शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रावेरी गावातील रामायणकालीन आख्यायिकांना मिळाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

गेली महिनाभरापासून दूरचित्रवाहिनीवर सुरू झालेल्या रामायण मालिकेत २६ एप्रिलपासून प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेचा त्याग, वनवास आदी प्रसंग दाखविले जात आहे. राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरीतील आख्यायिका यानिमित्त सांगितल्या जात आहेत. हा भाग पूर्वीचा दंडकारण्याचा मानला जातो.

ठळक मुद्देदंडकारण्याचा भाग । सीतेचे अनेक वर्षे वास्तव्य, वाल्मिक ऋषींची समाधीही आहे

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : दूरचित्रवाहिनीवर सुरू असलेल्या ‘रामायण’ मालिकेमुळे रावेरीतील रामायणकालीन आख्यायिकांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. सीतेचे वास्तव्य, लव-कुश यांचा जन्म, वाल्मिक ऋषींची समाधी यासह सीतेला गावकऱ्यांनी नाकारलेले गहू आदी अनेक गोष्टी यानिमित्ताने चर्चिल्या जात आहे.गेली महिनाभरापासून दूरचित्रवाहिनीवर सुरू झालेल्या रामायण मालिकेत २६ एप्रिलपासून प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेचा त्याग, वनवास आदी प्रसंग दाखविले जात आहे. राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरीतील आख्यायिका यानिमित्त सांगितल्या जात आहेत. हा भाग पूर्वीचा दंडकारण्याचा मानला जातो. प्रभू रामचंद्र यांच्या राज्याभिषेकानंतर सीता वनवासात भटकत असताना रावेरीत अनेक वर्षे वास्तव्यास होती. लव-कुश यांचा जन्म येथेच झाला. सीतेची न्हानी येथेच आहे. बारमाही वाहणारी रामगंगानदी ही रामायणातील तमसा नदी उत्तरवाहिनी आहे. वाल्मिक ऋषींची समाधी याठिकाणी आहे. लव-कुश यांच्या जन्मानंतर सीतेने गावकऱ्यांना गहू मागितले होते. त्याकाळी त्यांना कुणी गहू दिले नाही. त्यामुळे सीतेने येथे कधी गहू पिकणार नाही, असा शाप दिला होता. यामुळेच की काय गेली काही वर्षांपर्यंत गहू पिकत नव्हता असे सांगितले जाते. अश्वमेध यज्ञाचा घोडा लव-कुश यांनी रावेरी येथेच अडविला होता. यज्ञाचा घोडा परत नेण्यासाठी आलेल्या हनुमंताला लव-कुश यांनी याच ठिकाणी बांधून ठेवले होते, अशी आख्यायिका आहे. हनुमानाची १३ फुटांची मूर्ती अनेक शतकांपासून येथे रामायण काळातील घडामोडींची साक्ष देत उभी आहे. रामायणकालीन अनेक घटनांची साक्ष देणारी स्थळे येथेच आहेत. त्याप्रमाणे आख्यायिकाही प्रचलित राहिल्या आहे.देशातील एकमेव सीता मंदिरदेशात रामाची मंदिरे अनेक आहेत. पण सीतामाईचे हे एकमेव मंदिर रावेरीत आहे. दरवर्षी सीतानवमीला या गावात लहानमोठे कार्यक्रम होतात. शुक्रवारी सीमानवमी झाली पण, संचारबंदीच्या प्रतिबंधामुळे औपचारिकतेत कार्यक्रम पार पडला. एकूणच रामायण मालिकेने रावेरीच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा त्या काळातील ऐतिहासीक, पौराणिक घटनाक्रम समोर आला.

टॅग्स :Socialसामाजिक