शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

शिंगणापूर बंधाऱ्याच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: June 10, 2015 02:36 IST

तालुक्यातील शिंगणापूर येथे उभारण्यात येत असलेल्या सिमेंट बंधाऱ्याची तपासणी तहसीलदार संतोष काकडे यांनी नुकतीच केली.

गजानन अक्कलवार  कळंबतालुक्यातील शिंगणापूर येथे उभारण्यात येत असलेल्या सिमेंट बंधाऱ्याची तपासणी तहसीलदार संतोष काकडे यांनी नुकतीच केली. या बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुुरु असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम निकृष्ठ केले जात आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्ता तपासण्याची मागणी करण्यात आली होती. कळंब तालुक्यात लघू सिंचन (जलसंधारण) उपविभाग यवतमाळच्यावतीने सिमेंट बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु बंधारे बांधण्यात कुठलेही तांत्रिक कौशल्य वापरले जात नसल्यामुळे बंधाऱ्याची उपयोगिता किती, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे केवळ शिंगणापूर या एकाच गावात सहा बंधारे बांधण्यामागचे कारण कुणीही सांगायला तयार नाही. तसेच लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात येणारे हे बंधारे चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असल्याचाही आरोप होत आहे. अतिशय कमी पात्र असलेल्या ठिकाणी कामे केली जात असल्यामुळे पाणी किती व कसे साचेल आणि त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे काम आतापर्यंत कशा पद्धतीने झाले हे कुणालाही सांगावे लागत नाही. बंधाऱ्याचा विषय तडीस नेणार - अशोक उईके साधे एक लाखाचेही काम असले तरी लोकप्रतिनिधींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात अधिकारी वर्ग धन्यता मानतात. परंतु कोट्यवधी रुपयाचे बंधारे बांधताना कुठल्याही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्या गेले नाही. जागा निश्चितीची माहितीही दिली नाही. यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे सदर कामांची गुणवत्ता व उपयोगीता किती याची चौकशी करून या बंधाऱ्याचा प्रश्न तडीस नेऊ असे आमदार डॉ.अशोक उईके यांनी सांगितले. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली. बंधारे तपासण्याची गरजयाठिकाणी वापरण्यात आलेल्या साहित्याची तपासणी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. मोठ्ठाला गिट्टा पावरुन बंधारे उभारण्यात आले. त्यामुळे हे बंधारे किती टिकाऊ राहणार हाही प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईवर मात करता यावी यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या बंधाऱ्याची कामेही निकृष्ट केली जात आहे. शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त बंधाऱ्याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांची उदासिनता याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शासनाच्या योजना सातत्याने अपयशी होत आहेत. शासनाने यापुढे कोणतीही नवीन योजना आणण्याआधी अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यासाठी तयार करणे गरजेचे आहे.