शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

गंभीर गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण तिपटीने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्तींविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले गेले. ही प्रकरणे प्रलंबित न ठेवता लगेच न्यायालयात सादर केली गेली. न्यायालयांनीही तातडीने हे खटले निकाली काढले. त्यात तब्बल ३७४ जणांना शिक्षा झाली. दंड म्हणून त्यांच्याकडून चार लाख ९५ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली गेली.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्हा : शिक्षेचा दर ५२.८५ टक्के, स्थानिक गुन्ह्यांमध्ये ३८.९० टक्के शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काही वर्षांपूर्वी अवघा १५ टक्के असलेला गंभीर गुन्ह्यांच्या न्यायालयीन खटल्यातील शिक्षेचा दर आता तिपटीने वाढून ५२.८५ टक्क्यावर पोहोचला आहे. पोलिसांचा काटेकोर तपास व पंच-साक्षीदारांच्या पाठपुराव्याचे हे फलित मानले जाते.एकेकाळी जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण अवघे ५ टक्के होते. नंतर एसडीपीओ स्तरावर विधी अधिकारी व प्रत्येक न्यायालयामध्ये पैरवी अधिकारी नियुक्त केले गेले. त्यामुळे २०१५ मध्ये भादंविच्या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण १५.४५ टक्क्यांवर पोहोचले. त्यात प्रत्येक वर्षी वाढ होत गेली. २०२० मध्ये ३० जून अखेर हे प्रमाण ५२.८५ टक्के झाले. १ जून २०१७ ला यवतमाळ येथील जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या एम. राज कुमार यांनी न्यायालयीन खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जातो, या आठवड्यात कोणती केस बोर्डावर लागणार, त्यातील गुन्हा साबित होण्याच्या दृष्टीने महत्वाचे पैलू काय, पंच-साक्षीदार कोण याच्यावर फोकस निर्माण केला जातो. महत्वपूर्ण पंच-साक्षीदाराला विश्वासात घेऊन न्यायालयातील उलट तपासणीच्या दृष्टीने भक्कम तयारी करून घेतली जाते. दाखल होणाऱ्या नव्या गुन्ह्यांमध्ये पंचनामा करताना काही त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. स्थळ पंचनाम्याच्यावेळी तेथे सापडणाºया वस्तू रेकॉर्डवर घेऊन त्या माध्यमातून गुन्ह्याचा हेतू व आरोपीपर्यंत कनेक्टीव्हीटी निर्माण केली जाते. या साखळीतूनच गुन्हे सिद्ध होणे व त्यात न्यायालयाकडून शिक्षा ठोठावली जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बोर्डावर आलेल्या जुन्या खटल्यांमध्ये सर्वाधिक फोकस पंच-साक्षीदारावर निर्माण केला जातो. पोलिसांच्या या सर्व परिश्रमांमुळेच २०१७ ला १९.९६ टक्के असलेले गंभीर गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण आता तब्बल ५२.८५ टक्क्यावर पोहोचले आहे. गेल्या तीन वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये भक्कम तपास करून दोषारोपपत्रे न्यायालयात सादर केली गेल्याने पुढील काही वर्ष गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढतच राहणार असल्याचे सांगण्यात आले.आयपीसी वगळता आर्म्स अ‍ॅक्ट, दारू जुगारावरील कारवाई, इसी अ‍ॅक्ट या सारख्या विशेष स्थानिक कायद्यान्वये (एसएलएल) दाखल गुन्ह्यांमध्येसुद्धा २०१५ ला १८.८६ टक्के असलेले शिक्षेचे प्रमाण आता दुप्पटीने वाढून३८.९० टक्क्यावर पोहोचले आहे.लॉकडाऊन तोडणाºया ३७४ जणांना शिक्षागेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्तींविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले गेले. ही प्रकरणे प्रलंबित न ठेवता लगेच न्यायालयात सादर केली गेली. न्यायालयांनीही तातडीने हे खटले निकाली काढले. त्यात तब्बल ३७४ जणांना शिक्षा झाली. दंड म्हणून त्यांच्याकडून चार लाख ९५ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली गेली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस