शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पावसामुळे पणन महासंघाला अडीचशे कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:41 IST

राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे अध्यक्षांची यवतमाळात माहिती ५०० कोटींचे चुकारे अडले३० जूनपर्यंत १५ लाख क्ंिवटल कापूस खरेदीचे आव्हान

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने पणन महासंघाचा अडीचशे कोटी रुपयांचा कापूस ओला झाला. यामध्ये रुईगाठी आणि सरकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या स्थितीत ३० जूनपर्यंत आणखी १५ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्याचे आव्हान उभे आहे, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. अध्यक्ष देशमुख म्हणाले, पणन महासंघाने आतापर्यंत राज्यभरात ७४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून १५ लाख गाठी तयार केल्या आहेत. राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले.

४० लाख क्विंटल कापूस विक्रीसाठी पडूनसंपूर्ण राज्यभरात एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी पणन महासंघाकडे नोंद केली आहे. या शेतकऱ्यांकडे ४० लाख क्विंटल कापूस आजच्या घडीला विक्रीसाठी पडून आहे. यातील किमान १५ लाख क्विंटल कापूस एफएक्यू दर्जाचा असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हा कापूस खरेदी करण्यासाठी ३० जूनपर्यंतचे नियोजन आहे.

पणनला तारीख वाढवावी लागणारनिर्धारित कालावधीमध्ये हा कापूस खरेदी होणे अशक्य आहे. यामुळे पणनला आणखी तारीख वाढवावी लागणार आहे. राज्यभरात आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचा कापूस खरेदी झाला. तर साडेतीन हजार कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.अद्याप ५०० कोटी रुपयांचे चुकारे बाकी आहे. याकरिता ८० कोटी रुपयांची तरतूद पणन महासंघाने केली. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वळते होतील, असेही राजाभाऊ देशमुख यांनी स्पष्ट केले.

पणनची पाचशे रूपये दरवाढीची मागणीकेंद्र शासनाने कापसाचे हमी दर नुकतेच जाहीर केले आहे. गतवर्षीच्या दरापेक्षा त्यामध्ये २६० रुपयांची वाढ केली आहे. लांब धाग्याच्या कापसाला यामुळे ५८१० रुपये क्विंटलचा दर मिळणार आहे. तर आखुड धाग्याच्या कापसाला ५६०० रुपयांचा दर राहणार आहे. हे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामुळे पणन महासंघाने ५०० रुपये क्ंिवटल दरवाढ करण्याची शिफारस करणार आहे.

दहा टक्के नोंदणी संशयास्पदराज्यभरात एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांकडे कापूस पडून असल्याचे सांगितले जाते. त्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण पार पडले. यावेळी नोंदणी झालेल्या कापसापैकी १० टक्के नोंदणी संशयास्पद आढळल्या असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूस