शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

यवतमाळमध्ये पावसाची संततधार सुरुच; बेंबळा प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडले, अनेक गावांत पूरस्थिती

By विशाल सोनटक्के | Updated: July 18, 2022 13:30 IST

अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ मीटरने तर, बेंबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले. अनेक वाड्या-वस्त्यांना पुराचा वेढा.

ठळक मुद्देसरूळ गावातील पुरात अडकलेल्या ११ नागरिकांची सुटका

यवतमाळ : सतत कोसळणाऱ्या पावसाने राळेगाव तालुक्याची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या ठिकाणी बेंबळा, अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाच वेळी नदी पात्रात आल्याने नाल्यांचे पाणी गाव शेजारीच थांबले आहे. यातून गावांमध्ये पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत राळेगाव तालुक्यातील १०० घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथील वर्धा नदीवर बांधलेल्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. अपर वर्धा प्रकल्पाचे सर्व १३ दरवाजे पहाटे ५ वाजता १५० सेमीने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने बाभूळगावसह कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

राळेगाव तालुक्यातील सावंगी गावामध्ये ३० घरांना पुराचा वेढा पडला आहे. एकबोर्जी गावातील ३५ घरे पुराच्या पाण्यात आली आहे. झाडगाव येथील ३० घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. रावेरी येथील १५ घरे, चिकणा येथील १२ घरे व सावनेर मधील १० घरांना पुराचा वेढा बसला आहे.

अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ मीटरने उघडण्यात आले आहे. पुढील काही तास पाणी असेच राहिले तर आणखी दोन दरवाजे पूस प्रकल्पाचे उघडले जाणार आहे. बेंबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, कळंब तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला 

बाभूळगाव तालुक्यातील सरुळ गावामध्ये पाणी शिरले. या ठिकाणचे ११ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. यातील सात नागरिकांना ग्रामस्थांनी बोटीच्या मदतीने बाहेर काढले. मात्र चार नागरिक मंदिरावरच चढून होते. आपत्ती व्यवस्थापन बोट आल्याशिवाय उतरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर तालुक्यातून बोट या गावात पोहोचली. चार नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने पुरातून बाहेर काढले.

पुरात अडकलेल्या २० ग्रामस्थांना सुखरुप काढले बाहेरबेंबळा प्रकल्पासह अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाच वेळी नदीपात्रात आल्याने राळेगाव तालुक्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील रावेरी येथे मुसळधार पावसामुळे रामगंगा नदीला पूर आला असून या पुराचे पाणी रावेरी गावातील तांडा वस्तीमध्ये शिरल्याने या पुरात २० नागरिकांसह अनेक जनावरे अडकून पडली होती. पूरपरिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह सरपंच पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले. या सर्वांनी २० नागरिकांना दोराच्या मदतीने पुराबाहेर काढले असून या सर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. रावेरी ग्रामपंचायतीने दाखविलेल्या तत्परतेबद्दल कौतुक होत आहे. दरम्यान या पुरामध्ये चार जनावरांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरYavatmalयवतमाळ