शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसताना वाढवले भाव, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:27 IST

Yavatmal : नाईलाजाने कमी भावात विकावा लागला कापूस

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : काही महिन्यांपासून खासगी कापूस खरेदी केंद्रांवर कापसाचे भाव सहा हजार ८०० च्या आसपास राहिले होते. मागील महिन्यापर्यंत कापसाचे भाव वाढण्याचे संकेत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तीन ते चार महिन्यांपासून साठवलेला कापूस विकला. त्यानंतर मात्र कापसाचे भाव एक हजारांपेक्षा जास्त वाढले आहेत. या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनाच अधिक होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वणी तालुक्यात सुरुवातीपासून खासगी खरेदी केंद्रांत कापसाचा भाव सहा हजार ५०० रुपयांपासून सात हजारांपर्यंत कायम राहिला, तर सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर ७ हजार ४०० पर्यंत भाव होता. अतिवृष्टी, विविध किडींचा प्रादुर्भाव, अशा अनेक संकटांवर मात करून हाती आलेल्या कापसाला बाजारात मिळालेला भाव व त्यानंतर सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी लागणारी ऑनलाइन प्रक्रिया अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी घरात साठवलेला कापूस सीसीआय केंद्रांवर विक्रीसाठी मोठ्या रांगा दिसून आल्या.

नाईलाजाने कमी भावात विकावा लागला कापूस

  • खासगी बाजारातही शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजेनुसार मिळेल त्या भावात, काही ठिकाणी उधारीवर, उसनवारीवर तसेच शेतीखर्चासाठी लागणाऱ्या बी-बियाणे व खतांच्या खर्चापायी विकला.
  • असे चित्र असताना आता कापूस शिल्लक नसताना कापसाच्या भावात ७ हजार ६०० ते ७ हजार ८०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र आहे. परंतु, याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संतप्त भावना आहे.

"गेली काही वर्षे कापसाला दहा हजारांहून अधिक भाव मिळाला होता. परंतु, दोन वर्षांपासून सहा हजारांच्या आसपास भाव मिळत आहे. यावर्षी चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, साठवलेल्या कापसाचे वजन घटल्याने नुकसान झाले."- प्रभाकर डाखरे, शेतकरी.

टॅग्स :Yavatmalयवतमाळcottonकापूसfarmingशेती