शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

पुसद तालुका ‘मनरेगा’त माघारला

By admin | Updated: April 8, 2015 02:17 IST

मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध करून देत रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत ...

प्रकाश लामणे पुसदमजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध करून देत रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत (मनरेगा) संपूर्ण जिल्ह्यात पुसद तालुका माघारल्याचे वास्तव पुढे आले आहे. २०१४-१५ या वर्षात मनरेगाअंतर्गत प्रस्तावित दोन हजार १८४ कामांपैकी केवळ ९६ कामेच पूर्णत्वास गेल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचाच गृहतालुका माघारल्याचे चित्र दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुके आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सर्वत्र सुरू करण्यात आली. यात महागाव तालुक्यात सर्वाधिक ८६७ कामे पूर्णत्वास गेली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राळेगाव तालुका असून ७४४ कामे पूर्ण झाली आहे. कळंब तालुक्यात ६४१ आणि पुसद तालुक्यात केवळ ९६ कामे पूर्ण झाली आहे. पुसद तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींना रोपवाटिका मंजूर आहे. त्यासाठी मंजूर रक्कम दोन कोटी ६६ लाख इतकी आहे. मात्र मजुराच्या प्रमाणानुसार त्यांच्या मजुरीवर अंदाजे एक कोटी ६० लाख रुपयांचे प्रावधान आहे. यातून सुमारे ९८ हजार मनुष्य दिनाचा रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली असती. तसेच पुसद पंचायत समितीला सिंचन विहिरीची मंजूर संख्या एक हजार ७७ आहे. या विहिरींना २०११-१२ मध्ये तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार प्रत्येक विहिरीसाठी एक लाख ९० हजार रुपये अनुदान प्रमाणे २२ कोटी ६६ लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. यासाठी मजुरीचा दर प्रतिदिन कमीत कमी १६८ रुपये आहे. त्यानुसार आठ लाख २८ हजार रोजगाराची निर्मिती होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नसल्याने तालुक्यातील मजुरांचे लोंढे स्थलांतरित झाले आहे.पुसद तालुक्यातील कृषी विभाग व वनविभाग आदींना या योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे उपलब्ध आहे. त्यांनी ही कामे मजुरांऐवजी मशीनद्वारे केली आहे. त्यासाठी तब्बल ४२ वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग आदींकडे पांदण रस्त्यांची कामे मंजूर आहे. अग्रीम आल्याचीही माहिती आहे. परंतु दोन वर्षांपासून ही कामे बंद असल्याने मजुरांना तालुक्यात कामे मिळत नाही. परिणामी ते गाव सोडून परजिल्ह्यात जातात.