शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुसद काँग्रेसला लागली उतरती कळा

By admin | Updated: November 24, 2015 05:40 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुसद तालुक्यात एकेकाळी काँग्रेसचे चांगलेच वजन होते. गावागावात कार्यकर्ते होते.

अखिलेश अग्रवाल ल्ल पुसदराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुसद तालुक्यात एकेकाळी काँग्रेसचे चांगलेच वजन होते. गावागावात कार्यकर्ते होते. शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असायची. परंतु गत काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचा ना कोणता कार्यक्रम, ना सामाजिक हालचाली. जणू पुसद तालुक्यातील काँग्रेसला उतरती कळाच लागली आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची हालत आणखी गंभीर झाली आहे. या निवडणुकीच्या काळात कुंपणावर असणारे पुढारी दुसरीकडे उड्या घेऊ लागले. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्येही पक्षाच्या नेतृत्त्वावर विश्वास दिसत नाही. त्यांनी काँग्रेसशी तात्पुरता काडीमोड देखील घेतला आहे. मात्र याची फळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. काँग्रेसमुळे राष्ट्रवादीला मात्र चांगले दिवस आले. परंतु आजही यातून काँग्रेस धडा घ्यायला तयार नाही. पुसद शहरात स्वातंत्र्यापूर्वीपासून काँग्रेस भवन आहे. परंतु ही वास्तू गत २० वर्षांपासून अर्धवट बांधकाम झालेल्या अवस्थेत आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी येथे दोनदा ध्वजारोहण होते. परंतु कार्यक्रमाला काही मोजकेच कार्यकर्ते हजर राहतात. एवढाच काय तो येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनशी संबंध. नंतर वर्षभरात कुणी नेतेच काय कार्यकर्तेही इकडे फिरकत नाही. काँग्रेसची राज्यात सत्ता असतानाही काँग्रेस भवनाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. यासाठी स्थानिक नेतेच जबाबदार असल्याचे बोलले जाते. आता तर काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ असलेल्या महान विभूतींच्या जयंती व स्मृतिदिनाचा काँग्रेसला विसर पडला की काय, असे म्हणावे लागते. ३१ आॅक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन आणि १९ नोव्हेंबर रोजी जन्मदिन होता. या दोनही दिवशी पक्षाकडून साधा आदरांजलीचा कार्यक्रमही घेण्यात आला नाही. तर दुसरीकडे शहर काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये विभाजन झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. १४ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सचिन नाईक यांनी विश्रामगृहावर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आपल्या काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी केली. परंतु शहर काँग्रेस कमिटीला पंडित नेहरू यांच्या जयंतीचा विसर पडावा ही आश्चर्याची बाब आहे.एकेकाळी काँग्रेसचा गड पुसद तालुका मानला जायचा. १३ वर्षे ज्यांनी राज्याची धुरा आपल्या हातात ठेवली, असे नेतृत्त्व दिले. त्याच काँग्रेस पक्षाला सुस्ती चढण्याचे कारण काय, याचा शोध घेण्याची गरज आहे. २०१६ मध्ये नगरपरिषद निवडणूक आणि २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. तेव्हा आत्ताच मरगळ झटकून कामाला लागण्याची गरज आहे. अन्यथा या मरगळीचा फायदा दुसरेच घेतील यात शंका नाही. काँग्रेसने वेळीच धडा घेतला नाही तर काँग्रेस तालुक्यातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नसल्याचे जाणकर सांगतात.