शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

जप्तीच्या मालमत्तेने प्रकल्पग्रस्तांना घोर

By admin | Updated: December 4, 2015 02:37 IST

महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी काळजाचा तुकडा दिला, पण अपेक्षित मोबदला मिळाला नाही. न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर निर्णय दिला, मात्र मोबदल्यापासून वंचित रहावे लागले.

शासनाचं धनं घरात : बेंबळाच्या प्रतिष्ठेला धक्का, तरी मोबदला नाहीयवतमाळ : महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी काळजाचा तुकडा दिला, पण अपेक्षित मोबदला मिळाला नाही. न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर निर्णय दिला, मात्र मोबदल्यापासून वंचित रहावे लागले. मालमत्ता जप्तीचा आदेश न्यायालयाने काढला. कार्यवाही झाली. शासनाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला. पण आता जप्त केलेल्या वस्तूंनी प्रकल्पग्रस्तांची चिंता वाढविली आहे. वस्तू घरातच खराब होऊ नये, यासाठी त्यांना पदोपदी काळजी घ्यावी लागत आहे. शासनाची मालमत्ता जप्तीचे प्रकार आता नवीन राहिले नाही. जिल्हाधिकाऱ्यांचीही खुर्ची जप्त केली जाते. प्रतिष्ठा गेल्यानंतरही धडा घेतला जात नाही. प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. बेंबळा प्रकल्पग्रस्तांचे शेकडो प्रकरणे न्यायालयात दाखल आहे. लोक न्यायालयात प्रकरणांचा निर्णय झाल्यानंतरही बेंबळा प्रकल्प विभागाकडून मोबदला दिला जात नाही. यातूनच जप्तीची नामुष्की या कार्यालयावर आली. आॅगस्टमध्ये एक दिवसाआड तिघांनी जप्ती आणली. दाभा (पहूर) येथील जयचंद त्रिलोकचंद बोरुंदिया यांची शेती या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. मात्र त्यांना अपेक्षित मोबदला मिळाला नाही. न्यायालयाच्या आदेशाने बेंबळा प्रकल्प कार्यालयावर जप्ती आणली. कार्यकारी अभियंत्यांची कार आणि त्यांच्या कार्यालयातील खुर्च्या या प्रकरणात जप्त करण्यात आल्या. यावरून तीन महिन्यांचा कालावधी लोटला. पण त्यांना मोबदला दिला नाही. घरासमोर पांढऱ्या रंगाची कार आणि घरात असलेल्या खुर्च्या सांभाळताना त्यांच्या नाकीनऊ येत आहे. शासन पैसा देतील तेव्हा या वस्तू सुस्थितीत परत मागतील आणि त्या न दिल्यास कसे होईल याची चिंता त्यांना आहे. बारड येथील माणिक पंजाबराव काळमेघ यांनीही न्यायालयाच्या आदेशानुसार बेंबळा प्रकल्प कार्यालयातील संगणक संच, सीपीयू आणि खुर्च्या जप्त केल्या. घरात जागा नसतानाही या वस्तूंची देखभाल त्यांना करावी लागत आहे. वस्तू खराब होऊ नये, चोरी जाऊ नये यासाठी त्यांना धडपड करावी लागत आहे. मोबदला द्या आणि वस्तू ताब्यात घ्या ही विनंती त्यांनी प्रकल्प कार्यालयाकडे केली. पण अजून तरी या संदर्भात कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत. बेंबळा प्रकल्प कार्यालयावर नामुष्की आली ही शासनासाठी गंभीर बाब आहे. पण जप्त केलेल्या वस्तूंमुळे प्रकल्पग्रस्तांना घोर लागला आहे. (वार्ताहर)