शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

पावसाने खरिपातील पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

रस शोषण करणाऱ्या किडी आक्रमक झाल्या होत्या. यामुळे पात्या आणि फुलांवर आलेल्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याशिवाय सोयाबीन फुलाच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगाही धरल्या आहेत. पाण्याअभावी या शेंगा गळण्याची शक्यता होती. आता पाऊस आल्याने पीक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय ज्वारीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात चिकटा आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत १८ दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाला होता. उन्हाच्या वाढत्या चटक्याने पिके करपण्यास सुरुवात झाली होती. पावसात खंड पडल्याने रस शोषण करणाऱ्या किडींचे पिकांवर मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले होते. यामुळे उत्पन्नाला मोठा फटका बसणार होता. अशा परिस्थितीत वरुण राजाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. खरिपातील कपाशीच्या पिकावर पांढऱ्या माशीने हल्ला चढविला होता. याशिवाय रस शोषण करणाऱ्या किडी आक्रमक झाल्या होत्या. यामुळे पात्या आणि फुलांवर आलेल्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याशिवाय सोयाबीन फुलाच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगाही धरल्या आहेत. पाण्याअभावी या शेंगा गळण्याची शक्यता होती. आता पाऊस आल्याने पीक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय ज्वारीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात चिकटा आला होता. तर मूग आणि उडीद या दोन्ही पिकांना पावसाची नितांत आवश्यकता होती. शेवटच्या क्षणाला पाऊस बरसल्याने हातातोंडाशी येणारे पीक वाचले आहे. सलग ३६ तासापासून कोसळणाऱ्या पावसाने शहरातील रस्तेही स्वच्छ केले आहे. 

जिल्ह्यात पिकांना संजीवनी देणारा पाऊस झाला आहे. अनेक दिवसांपासून पावसामध्ये खंड होता. यामुळे पीक परिस्थिती चिंताजनक झाली होती. आता पाऊस बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. - नवनाथ कोळपकरजिल्हा कृषी अधीक्षक, यवतमाळ.

 

टॅग्स :Rainपाऊस