शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

रावेरी गावातील रामायणकालीन आख्यायिकांना मिळाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

गेली महिनाभरापासून दूरचित्रवाहिनीवर सुरू झालेल्या रामायण मालिकेत २६ एप्रिलपासून प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेचा त्याग, वनवास आदी प्रसंग दाखविले जात आहे. राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरीतील आख्यायिका यानिमित्त सांगितल्या जात आहेत. हा भाग पूर्वीचा दंडकारण्याचा मानला जातो.

ठळक मुद्देदंडकारण्याचा भाग । सीतेचे अनेक वर्षे वास्तव्य, वाल्मिक ऋषींची समाधीही आहे

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : दूरचित्रवाहिनीवर सुरू असलेल्या ‘रामायण’ मालिकेमुळे रावेरीतील रामायणकालीन आख्यायिकांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. सीतेचे वास्तव्य, लव-कुश यांचा जन्म, वाल्मिक ऋषींची समाधी यासह सीतेला गावकऱ्यांनी नाकारलेले गहू आदी अनेक गोष्टी यानिमित्ताने चर्चिल्या जात आहे.गेली महिनाभरापासून दूरचित्रवाहिनीवर सुरू झालेल्या रामायण मालिकेत २६ एप्रिलपासून प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेचा त्याग, वनवास आदी प्रसंग दाखविले जात आहे. राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरीतील आख्यायिका यानिमित्त सांगितल्या जात आहेत. हा भाग पूर्वीचा दंडकारण्याचा मानला जातो. प्रभू रामचंद्र यांच्या राज्याभिषेकानंतर सीता वनवासात भटकत असताना रावेरीत अनेक वर्षे वास्तव्यास होती. लव-कुश यांचा जन्म येथेच झाला. सीतेची न्हानी येथेच आहे. बारमाही वाहणारी रामगंगानदी ही रामायणातील तमसा नदी उत्तरवाहिनी आहे. वाल्मिक ऋषींची समाधी याठिकाणी आहे. लव-कुश यांच्या जन्मानंतर सीतेने गावकऱ्यांना गहू मागितले होते. त्याकाळी त्यांना कुणी गहू दिले नाही. त्यामुळे सीतेने येथे कधी गहू पिकणार नाही, असा शाप दिला होता. यामुळेच की काय गेली काही वर्षांपर्यंत गहू पिकत नव्हता असे सांगितले जाते. अश्वमेध यज्ञाचा घोडा लव-कुश यांनी रावेरी येथेच अडविला होता. यज्ञाचा घोडा परत नेण्यासाठी आलेल्या हनुमंताला लव-कुश यांनी याच ठिकाणी बांधून ठेवले होते, अशी आख्यायिका आहे. हनुमानाची १३ फुटांची मूर्ती अनेक शतकांपासून येथे रामायण काळातील घडामोडींची साक्ष देत उभी आहे. रामायणकालीन अनेक घटनांची साक्ष देणारी स्थळे येथेच आहेत. त्याप्रमाणे आख्यायिकाही प्रचलित राहिल्या आहे.देशातील एकमेव सीता मंदिरदेशात रामाची मंदिरे अनेक आहेत. पण सीतामाईचे हे एकमेव मंदिर रावेरीत आहे. दरवर्षी सीतानवमीला या गावात लहानमोठे कार्यक्रम होतात. शुक्रवारी सीमानवमी झाली पण, संचारबंदीच्या प्रतिबंधामुळे औपचारिकतेत कार्यक्रम पार पडला. एकूणच रामायण मालिकेने रावेरीच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा त्या काळातील ऐतिहासीक, पौराणिक घटनाक्रम समोर आला.

टॅग्स :Socialसामाजिक