शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

सत्तेची मस्ती, शेतकऱ्यांची जिंदगी झाली सस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

‘दुसकाय रे दुसकाय, विदर्भाचा दुसकाय, त्या दुसकायात इदर्भाचे येले सुरू, मुख्यमंत्री साहेब म्हणते हो समद बराबर करू, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव’ या झडतीतून शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच बोलती बंद केली.

ठळक मुद्देपोळ्याची झडती : शेतकऱ्यांच्या व्यथा, राजकीय नेत्यांवर हल्लाबोल, मनातील खदखद व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘सत्ताधाऱ्यांना चढली हो सत्तेची मस्ती, शेतकºयांची जिंदगी झाली हो सस्ती, कापसाचे बोंड अळीने पोखरले, शेतकरी मरतो हो विषाच्या फवारणीने, एक नमन कवडा पार्वती हर बोला हरहर महादेव’, यासारख्या अनेक झडत्यांनी यवतमाळचा बैलपोळा दणाणून गेला. येथील ऐतिहासिक आझाद मैदानात भरलेल्या बैल पोळ्यात शुक्रवारी दुपारी शेतकऱ्यांनी झडत्यांच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.स्थानिक आझाद मैदानात बैल पोळा पार पडला. पंचक्रोशीतील बैलजोड्या या ठिकाणी आल्या. यावर्षी ९४ बैल जोड्यांनी पोळयाच्या उत्सवात हजेरी लावली होती. सुदृढ बैल व सजावटींना बक्षीस वितरित करण्यात आले.या स्पर्धेत संजय मादेशवार यांच्या बैलजोडीला १५ हजारांचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. अंकुश बगमारे यांच्या बैलजोडीने १० हजाराचे दुसरे, दीपक सुुलभेवार यांच्या बैलजोडीने सात हजारांचे तिसरे, नामदेव अवथळे यांच्या बैलजोेडीने पाच हजारांचे चौथे, तर पिंटू ठाकरे यांच्या बैलजोडीने तीन हजारांचे पाचव्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.रमेश यमसनवार, अविनाश ठाकरे, राजेश ठाकरे, दिनेश तिवडे, अजय रापर्तीवार यांच्या बैलजोडींना प्रोत्साहनपर बक्षिसाच्या स्वरूपात दोन हजार रूपयांचा रोख इनाम मिळाला. इतर बैलजोडी मालकांना धोतरजोडी आणि टोपी देऊन सन्मानित करण्यात आले. त्री सदस्यीय समितीने बैलजोडींचे परीक्षण केले. समितीत अ‍ॅड.रवींद्र भुमरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वाटाणे, डॉ.चव्हाण, अ‍ॅड.जयसिंग चव्हाण यांचा समावेश होता.यावेळी बांधकाम सभापती विजय खडसे, नगरसेवक नित्यानंद गिरी, गजानन इंगोले, बबलू देशमुख, उद्धवराव साबळे, पंकज देशमुख, विशाल पावडे, वैशाली कनाके, शुभांगी हातगावकर, संगीता कासार, सुषमा राऊत, नीता धावतोडे उपस्थित होत्या.पोळ्यात दारव्हा तालुक्याच्या बोरीअरब येथील नितीन कोल्हे यांच्या झडतीचे वाचन करण्यात आले. बबलू देशमुख, अशोक भुतडा यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध झडत्या सादर केल्या. या झडत्यांनी पोळ्याच्या उत्सवात रंगत भरली. झडत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सत्तादाऱ्यांवर आसूड ओढले.झडतीतून मुख्यमंत्र्यांवर साधला नेम‘दुसकाय रे दुसकाय, विदर्भाचा दुसकाय, त्या दुसकायात इदर्भाचे येले सुरू, मुख्यमंत्री साहेब म्हणते हो समद बराबर करू, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव’ या झडतीतून शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच बोलती बंद केली. एकापेक्षा एक सरस आणि शेतकऱ्यांच्या विदारक स्थितीवर झडत्या सादर करून शेतकऱ्यांनी आपली खंत व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरी