शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

राज्यातल्या १८ जिल्ह्यांतील गुन्हे शाबितीचे प्रमाण दहा टक्क्यांच्याही आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 11:06 IST

राज्यातील प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या खटल्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण चिंताजनक आहे. १८ जिल्ह्यात तर हे प्रमाण दहा टक्क्यांच्याही खाली असल्याचा अहवाल खुद्द राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने राज्याच्या गृहसचिवांना सादर केला आहे.

ठळक मुद्देसीआयडीचा अहवाल सरकारी अभियोक्त्यांच्या ‘परफॉर्मन्स’ची तपासणी

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या खटल्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण चिंताजनक आहे. १८ जिल्ह्यात तर हे प्रमाण दहा टक्क्यांच्याही खाली असल्याचा अहवाल खुद्द राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने राज्याच्या गृहसचिवांना सादर केला आहे.भारतीय दंडसंहिता व अन्य प्रकारातील गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण सर्वात कमी असलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये हिंगोली, कोल्हापूर, परभणी, लातूर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर, नांदेड, सांगली, गोंदिया, अकोला, बीड, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर व बुलडाणाचा समावेश आहे. १० ते २० टक्क्यांदरम्यान असलेल्या नऊ जिल्ह्यांमध्ये वर्धा, गडचिरोली, नंदूरबार, चंद्रपूर, उस्मानाबाद, सातारा, अमरावती, जालना व भंडाराचा समावेश आहे.न्यायालयात दाखल खटल्यातील गुन्हे शाबितीच्या आढाव्याची त्रैमासिक बैठक २५ आॅक्टोबर २०१७ ला झाली होती. त्यात पुणे सीआयडीच्या अपर पोलीस महासंचालकांनी आपला विश्लेषणात्मक अहवाल अपर मुख्य सचिवांना (गृह) सादर केला. त्यानंतर २ डिसेंबरला अभियोग संचालनालयात त्यावर चर्चा झाली. त्यातील अहवालाच्या प्रती नुकत्याच राज्यातील सर्व सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांना (एपीपी) पाठविण्यात आल्या आहेत. आगामी त्रैमासिक बैठकीसाठी त्यांच्या ताज्या ‘परफॉर्मन्स’ची अर्थात गुन्हे शाबितीच्या प्रमाणाची माहिती मागण्यात आली आहे. प्रमाण कमी असण्यामागील कारणेही विचारण्यात आली आहेत. या माहितीच्या आधारे सीआयडी नवा अहवाल शासनाला सादर करणार आहे.शिक्षेचे प्रमाण २० टक्क्यापर्यंत असलेल्या नऊ जिल्ह्यांमध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश असून त्यात वर्धा पहिल्या क्रमांकावर आहे.

सरकारी वकिलांना प्रोत्साहनगुन्हे शाबितीच्या प्रमाणात जिल्ह्याच्या सरासरी आकडेवारीत घट दिसत असली तरी काही सरकारी अभियोक्त्यांची कामगिरी ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. राज्यातील अशा काही सहाय्यक सरकारी वकिलांना प्रोत्साहन म्हणून गृहखात्याकडून गौरविले जाणार आहे.निर्दोष सुटकेमागील कारणेन्यायालयात दाखल खटल्यात गुन्हे सिद्ध न होणे, पर्यायाने शिक्षा न होणे, त्यातून गुन्हे शाबितीची टक्केवारी घटणे, आरोपी निर्दोष सुटणे यामागे विविध कारणे सांगितली जातात. पंच-साक्षीदार फितूर होणे, सदोष तपास, टायमिंग मॅच न होणे, तेच ते पंच असल्याने कोर्टाचा त्यांच्यावर नसलेला विश्वास, सदोष जप्ती पंचनामा, सरकारी पंचाचा अभाव, सरकारी वकिलांना चार्जशिटची (पीपी सेट) प्रत न मिळणे आदी प्रमुख कारणे पुढे आली आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा