शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पावसामुळे पणन महासंघाला अडीचशे कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:41 IST

राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे अध्यक्षांची यवतमाळात माहिती ५०० कोटींचे चुकारे अडले३० जूनपर्यंत १५ लाख क्ंिवटल कापूस खरेदीचे आव्हान

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने पणन महासंघाचा अडीचशे कोटी रुपयांचा कापूस ओला झाला. यामध्ये रुईगाठी आणि सरकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या स्थितीत ३० जूनपर्यंत आणखी १५ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्याचे आव्हान उभे आहे, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. अध्यक्ष देशमुख म्हणाले, पणन महासंघाने आतापर्यंत राज्यभरात ७४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून १५ लाख गाठी तयार केल्या आहेत. राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले.

४० लाख क्विंटल कापूस विक्रीसाठी पडूनसंपूर्ण राज्यभरात एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी पणन महासंघाकडे नोंद केली आहे. या शेतकऱ्यांकडे ४० लाख क्विंटल कापूस आजच्या घडीला विक्रीसाठी पडून आहे. यातील किमान १५ लाख क्विंटल कापूस एफएक्यू दर्जाचा असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हा कापूस खरेदी करण्यासाठी ३० जूनपर्यंतचे नियोजन आहे.

पणनला तारीख वाढवावी लागणारनिर्धारित कालावधीमध्ये हा कापूस खरेदी होणे अशक्य आहे. यामुळे पणनला आणखी तारीख वाढवावी लागणार आहे. राज्यभरात आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचा कापूस खरेदी झाला. तर साडेतीन हजार कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.अद्याप ५०० कोटी रुपयांचे चुकारे बाकी आहे. याकरिता ८० कोटी रुपयांची तरतूद पणन महासंघाने केली. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वळते होतील, असेही राजाभाऊ देशमुख यांनी स्पष्ट केले.

पणनची पाचशे रूपये दरवाढीची मागणीकेंद्र शासनाने कापसाचे हमी दर नुकतेच जाहीर केले आहे. गतवर्षीच्या दरापेक्षा त्यामध्ये २६० रुपयांची वाढ केली आहे. लांब धाग्याच्या कापसाला यामुळे ५८१० रुपये क्विंटलचा दर मिळणार आहे. तर आखुड धाग्याच्या कापसाला ५६०० रुपयांचा दर राहणार आहे. हे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामुळे पणन महासंघाने ५०० रुपये क्ंिवटल दरवाढ करण्याची शिफारस करणार आहे.

दहा टक्के नोंदणी संशयास्पदराज्यभरात एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांकडे कापूस पडून असल्याचे सांगितले जाते. त्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण पार पडले. यावेळी नोंदणी झालेल्या कापसापैकी १० टक्के नोंदणी संशयास्पद आढळल्या असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूस