शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदौरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
3
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
4
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
5
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
6
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
7
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
8
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
9
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
10
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
11
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
12
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
14
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
15
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
16
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
17
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
18
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
19
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
20
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

विदर्भाला तिसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 11:26 IST

विदर्भातील काही जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भाचे नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरासह तालुक्यातील सेमाडोह, घटांग, काटकुंभ, जारीदा परिसरात मंगळवारी सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली.

ठळक मुद्देरबी पिकांचे प्रचंड नुकसान चिखलदऱ्यात गारपीटयवतमाळ जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवरील पिकांना फटकाचंद्रपूर जिल्ह्यालाही झोडपले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/यवतमाळ/चंद्रपूर : विदर्भातील काही जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भाचे नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरासह तालुक्यातील सेमाडोह, घटांग, काटकुंभ, जारीदा परिसरात मंगळवारी सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली. यामुळे आदिवासींच्या शेतातील गहू आणि हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह, अतिदुर्गम हतरू, खडीमल, दहेंद्री काटकुंभ, चुर्णी, माखला, घटांग या परिसरात मंगळवारी सकाळी ९ ते ११ असे तब्बल दोन तास पावसाने मुसळधार हजेरी लावली. यामुळे परतवाडा-खंडवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तालुक्यातील अनेक ठिकाणी लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्याने घरावरील कवेलू फुटले.यवतमाळ जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षात हे नुकसान यापेक्षाही मोठे असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान कृषी विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून बुधवारी त्याचा अधिकृत अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा किती, हे स्पष्ट होणार आहे.यवतमाळात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस कोसळला. दारव्हा तालुक्यात निंबाच्या आकारा एवढ्या गारा कोसळल्या. सतत तीन दिवसांपासून असमानी संकट जिल्ह्यावर घोंगावत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कृषी विभाग केवळ ५० हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात एक लाख हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे.चंद्रपूर जिल्ह्यावर गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यावर असलेली अवकाळी पावसाची गडद छाया सोमवारी खरी ठरली. सोमवारी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. त्यामुळे अनेकांच्या घरांची छप्परे उडाली तर राजुरा व वरोरा तालुक्यात गारपीट झाल्याने शेकडो हेक्टरवरील रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने गारपीट व पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. सोमवारी हा अंदाज खरा ठरला. सुमारे दीड तास मध्यम व हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. शहरात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक मुख्य मार्गावरील नाल्या बुजल्या. वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावांचा व शहरांचा वीज पुरवठा रात्रभर खंडीत होता. पावसामुळे शेकडो हेक्टरवरील हरभरा, ज्वारी, मुंग, लाखोरी, तूर, जवस, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची छप्परे उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली असून नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याची मागणी आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी