शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुका ‘मनरेगा’त माघारला

By admin | Updated: April 8, 2015 02:17 IST

मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध करून देत रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत ...

प्रकाश लामणे पुसदमजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध करून देत रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत (मनरेगा) संपूर्ण जिल्ह्यात पुसद तालुका माघारल्याचे वास्तव पुढे आले आहे. २०१४-१५ या वर्षात मनरेगाअंतर्गत प्रस्तावित दोन हजार १८४ कामांपैकी केवळ ९६ कामेच पूर्णत्वास गेल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचाच गृहतालुका माघारल्याचे चित्र दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुके आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सर्वत्र सुरू करण्यात आली. यात महागाव तालुक्यात सर्वाधिक ८६७ कामे पूर्णत्वास गेली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राळेगाव तालुका असून ७४४ कामे पूर्ण झाली आहे. कळंब तालुक्यात ६४१ आणि पुसद तालुक्यात केवळ ९६ कामे पूर्ण झाली आहे. पुसद तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींना रोपवाटिका मंजूर आहे. त्यासाठी मंजूर रक्कम दोन कोटी ६६ लाख इतकी आहे. मात्र मजुराच्या प्रमाणानुसार त्यांच्या मजुरीवर अंदाजे एक कोटी ६० लाख रुपयांचे प्रावधान आहे. यातून सुमारे ९८ हजार मनुष्य दिनाचा रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली असती. तसेच पुसद पंचायत समितीला सिंचन विहिरीची मंजूर संख्या एक हजार ७७ आहे. या विहिरींना २०११-१२ मध्ये तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार प्रत्येक विहिरीसाठी एक लाख ९० हजार रुपये अनुदान प्रमाणे २२ कोटी ६६ लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. यासाठी मजुरीचा दर प्रतिदिन कमीत कमी १६८ रुपये आहे. त्यानुसार आठ लाख २८ हजार रोजगाराची निर्मिती होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नसल्याने तालुक्यातील मजुरांचे लोंढे स्थलांतरित झाले आहे.पुसद तालुक्यातील कृषी विभाग व वनविभाग आदींना या योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे उपलब्ध आहे. त्यांनी ही कामे मजुरांऐवजी मशीनद्वारे केली आहे. त्यासाठी तब्बल ४२ वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग आदींकडे पांदण रस्त्यांची कामे मंजूर आहे. अग्रीम आल्याचीही माहिती आहे. परंतु दोन वर्षांपासून ही कामे बंद असल्याने मजुरांना तालुक्यात कामे मिळत नाही. परिणामी ते गाव सोडून परजिल्ह्यात जातात.