शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

जप्तीच्या मालमत्तेने प्रकल्पग्रस्तांना घोर

By admin | Updated: December 4, 2015 02:37 IST

महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी काळजाचा तुकडा दिला, पण अपेक्षित मोबदला मिळाला नाही. न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर निर्णय दिला, मात्र मोबदल्यापासून वंचित रहावे लागले.

शासनाचं धनं घरात : बेंबळाच्या प्रतिष्ठेला धक्का, तरी मोबदला नाहीयवतमाळ : महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी काळजाचा तुकडा दिला, पण अपेक्षित मोबदला मिळाला नाही. न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर निर्णय दिला, मात्र मोबदल्यापासून वंचित रहावे लागले. मालमत्ता जप्तीचा आदेश न्यायालयाने काढला. कार्यवाही झाली. शासनाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला. पण आता जप्त केलेल्या वस्तूंनी प्रकल्पग्रस्तांची चिंता वाढविली आहे. वस्तू घरातच खराब होऊ नये, यासाठी त्यांना पदोपदी काळजी घ्यावी लागत आहे. शासनाची मालमत्ता जप्तीचे प्रकार आता नवीन राहिले नाही. जिल्हाधिकाऱ्यांचीही खुर्ची जप्त केली जाते. प्रतिष्ठा गेल्यानंतरही धडा घेतला जात नाही. प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. बेंबळा प्रकल्पग्रस्तांचे शेकडो प्रकरणे न्यायालयात दाखल आहे. लोक न्यायालयात प्रकरणांचा निर्णय झाल्यानंतरही बेंबळा प्रकल्प विभागाकडून मोबदला दिला जात नाही. यातूनच जप्तीची नामुष्की या कार्यालयावर आली. आॅगस्टमध्ये एक दिवसाआड तिघांनी जप्ती आणली. दाभा (पहूर) येथील जयचंद त्रिलोकचंद बोरुंदिया यांची शेती या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. मात्र त्यांना अपेक्षित मोबदला मिळाला नाही. न्यायालयाच्या आदेशाने बेंबळा प्रकल्प कार्यालयावर जप्ती आणली. कार्यकारी अभियंत्यांची कार आणि त्यांच्या कार्यालयातील खुर्च्या या प्रकरणात जप्त करण्यात आल्या. यावरून तीन महिन्यांचा कालावधी लोटला. पण त्यांना मोबदला दिला नाही. घरासमोर पांढऱ्या रंगाची कार आणि घरात असलेल्या खुर्च्या सांभाळताना त्यांच्या नाकीनऊ येत आहे. शासन पैसा देतील तेव्हा या वस्तू सुस्थितीत परत मागतील आणि त्या न दिल्यास कसे होईल याची चिंता त्यांना आहे. बारड येथील माणिक पंजाबराव काळमेघ यांनीही न्यायालयाच्या आदेशानुसार बेंबळा प्रकल्प कार्यालयातील संगणक संच, सीपीयू आणि खुर्च्या जप्त केल्या. घरात जागा नसतानाही या वस्तूंची देखभाल त्यांना करावी लागत आहे. वस्तू खराब होऊ नये, चोरी जाऊ नये यासाठी त्यांना धडपड करावी लागत आहे. मोबदला द्या आणि वस्तू ताब्यात घ्या ही विनंती त्यांनी प्रकल्प कार्यालयाकडे केली. पण अजून तरी या संदर्भात कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत. बेंबळा प्रकल्प कार्यालयावर नामुष्की आली ही शासनासाठी गंभीर बाब आहे. पण जप्त केलेल्या वस्तूंमुळे प्रकल्पग्रस्तांना घोर लागला आहे. (वार्ताहर)