शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा तांड्यावरील रंगोत्सव व होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:39 IST

राम पवार सावळी सदोबा : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आणि विविध जाती, धर्मात विभागलेल्या खंडप्राय भारतात बंजारा हा एक आदीम ...

राम पवार

सावळी सदोबा : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आणि विविध जाती, धर्मात विभागलेल्या खंडप्राय भारतात बंजारा हा एक आदीम समाज वास्तव्य करीत आहे. त्यांची लोकसंस्कृती आदीम व पुरातन आहे. एकोपा आणि सांस्कृतिक सण उत्सवाचा इतिहास लाभलेल्या बंजारा समाजात जे विविध सण साजरे होतात, त्यात रंगोत्सवाचा होळी हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो.

शिशिर ऋतू संपून झाडाची पानगळ थांबलेली असते. वनाग्नी किंवा 'फ्लेम ऑफ दी फॉरेस्ट' म्हणून ओळखला जाणारा पळस रानात केशरी रंगाची उधळण करतो. जस-जसा आंब्याला मोहर येऊन त्याच्या सुगंधाने कोकिळा मल्हार राग गाते, त्याचप्रमाणे वसंत ऋतूत लेंगी गीताला बहार येतो. माघ पौर्णिमेपासून तांड्यावरचा बंजारा बांधव शेतावरच्या जागलीवर, खळ्यावर किंवा तांड्यात लेंगीचा आस्वाद घेऊ लागतो. बैठी, पायी आणि टिपरी लेंगीच्या आनंदात बुडून गेलेल्या गोर बंजाराला होळीचा दिवस कधी जवळ येऊन ठेपतो, त्याचा थांगपत्ताही नसतो.

होळी उत्सवाची जबाबदारी तांड्यातील गेरियांच्या म्हणजे उपवर तरुणांच्या खांद्यावर असते. ते होळीच्या पूर्वसंध्येला मुलांनी शेणापासून तयार केलेल्या विविध आकाराच्या गवऱ्या व त्यांच्या माळा एकत्रित करतात. सर्वांना एकत्र करून होळी जाळण्याची तयारी करतात. मात्र, होळी सकाळी जाळतात. कारण असे की, एकेकाळी कधीतरी होळी जाळण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या बंजारा बांधवांनी विविध प्रकारच्या लेंगी गीतात आणि सल्लामसलत करण्यात अख्खी चांदणी रात्र व्यतीत केल्याची आणि रंगपंचमीच्या दिवशी सकाळी होळी जाळून आनंद साजरा केल्याची आख्यायिका आहे. पूर्वजांची ही प्रथा आजही जपून ठेवण्यात आली. तांड्यात होळी महोत्सव साजरा करण्यामागचा हेतू केवळ मौज-मजा करणे आणि वातावरण आनंदी ठेवणे एवढाच नसतो, तर थोर संतांच्या विचारांचा जागर करून प्रचार व प्रसार करणे, पर्यावरणाच्या संतुलनातून मानवी कल्याण कसे साध्य होईल, याविषयी जनजागृती करणे आणि बंजारा संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन करून ती पुढच्या पिढीला अवगत करणे, हा मुख्य हेतू असतो.

बॉक्स

पाळोदी येथे पारंपारिक वेशभूषेत होळी

आर्णी तालुक्यातील बंजाराबहुल सावळी सदोबा परिसरातील पाळोदी येथे होळी उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक वेशभूषा करून बंजारा समाजबांधव त्यात सहभागी होतात. निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजात होळी जाळण्याच्या ठिकाणी एरंडाच्या झाडाची पाने आणि कळशीभर पाणी आणून होळीची पूजा केली जाते. यात वरवर त्याची अंधश्रद्धा दिसत असली तरी तांड्याच्या सुरक्षिततेची दूरदृष्टी त्यात लपलेली असते. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी तांड्यातील गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाच्या घरी जाण्याची, पारंपरिक लोकगीताच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्याचा मोबदला म्हणजे फगवा मागण्याची आणि आलेल्या पैशांतून सामूहिक वनभोजन करून होळी उत्सवाची सांगता करण्याची प्रथा आहे.