शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

१५ दिवसांपासून पावसाने फिरविली पाठ, खरीपही उलटण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 12:29 IST

वातावरणात बदल, पाऊस मात्र बरसलाच नाही

यवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात बरसणारा पाऊस लहरी स्वरूपाचा आहे. कधी जोरदार बरसेल तर अनेक दिवस पाऊस गायब होतो. गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. यातून शेतीचे उत्पन्न घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. यामध्ये साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. तर पावणेतीन लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. कपाशीचे पीक पात्या आणि बोंडाच्या अवस्थेत आहे. याच वेळी पावसाने दडी मारल्याने पातेगळ होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे एकरी उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोयाबीन फुल आणि कळ्यांच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी शेंगांचे चरपट धरलेले आहेत. मात्र पाऊस नसल्याने ही पिके पिवळी पडत आहेत. अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. कोमेजलेल्या अवस्थेतील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाऊस न बरसल्यास शेतशिवाराला मोठा धोका निर्माण होणार आहे.

अचानक गायब झालेल्या पावसाने शेतजमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. उन्हाच्या तीव्रतेने जमिनीतील ओलावा वेगाने कमी झाला आहे. यामुळे शेतातील पिके सुकत आहेत. वेळेपूर्वी पाऊस न बरसल्यास शेंगाचे टरफले शिल्लक राहतील. त्यामध्ये दाणे भरणार नाहीत किंवा ज्वारी इतके बारीक दाणे निर्माण होईल. यामुळे उत्पन्नात मोठा प्रमाणात घट होण्याचा अंदाज आहे.

कपाशीलाही पावसाची नितांत गरज आहे. मात्र, पाऊस न बरसल्याने कापसाच्या पिकांनीही माना टाकल्या आहेत. या ठिकाणी झाडाला लागणाऱ्या पात्या गळून पडत आहेत. वेळेपूर्वी पात्यांची गळ झाल्याने एकरी कापसाच्या उत्पादनाला याचा फटका बसणार आहे.

वीज वितरण कंपनीची मनमानी

वीज वितरण कंपनीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. चार दिवस रात्री तर तीन दिवस दिवसाला वीजपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात दिवसाच्या वीज पुरवठ्यामध्ये झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली तासन्तास वीज गूल होत आहे. यामुळे ओलित करणेही अवघड झाले आहे. यातून सिंचनाची व्यवस्था असतानाही अनेक शेतकऱ्यांना ओलितही करता आले नाही. यामुळे कंपनीच्या धोरणावर शेतकऱ्यांकडून संताप नोंदविला जात आहे.

प्रकल्पातून पाणी मिळणार का ?

जिल्ह्यातील जलाशयामध्ये तुडुंब पाणीसाठा आहे. परंतु यातून पाणी वितरण करणारी प्रणाली बिघडलेल्या अवस्थेत आहेत. पाटसऱ्या फुटल्याने पाणीपुढेच सरकत नाही. याशिवाय जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने पाटसऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. प्रकल्पातून पाणी मिळेल का हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून पाटसऱ्यांची दुरुस्ती रखडल्याने प्रकल्प क्षेत्रातून पाणी असतानाही सिंचन होत नाही.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसCropपीकYavatmalयवतमाळ