शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिंगणापूर बंधाऱ्याच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: June 10, 2015 02:36 IST

तालुक्यातील शिंगणापूर येथे उभारण्यात येत असलेल्या सिमेंट बंधाऱ्याची तपासणी तहसीलदार संतोष काकडे यांनी नुकतीच केली.

गजानन अक्कलवार  कळंबतालुक्यातील शिंगणापूर येथे उभारण्यात येत असलेल्या सिमेंट बंधाऱ्याची तपासणी तहसीलदार संतोष काकडे यांनी नुकतीच केली. या बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुुरु असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम निकृष्ठ केले जात आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्ता तपासण्याची मागणी करण्यात आली होती. कळंब तालुक्यात लघू सिंचन (जलसंधारण) उपविभाग यवतमाळच्यावतीने सिमेंट बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु बंधारे बांधण्यात कुठलेही तांत्रिक कौशल्य वापरले जात नसल्यामुळे बंधाऱ्याची उपयोगिता किती, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे केवळ शिंगणापूर या एकाच गावात सहा बंधारे बांधण्यामागचे कारण कुणीही सांगायला तयार नाही. तसेच लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात येणारे हे बंधारे चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असल्याचाही आरोप होत आहे. अतिशय कमी पात्र असलेल्या ठिकाणी कामे केली जात असल्यामुळे पाणी किती व कसे साचेल आणि त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे काम आतापर्यंत कशा पद्धतीने झाले हे कुणालाही सांगावे लागत नाही. बंधाऱ्याचा विषय तडीस नेणार - अशोक उईके साधे एक लाखाचेही काम असले तरी लोकप्रतिनिधींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात अधिकारी वर्ग धन्यता मानतात. परंतु कोट्यवधी रुपयाचे बंधारे बांधताना कुठल्याही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्या गेले नाही. जागा निश्चितीची माहितीही दिली नाही. यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे सदर कामांची गुणवत्ता व उपयोगीता किती याची चौकशी करून या बंधाऱ्याचा प्रश्न तडीस नेऊ असे आमदार डॉ.अशोक उईके यांनी सांगितले. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली. बंधारे तपासण्याची गरजयाठिकाणी वापरण्यात आलेल्या साहित्याची तपासणी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. मोठ्ठाला गिट्टा पावरुन बंधारे उभारण्यात आले. त्यामुळे हे बंधारे किती टिकाऊ राहणार हाही प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईवर मात करता यावी यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या बंधाऱ्याची कामेही निकृष्ट केली जात आहे. शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त बंधाऱ्याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांची उदासिनता याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शासनाच्या योजना सातत्याने अपयशी होत आहेत. शासनाने यापुढे कोणतीही नवीन योजना आणण्याआधी अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यासाठी तयार करणे गरजेचे आहे.