शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये पावसाची संततधार सुरुच; बेंबळा प्रकल्पाचे १८ दरवाजे उघडले, अनेक गावांत पूरस्थिती

By विशाल सोनटक्के | Updated: July 18, 2022 13:30 IST

अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ मीटरने तर, बेंबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले. अनेक वाड्या-वस्त्यांना पुराचा वेढा.

ठळक मुद्देसरूळ गावातील पुरात अडकलेल्या ११ नागरिकांची सुटका

यवतमाळ : सतत कोसळणाऱ्या पावसाने राळेगाव तालुक्याची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या ठिकाणी बेंबळा, अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाच वेळी नदी पात्रात आल्याने नाल्यांचे पाणी गाव शेजारीच थांबले आहे. यातून गावांमध्ये पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत राळेगाव तालुक्यातील १०० घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथील वर्धा नदीवर बांधलेल्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. अपर वर्धा प्रकल्पाचे सर्व १३ दरवाजे पहाटे ५ वाजता १५० सेमीने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने बाभूळगावसह कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

राळेगाव तालुक्यातील सावंगी गावामध्ये ३० घरांना पुराचा वेढा पडला आहे. एकबोर्जी गावातील ३५ घरे पुराच्या पाण्यात आली आहे. झाडगाव येथील ३० घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. रावेरी येथील १५ घरे, चिकणा येथील १२ घरे व सावनेर मधील १० घरांना पुराचा वेढा बसला आहे.

अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ मीटरने उघडण्यात आले आहे. पुढील काही तास पाणी असेच राहिले तर आणखी दोन दरवाजे पूस प्रकल्पाचे उघडले जाणार आहे. बेंबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, कळंब तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला 

बाभूळगाव तालुक्यातील सरुळ गावामध्ये पाणी शिरले. या ठिकाणचे ११ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. यातील सात नागरिकांना ग्रामस्थांनी बोटीच्या मदतीने बाहेर काढले. मात्र चार नागरिक मंदिरावरच चढून होते. आपत्ती व्यवस्थापन बोट आल्याशिवाय उतरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर तालुक्यातून बोट या गावात पोहोचली. चार नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने पुरातून बाहेर काढले.

पुरात अडकलेल्या २० ग्रामस्थांना सुखरुप काढले बाहेरबेंबळा प्रकल्पासह अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी एकाच वेळी नदीपात्रात आल्याने राळेगाव तालुक्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील रावेरी येथे मुसळधार पावसामुळे रामगंगा नदीला पूर आला असून या पुराचे पाणी रावेरी गावातील तांडा वस्तीमध्ये शिरल्याने या पुरात २० नागरिकांसह अनेक जनावरे अडकून पडली होती. पूरपरिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह सरपंच पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले. या सर्वांनी २० नागरिकांना दोराच्या मदतीने पुराबाहेर काढले असून या सर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. रावेरी ग्रामपंचायतीने दाखविलेल्या तत्परतेबद्दल कौतुक होत आहे. दरम्यान या पुरामध्ये चार जनावरांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरYavatmalयवतमाळ