शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून पावसाने फिरविली पाठ, खरीपही उलटण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 12:29 IST

वातावरणात बदल, पाऊस मात्र बरसलाच नाही

यवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात बरसणारा पाऊस लहरी स्वरूपाचा आहे. कधी जोरदार बरसेल तर अनेक दिवस पाऊस गायब होतो. गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. यातून शेतीचे उत्पन्न घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. यामध्ये साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. तर पावणेतीन लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. कपाशीचे पीक पात्या आणि बोंडाच्या अवस्थेत आहे. याच वेळी पावसाने दडी मारल्याने पातेगळ होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे एकरी उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोयाबीन फुल आणि कळ्यांच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी शेंगांचे चरपट धरलेले आहेत. मात्र पाऊस नसल्याने ही पिके पिवळी पडत आहेत. अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. कोमेजलेल्या अवस्थेतील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाऊस न बरसल्यास शेतशिवाराला मोठा धोका निर्माण होणार आहे.

अचानक गायब झालेल्या पावसाने शेतजमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. उन्हाच्या तीव्रतेने जमिनीतील ओलावा वेगाने कमी झाला आहे. यामुळे शेतातील पिके सुकत आहेत. वेळेपूर्वी पाऊस न बरसल्यास शेंगाचे टरफले शिल्लक राहतील. त्यामध्ये दाणे भरणार नाहीत किंवा ज्वारी इतके बारीक दाणे निर्माण होईल. यामुळे उत्पन्नात मोठा प्रमाणात घट होण्याचा अंदाज आहे.

कपाशीलाही पावसाची नितांत गरज आहे. मात्र, पाऊस न बरसल्याने कापसाच्या पिकांनीही माना टाकल्या आहेत. या ठिकाणी झाडाला लागणाऱ्या पात्या गळून पडत आहेत. वेळेपूर्वी पात्यांची गळ झाल्याने एकरी कापसाच्या उत्पादनाला याचा फटका बसणार आहे.

वीज वितरण कंपनीची मनमानी

वीज वितरण कंपनीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. चार दिवस रात्री तर तीन दिवस दिवसाला वीजपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात दिवसाच्या वीज पुरवठ्यामध्ये झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली तासन्तास वीज गूल होत आहे. यामुळे ओलित करणेही अवघड झाले आहे. यातून सिंचनाची व्यवस्था असतानाही अनेक शेतकऱ्यांना ओलितही करता आले नाही. यामुळे कंपनीच्या धोरणावर शेतकऱ्यांकडून संताप नोंदविला जात आहे.

प्रकल्पातून पाणी मिळणार का ?

जिल्ह्यातील जलाशयामध्ये तुडुंब पाणीसाठा आहे. परंतु यातून पाणी वितरण करणारी प्रणाली बिघडलेल्या अवस्थेत आहेत. पाटसऱ्या फुटल्याने पाणीपुढेच सरकत नाही. याशिवाय जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने पाटसऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. प्रकल्पातून पाणी मिळेल का हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून पाटसऱ्यांची दुरुस्ती रखडल्याने प्रकल्प क्षेत्रातून पाणी असतानाही सिंचन होत नाही.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसCropपीकYavatmalयवतमाळ