शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

तलाठी-कृषी विभागाच्या वादात थांबल्या याद्या; ११ लाख शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

By रूपेश उत्तरवार | Updated: October 3, 2022 10:32 IST

तलाठी आणि कृषी विभागाच्या यंत्रणेत इंग्रजी यादी तयार करण्याचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

यवतमाळ : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यासाठीची भरपाई प्रत्येक जिल्ह्याकडे वळती झाली. मात्र, मदत वाटपाचा निधी जमा करण्यासाठी ११ लाख शेतकऱ्यांच्या नावाची यादीच यंत्रणेकडे नाही. तलाठी आणि कृषी विभागाच्या यंत्रणेत इंग्रजी यादी तयार करण्याचा वाद २० दिवसांपासून सुरू आहे. दसरा तोंडावर आला, मात्र वाद सुटला नाही. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, अकोेला, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. जवळपास २० लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आदेश निघाले. निधी वळता झाल्यानंतर मदतीच्या याद्या तयार करायच्या कोणी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नुकसानीचे ग्रामस्तरीय समितीने संयुक्त पंचनामे केले. याद्या तयार करण्याचे काम तलाठ्यांवर ढकलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याद्या करण्याचे मूळ काम कृषी विभागाचे आहे. तसा अध्यादेशही आहे. मात्र काम तलाठ्यावर ढकलण्यात आले आहे. त्यांनी इंग्रजी याद्या तयार करण्यास नकार दिला आहे. शेतात पीक नाही, हातात मदतीचा छदाम नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. संकटावर मात करण्याचा आधारही त्यांना मिळालेला नाही.

ग्रामस्तरीय समितीकडे काम द्या

ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायकांनी मिळून नुकसानीचे पंचनामे केले आहे. आता याद्यांचे काम संयुक्त समितीकडे द्यावे अथवा कृषी विभागानेच काम करावे, अशी भूमिका तलाठ्यांनी घेतली आहे. याशिवाय ०.२५ टक्के खर्च निधी तलाठ्यांना देण्याची मागणी करण्यात आली. यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

१२ सप्टेंबरपासून संप सुरू आहे. त्यावर तोडगा निघाला नाही. आयुक्तस्तरावर चर्चेेला बोलावले आहे. कृषी विभागाचे काम आमच्यावर थोपवू नये, अशीच भूमिका आहे.

- बाळकृष्ण गाढवे, अध्यक्ष, विभागीय पटवारी संघटना.

जिल्हा - संपावर असलेले तलाठी - कोंडीत सापडलेले शेतकरी

  • यवतमाळ - ६४९ - ३,७५,०००
  • अमरावती - ५३१- २,००,०००
  • अकोला - ३१९- ७६,०२३
  • वाशिम - २८८ - २०,०००
  • बुलडाणा - ५३९ - ५,०००
  • नागपूर- ३३४- १,१४,०००
  • वर्धा -२९१-१,७३,०००
  • भंडारा- २०४-१२,०००
  • गोंदिया -२०३-१,०००
  • चंद्रपूर -३०२-१,५९,०००
  • गडचिरोली -२३७-२५,०००
टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी