शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

बंजारा तांड्यावरील रंगोत्सव व होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:39 IST

राम पवार सावळी सदोबा : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आणि विविध जाती, धर्मात विभागलेल्या खंडप्राय भारतात बंजारा हा एक आदीम ...

राम पवार

सावळी सदोबा : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आणि विविध जाती, धर्मात विभागलेल्या खंडप्राय भारतात बंजारा हा एक आदीम समाज वास्तव्य करीत आहे. त्यांची लोकसंस्कृती आदीम व पुरातन आहे. एकोपा आणि सांस्कृतिक सण उत्सवाचा इतिहास लाभलेल्या बंजारा समाजात जे विविध सण साजरे होतात, त्यात रंगोत्सवाचा होळी हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो.

शिशिर ऋतू संपून झाडाची पानगळ थांबलेली असते. वनाग्नी किंवा 'फ्लेम ऑफ दी फॉरेस्ट' म्हणून ओळखला जाणारा पळस रानात केशरी रंगाची उधळण करतो. जस-जसा आंब्याला मोहर येऊन त्याच्या सुगंधाने कोकिळा मल्हार राग गाते, त्याचप्रमाणे वसंत ऋतूत लेंगी गीताला बहार येतो. माघ पौर्णिमेपासून तांड्यावरचा बंजारा बांधव शेतावरच्या जागलीवर, खळ्यावर किंवा तांड्यात लेंगीचा आस्वाद घेऊ लागतो. बैठी, पायी आणि टिपरी लेंगीच्या आनंदात बुडून गेलेल्या गोर बंजाराला होळीचा दिवस कधी जवळ येऊन ठेपतो, त्याचा थांगपत्ताही नसतो.

होळी उत्सवाची जबाबदारी तांड्यातील गेरियांच्या म्हणजे उपवर तरुणांच्या खांद्यावर असते. ते होळीच्या पूर्वसंध्येला मुलांनी शेणापासून तयार केलेल्या विविध आकाराच्या गवऱ्या व त्यांच्या माळा एकत्रित करतात. सर्वांना एकत्र करून होळी जाळण्याची तयारी करतात. मात्र, होळी सकाळी जाळतात. कारण असे की, एकेकाळी कधीतरी होळी जाळण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या बंजारा बांधवांनी विविध प्रकारच्या लेंगी गीतात आणि सल्लामसलत करण्यात अख्खी चांदणी रात्र व्यतीत केल्याची आणि रंगपंचमीच्या दिवशी सकाळी होळी जाळून आनंद साजरा केल्याची आख्यायिका आहे. पूर्वजांची ही प्रथा आजही जपून ठेवण्यात आली. तांड्यात होळी महोत्सव साजरा करण्यामागचा हेतू केवळ मौज-मजा करणे आणि वातावरण आनंदी ठेवणे एवढाच नसतो, तर थोर संतांच्या विचारांचा जागर करून प्रचार व प्रसार करणे, पर्यावरणाच्या संतुलनातून मानवी कल्याण कसे साध्य होईल, याविषयी जनजागृती करणे आणि बंजारा संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन करून ती पुढच्या पिढीला अवगत करणे, हा मुख्य हेतू असतो.

बॉक्स

पाळोदी येथे पारंपारिक वेशभूषेत होळी

आर्णी तालुक्यातील बंजाराबहुल सावळी सदोबा परिसरातील पाळोदी येथे होळी उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक वेशभूषा करून बंजारा समाजबांधव त्यात सहभागी होतात. निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजात होळी जाळण्याच्या ठिकाणी एरंडाच्या झाडाची पाने आणि कळशीभर पाणी आणून होळीची पूजा केली जाते. यात वरवर त्याची अंधश्रद्धा दिसत असली तरी तांड्याच्या सुरक्षिततेची दूरदृष्टी त्यात लपलेली असते. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी तांड्यातील गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाच्या घरी जाण्याची, पारंपरिक लोकगीताच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्याचा मोबदला म्हणजे फगवा मागण्याची आणि आलेल्या पैशांतून सामूहिक वनभोजन करून होळी उत्सवाची सांगता करण्याची प्रथा आहे.