शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बंजारा तांड्यावरील रंगोत्सव व होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:39 IST

राम पवार सावळी सदोबा : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आणि विविध जाती, धर्मात विभागलेल्या खंडप्राय भारतात बंजारा हा एक आदीम ...

राम पवार

सावळी सदोबा : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आणि विविध जाती, धर्मात विभागलेल्या खंडप्राय भारतात बंजारा हा एक आदीम समाज वास्तव्य करीत आहे. त्यांची लोकसंस्कृती आदीम व पुरातन आहे. एकोपा आणि सांस्कृतिक सण उत्सवाचा इतिहास लाभलेल्या बंजारा समाजात जे विविध सण साजरे होतात, त्यात रंगोत्सवाचा होळी हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो.

शिशिर ऋतू संपून झाडाची पानगळ थांबलेली असते. वनाग्नी किंवा 'फ्लेम ऑफ दी फॉरेस्ट' म्हणून ओळखला जाणारा पळस रानात केशरी रंगाची उधळण करतो. जस-जसा आंब्याला मोहर येऊन त्याच्या सुगंधाने कोकिळा मल्हार राग गाते, त्याचप्रमाणे वसंत ऋतूत लेंगी गीताला बहार येतो. माघ पौर्णिमेपासून तांड्यावरचा बंजारा बांधव शेतावरच्या जागलीवर, खळ्यावर किंवा तांड्यात लेंगीचा आस्वाद घेऊ लागतो. बैठी, पायी आणि टिपरी लेंगीच्या आनंदात बुडून गेलेल्या गोर बंजाराला होळीचा दिवस कधी जवळ येऊन ठेपतो, त्याचा थांगपत्ताही नसतो.

होळी उत्सवाची जबाबदारी तांड्यातील गेरियांच्या म्हणजे उपवर तरुणांच्या खांद्यावर असते. ते होळीच्या पूर्वसंध्येला मुलांनी शेणापासून तयार केलेल्या विविध आकाराच्या गवऱ्या व त्यांच्या माळा एकत्रित करतात. सर्वांना एकत्र करून होळी जाळण्याची तयारी करतात. मात्र, होळी सकाळी जाळतात. कारण असे की, एकेकाळी कधीतरी होळी जाळण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या बंजारा बांधवांनी विविध प्रकारच्या लेंगी गीतात आणि सल्लामसलत करण्यात अख्खी चांदणी रात्र व्यतीत केल्याची आणि रंगपंचमीच्या दिवशी सकाळी होळी जाळून आनंद साजरा केल्याची आख्यायिका आहे. पूर्वजांची ही प्रथा आजही जपून ठेवण्यात आली. तांड्यात होळी महोत्सव साजरा करण्यामागचा हेतू केवळ मौज-मजा करणे आणि वातावरण आनंदी ठेवणे एवढाच नसतो, तर थोर संतांच्या विचारांचा जागर करून प्रचार व प्रसार करणे, पर्यावरणाच्या संतुलनातून मानवी कल्याण कसे साध्य होईल, याविषयी जनजागृती करणे आणि बंजारा संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन करून ती पुढच्या पिढीला अवगत करणे, हा मुख्य हेतू असतो.

बॉक्स

पाळोदी येथे पारंपारिक वेशभूषेत होळी

आर्णी तालुक्यातील बंजाराबहुल सावळी सदोबा परिसरातील पाळोदी येथे होळी उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक वेशभूषा करून बंजारा समाजबांधव त्यात सहभागी होतात. निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजात होळी जाळण्याच्या ठिकाणी एरंडाच्या झाडाची पाने आणि कळशीभर पाणी आणून होळीची पूजा केली जाते. यात वरवर त्याची अंधश्रद्धा दिसत असली तरी तांड्याच्या सुरक्षिततेची दूरदृष्टी त्यात लपलेली असते. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी तांड्यातील गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाच्या घरी जाण्याची, पारंपरिक लोकगीताच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्याचा मोबदला म्हणजे फगवा मागण्याची आणि आलेल्या पैशांतून सामूहिक वनभोजन करून होळी उत्सवाची सांगता करण्याची प्रथा आहे.