शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
3
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
4
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
5
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
6
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
7
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
8
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
9
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
10
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
11
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
12
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
13
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
14
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
15
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
16
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
17
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
18
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
19
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
20
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
Daily Top 2Weekly Top 5

रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 06:42 IST

Morari bapu katha live: पहिल्या दिवशी हनुमान गाथा मांडल्यानंतर कथाकार मोरारीबापूंनी दुसऱ्या दिवशी रामकथेतील ‘वंदना प्रकरणा’ला सुरुवात केली.

यवतमाळ : ‘रामायण ही केवळ कथा नाही, तर धर्म शिकवणारी आणि जीवन जगण्याची कला आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध आध्यात्मिक संत आणि प्रख्यात कथाकार मोरारीबापूंनी रामकथेच्या दुसऱ्या दिवशी केले. पहिल्या दिवशी हनुमान गाथा मांडल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी रामकथेतील ‘वंदना प्रकरणा’ला सुरुवात केली.

राजा दशरथाने दिलेल्या दोन वचनांच्या संदर्भाने रामकथेची गाथा पुढे नेली. भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास या घटना पितृभक्ती आणि मातृशक्तीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. पुत्राचा सर्वांत मोठा धर्म म्हणजे आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेचा मान राखणे. रामायणामध्ये इक्ष्वाकू, दिलीप, रघू, अज, दशरथ व त्यानंतर राम हे विविध ब्रह्मांडांत वेगवेगळ्या रूपांत असल्याची परंपरा आहे. त्यामुळे श्राद्धपक्षात किमान पाच ते सात पिढ्यांचे स्मरण करण्याचा सल्ला मोरारीबापू यांनी दिला.

‘समाधान, त्याग आणि वैराग्य हेच आपल्या परंपरेचे आरसे आहेत. मुंगीपासून सूर्यापर्यंत प्रत्येक जीवाला वंदन करावे. आयुष्यात जास्त लालसा न ठेवता निसर्गाशी एकरूप व्हा,’ असे सांगत त्यांनी गती म्हणजे आतला विकास आणि वेग म्हणजे बाहेरचा हलकल्लोळ आहे हाच गती आणि वेगातील फरक स्पष्ट केला. हाच संदेश युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी नियती, निमित्त आणि नीती हे गीतेचे तीन संदेश सांगितले. 

मोरारीबापू म्हणाले, विज्ञानाचा चमत्कार पाहा. यवतमाळ येथे सुरू असलेला हा रामकथा सोहळा दररोज १७० देशांतील भाविक पाहत आहेत. ‘लोकमत भक्ती’ या यू-ट्यूब चॅनेलसह ‘लोकमत डॉटकॉम’ व आस्था चॅनलवरून या कार्यक्रमाचे थेट लाइव्ह प्रक्षेपण सुरू आहे.

कर्माने फळासाठी नव्हे, विश्रांतीसाठी असावे

मोरारीबापूंनी सिद्धीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, ‘सिद्धी म्हणजे चमत्कार नव्हे, तर शुद्धी आहे वचनशुद्धी, विचारशुद्धी, मनशुद्धी, चित्तशुद्धी, बुद्धिशुद्धी, अहंकारशुद्धी आणि ईश्वर स्मरण ही खरी सिद्धी असल्याचे सांगत गुरूने दिलेला विश्वास जपा; सुफी परंपरेत यालाच ‘डिझाईन’ म्हणतात.’ 

त्यांनी आदिशंकराचार्यांनी सांगितलेल्या पाच विश्वासांचा वचनविश्वास, मंत्रविश्वास, ध्रुवविश्वास, पात्रविश्वास आणि वटविश्वास यांचा उल्लेख करून वटवृक्षाप्रमाणे आपल्या कर्माने फळासाठी नव्हे तर विश्रांतीसाठी असावे, असा संदेश दिला.

रामकथेतून सत्य, प्रेम, करुणेचा मार्ग : डॉ. दर्डा

बापूजींची कथा ही केवळ रामकथा नसून खरी जीवनकथा आहे. त्यांच्या वाणीमुळे सत्य, प्रेम आणि करुणेचा मार्ग दिसतो. आपण यवतमाळ तसेच आमच्या विदर्भासाठी एका पवित्र तीर्थासमान आहात, आपल्या कथेमुळे नवीन चेतना आणि ऊर्जेचा संचार होत असून आज रामकथा जिथे सुरू आहे, तो परिसर आमच्यासाठी खऱ्या अर्थाने संस्कारतीर्थ व संस्कारयज्ञ बनला आहे. आपण देत असलेला रामनामाचा मधुर रस जीवनाचा सत्यमार्ग दाखवतो, असे सांगताना त्यांनी यवतमाळमध्ये कार्यक्रमादरम्यान बरसलेल्या पावसाचा विशेष उल्लेख केला, पाण्याचे आमचे जुने नाते आहे, आम्ही जेव्हा-जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम घेतो, तेव्हा-तेव्हा पाऊस बरसतोच, असे सांगत ‘ऐ कज़ा तुझे जीद है, यहाँ बिजलीयाँ गिराने की, हमें भी जीद है, वहीं आशियाँ बनाने की...’ हा शेर सादर करत वातावरण भारावून टाकले.

टॅग्स :ramayanरामायणReligious programmeधार्मिक कार्यक्रम