शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

पावसामुळे पणन महासंघाला अडीचशे कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:41 IST

राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे अध्यक्षांची यवतमाळात माहिती ५०० कोटींचे चुकारे अडले३० जूनपर्यंत १५ लाख क्ंिवटल कापूस खरेदीचे आव्हान

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने पणन महासंघाचा अडीचशे कोटी रुपयांचा कापूस ओला झाला. यामध्ये रुईगाठी आणि सरकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या स्थितीत ३० जूनपर्यंत आणखी १५ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्याचे आव्हान उभे आहे, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. अध्यक्ष देशमुख म्हणाले, पणन महासंघाने आतापर्यंत राज्यभरात ७४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून १५ लाख गाठी तयार केल्या आहेत. राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले.

४० लाख क्विंटल कापूस विक्रीसाठी पडूनसंपूर्ण राज्यभरात एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी पणन महासंघाकडे नोंद केली आहे. या शेतकऱ्यांकडे ४० लाख क्विंटल कापूस आजच्या घडीला विक्रीसाठी पडून आहे. यातील किमान १५ लाख क्विंटल कापूस एफएक्यू दर्जाचा असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हा कापूस खरेदी करण्यासाठी ३० जूनपर्यंतचे नियोजन आहे.

पणनला तारीख वाढवावी लागणारनिर्धारित कालावधीमध्ये हा कापूस खरेदी होणे अशक्य आहे. यामुळे पणनला आणखी तारीख वाढवावी लागणार आहे. राज्यभरात आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचा कापूस खरेदी झाला. तर साडेतीन हजार कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.अद्याप ५०० कोटी रुपयांचे चुकारे बाकी आहे. याकरिता ८० कोटी रुपयांची तरतूद पणन महासंघाने केली. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वळते होतील, असेही राजाभाऊ देशमुख यांनी स्पष्ट केले.

पणनची पाचशे रूपये दरवाढीची मागणीकेंद्र शासनाने कापसाचे हमी दर नुकतेच जाहीर केले आहे. गतवर्षीच्या दरापेक्षा त्यामध्ये २६० रुपयांची वाढ केली आहे. लांब धाग्याच्या कापसाला यामुळे ५८१० रुपये क्विंटलचा दर मिळणार आहे. तर आखुड धाग्याच्या कापसाला ५६०० रुपयांचा दर राहणार आहे. हे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामुळे पणन महासंघाने ५०० रुपये क्ंिवटल दरवाढ करण्याची शिफारस करणार आहे.

दहा टक्के नोंदणी संशयास्पदराज्यभरात एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांकडे कापूस पडून असल्याचे सांगितले जाते. त्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण पार पडले. यावेळी नोंदणी झालेल्या कापसापैकी १० टक्के नोंदणी संशयास्पद आढळल्या असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूस