शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

पालिकेत जनतेचे प्रश्न अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

शहरात कचरा, रस्ता, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरपालिकेकडे तक्रारी करतात. पावसाचे आणि सांडपाणी तुंबलेले असतानाही सहा-सहा महिने तक्रार निकाली काढली जात नाही. सांडपाण्यामुळे होणारे परिणाम गंभीर असतानाही पालिका प्रशासन मात्र उदासीन आहे.

ठळक मुद्देतक्रारींकडे दुर्लक्ष : कर्मचारी अपुरे असल्याचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी यवतमाळ नगरपरिषदेकडे वेळ नाही. नागरिकांच्या अनेक तक्रारी पालिकेच्या विविध विभागात धूळ खात पडून आहे. समस्या निकाली काढण्यासाठी कर्मचारी अपुरे असल्याचे कारण पालिकेकडून सांगितले जाते, तर किती काळ प्रश्न निकाली निघणार नाही हा नागरिकांचा प्रश्न आहे.शहरात कचरा, रस्ता, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरपालिकेकडे तक्रारी करतात. पावसाचे आणि सांडपाणी तुंबलेले असतानाही सहा-सहा महिने तक्रार निकाली काढली जात नाही. सांडपाण्यामुळे होणारे परिणाम गंभीर असतानाही पालिका प्रशासन मात्र उदासीन आहे.अनेक भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. घर परिसरातच गटार तयार झाली आहेत. त्यात वाढलेला डासांचा प्रादुर्भाव आणि सुटणारी दुर्गंधी जीवघेणी ठरत आहे. घंटागाड्या नियमित येत नसल्याने घरातला कचरा परिसरात जागा मिळेल त्या ठिकाणी नाईलाजाने टाकावा लागतो. अनेक भागातील पथदिवे बंद आहे. पाऊस लांबल्याने वाढलेली झुडपं अजूनही हिरवीगार आहेत. त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे. अगदी वर्दळीच्या रस्त्यावरही ही जनावरे दृष्टीस पडतात. याविषयीच्या तक्रारी नगरपरिषदेकडून दुर्लक्षित आहे. अभियंता नाही, कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे आदी कारणांचा पाढा पदाधिकारी आणि प्रशासनाकडून वाचला जातो. याचा अनुभव अनेकांना येत आहे. वॉर्डाशी संबंधित नगरसेवकांना तर आपल्या जबाबदारीविषयी कुठलेही भान नसल्याचे दिसून येते. वॉर्डात अपवादानेही त्यांची चक्कर होत नाही. परिणामी समस्या दीर्घकाळपर्यंत कायम राहात आहे.छत्रपती सोसायटीत शेजारी त्रस्तउमरसरा परिसरात असलेल्या छत्रपती सोसायटीत शेजाऱ्याने सांडपाणी मोकळे सोडून दिले. याचा त्रास होत असल्याची तक्रार विलास हरिभाऊ देशमुख यांनी यवतमाळ नगरपरिषदेकडे केली. तक्रारीवर काय कारवाई झाली याची चौकशी करण्यास गेलेल्या देशमुख यांना नगरपरिषदेकडून आमच्याकडे अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे उत्तर मिळाले. कर्मचाऱ्यांचा तुटवडा केव्हा भरून निघणार आणि समस्या कधी निकाली निघेल, हा त्यांचा प्रश्न आहे.

टॅग्स :Socialसामाजिक