शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत जनतेचे प्रश्न अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

शहरात कचरा, रस्ता, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरपालिकेकडे तक्रारी करतात. पावसाचे आणि सांडपाणी तुंबलेले असतानाही सहा-सहा महिने तक्रार निकाली काढली जात नाही. सांडपाण्यामुळे होणारे परिणाम गंभीर असतानाही पालिका प्रशासन मात्र उदासीन आहे.

ठळक मुद्देतक्रारींकडे दुर्लक्ष : कर्मचारी अपुरे असल्याचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी यवतमाळ नगरपरिषदेकडे वेळ नाही. नागरिकांच्या अनेक तक्रारी पालिकेच्या विविध विभागात धूळ खात पडून आहे. समस्या निकाली काढण्यासाठी कर्मचारी अपुरे असल्याचे कारण पालिकेकडून सांगितले जाते, तर किती काळ प्रश्न निकाली निघणार नाही हा नागरिकांचा प्रश्न आहे.शहरात कचरा, रस्ता, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरपालिकेकडे तक्रारी करतात. पावसाचे आणि सांडपाणी तुंबलेले असतानाही सहा-सहा महिने तक्रार निकाली काढली जात नाही. सांडपाण्यामुळे होणारे परिणाम गंभीर असतानाही पालिका प्रशासन मात्र उदासीन आहे.अनेक भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. घर परिसरातच गटार तयार झाली आहेत. त्यात वाढलेला डासांचा प्रादुर्भाव आणि सुटणारी दुर्गंधी जीवघेणी ठरत आहे. घंटागाड्या नियमित येत नसल्याने घरातला कचरा परिसरात जागा मिळेल त्या ठिकाणी नाईलाजाने टाकावा लागतो. अनेक भागातील पथदिवे बंद आहे. पाऊस लांबल्याने वाढलेली झुडपं अजूनही हिरवीगार आहेत. त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे. अगदी वर्दळीच्या रस्त्यावरही ही जनावरे दृष्टीस पडतात. याविषयीच्या तक्रारी नगरपरिषदेकडून दुर्लक्षित आहे. अभियंता नाही, कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे आदी कारणांचा पाढा पदाधिकारी आणि प्रशासनाकडून वाचला जातो. याचा अनुभव अनेकांना येत आहे. वॉर्डाशी संबंधित नगरसेवकांना तर आपल्या जबाबदारीविषयी कुठलेही भान नसल्याचे दिसून येते. वॉर्डात अपवादानेही त्यांची चक्कर होत नाही. परिणामी समस्या दीर्घकाळपर्यंत कायम राहात आहे.छत्रपती सोसायटीत शेजारी त्रस्तउमरसरा परिसरात असलेल्या छत्रपती सोसायटीत शेजाऱ्याने सांडपाणी मोकळे सोडून दिले. याचा त्रास होत असल्याची तक्रार विलास हरिभाऊ देशमुख यांनी यवतमाळ नगरपरिषदेकडे केली. तक्रारीवर काय कारवाई झाली याची चौकशी करण्यास गेलेल्या देशमुख यांना नगरपरिषदेकडून आमच्याकडे अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे उत्तर मिळाले. कर्मचाऱ्यांचा तुटवडा केव्हा भरून निघणार आणि समस्या कधी निकाली निघेल, हा त्यांचा प्रश्न आहे.

टॅग्स :Socialसामाजिक