू उभी करून राठोड बंधूंनी गावातच कापूस खरेदी सुरु केली. जिनिंगसाठी लागणारी यंत्रे महागडी असल्याने त्यांनी प्रथम भंगारात विकलेल्या मशीन उपयोगात आणल्या.अंगभूत क्षमतांची जाणीवअनेक उद्योग उभारण्याची क्षमता आपल्या अंगी असल्याचे ओळखून राठोड बंधूंनी २०१८ मध्ये गावातच मानुदास आॅइल मिलची सुरुवात केली. या मिलमधून जवळपास ३00 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. एकेकाळी दुसºयाच्या चहा टपरीवर काम करणाºया राठोड बंधूंनी गावातच स्वत:चा उद्योग उभारून इतरांच्या रोजगाराचा प्रश्न मिटविला. सध्या हे भाऊ ३00 कुटुंबाचे पोषणकर्ते बनले आहे.

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प