शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पुसदच्या ३० गावांतून रेल्वे ट्रॅक

By admin | Updated: July 12, 2017 01:07 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प

उपविभाग : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे, भूसंपादनाचा १४ जुलैपासून मोबदला प्रकाश लामणे । लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प पुसद उपविभागातील ३० गावांमधून जाणार आहे. त्यासाठी ४३७.७७ हेक्टर आर. जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून, येत्या १४ जुलैपासून मोबदला वाटपास सुरूवात होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली. लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या परिश्रमातून वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प साकारला जात आहे. २७० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाला २००७ साली मान्यता मिळाली होती. यवतमाळ येथे तत्कालिन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते २००९ मध्ये या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के वाटा या प्रकल्पात आहे. महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि पुसद तालुक्यातील सर्वाधिक ३० गावांमधून हा रेल्वे प्रकल्प जाणार आहे. एक हजार ४६७ शेतकऱ्यांची ४३७.७७ हेक्टर आर. जमीन अधिग्रहित करण्यात येत आहे. पुसद उपविभागात रेल्वेची लांबी ५८.३१ किलोमीटर आहे. येत्या आॅगस्टपर्यंत यावर सुनावनी पूर्ण होईल तर चार गावातील जमिनींचा प्रारूप निवाडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. एका गावातील जमिनीचे सिमांकन झाले नसल्याने संयुक्त मोजणीसाठी प्रलंबित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन गावच्या प्रारूप निवाड्यास मंजूरी दिली असल्याने तेथील शेतकऱ्यांना त्यांच्या अधिग्रहित जमिनीचा मोबदला येत्या आठ दिवसात दिला जाणार असल्याचे रेल्वे भूसंपादन अधिकारी तथा पुसदचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी सांगितले. या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामुळे वर्धा आणि नांदेड ही दोन शहरे जोडली जाणार असल्याने यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. अशी आहेत रेल्वेमार्गात येणारी गावे $$्रिपुसद तालुक्यातील भूसंपादन होणाऱ्या गावांमधून पुसद खंड -२, बेलगव्हाण, कोप्रा बु., चिलवाडी, मोहा ई., लोणी, हर्षी, खर्षी, बिबी, शेलू बु., ज्योतीनगर, कृष्णनगर, वरवट, शिवानगर, शिळोणा, बाळवाडी, वेणी खु. आदी १७ गावे तर दिग्रस तालुक्यातील भूसंपादन होणाऱ्या गावांमध्ये साखरा, नांदगव्हाण, दोनद, दिग्रस, गांधीनगर, सिंगद, वसंतपूर, सेवानगर, रुई तलाव, काटी, रामनगर, ईसापूर, हरसूल आदी १३ गावांचा समावेश आहे. एकूण ३० गावांपैकी २३ गावांमध्ये भूसंपादन सुनावनीसाठी शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.