शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

डाक खात्यातील ‘नागरिक वचन पत्र’ ठरले थोतांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 13:18 IST

डाक खात्यात कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचे निर्धारण केले गेले आहे. त्यासाठी ‘नागरिक वचन पत्र’ असे फलक प्रत्येक डाक कार्यालयात लावले गेले आहे. परंतु हे वचन पत्र थोतांड ठरत आहे.

ठळक मुद्देवेळेचे निर्धारण कागदावरचहमी दोन मिनिटांची, लागतात दोन तास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डाक खात्यात कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचे निर्धारण केले गेले आहे. त्यासाठी ‘नागरिक वचन पत्र’ असे फलक प्रत्येक डाक कार्यालयात लावले गेले आहे. परंतु हे वचन पत्र थोतांड ठरत आहे. कारण कोणत्याही कामासाठी दोन ते पाच मिनिटांची हमी डाक विभागाकडून दिली गेली असली तरी प्रत्यक्षात त्या कामांसाठी एक ते दोन तास लागतात. ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. हे चित्र कुण्या एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्यात बहुतांश हीच स्थिती आहे.स्पर्धेच्या युगात एकीकडे बँका झपाट्याने कात टाकत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन ग्राहकांना अधिक तत्परत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या तुलनेत डाक विभागाचा कारभार अद्यापही ‘दिन मे ढाई कोस’ असाच असल्याची ओरड ग्राहकांमधून ऐकायला मिळते.

कार्यालये चकाचक, व्यवस्था मात्र ‘जैसे थे’प्रमुख डाक कार्यालये चकाचक झाली असली तरी तेथील व्यवस्था व सुविधा मात्र जैसे थेच आहे. प्रत्येक डाक कार्यालयात ‘नागरिक वचन पत्र’ लागलेले आहेत. कोणते काम किती मिनिटात होईल, याची हमी त्यावर दिली गेली आहे. डाक सेवा, अल्प बचत, बचत पत्रे, आर्थिक बाजार, मयत दावा मामले यातील कामे किमान दोन मिनिटे व कमाल २० मिनिटात होईल, असे या हमी पत्रावर नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती याच्या उलटी आहे. ग्राहकांना कोणत्याही कामासाठी तासन्तास रांगेत रहावे लागते. साधी पास बुक एन्ट्री करायची असेल तर वारंवार येरझारा माराव्या लागतात.

‘लिंक नाही’ म्हणून यंत्रणेचे हातवर‘लिंक नाही’ हे ठेवणीतील उत्तर प्रत्येक वेळी पुढे करून डाक कर्मचारी स्वत:ची सुटका करून घेताना दिसतात. आधीच डाक कार्यालयांची संख्या कमी, त्यात एकाच कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. डाक कार्यालयांवर नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे. परंतु सेवा व्यवस्थित नसल्याने बहुतांश ग्राहकांनी डाक कार्यालयाकडे पाठ फिरवून बँकांना पसंती दिली आहे. आपल्याकडील ग्राहकांची गर्दी कमी झाली म्हणून तेथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता दिसत नाही किंवा ग्राहक वाढावे म्हणून या कर्मचाऱ्यांनी तसदी घेतल्याचे ऐकिवात नाही. ग्राहकांना तेथे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. विविध एजंट असले तरी ते बहुतांश कामे ग्राहकांनाच करायला सांगतात. स्वत: केवळ बसल्या ठिकाणावरून सूचना देतात.वयोवृद्ध तासन्तास रांगेतडाक विभागाच्या संथ सेवेमुळे वयोवृद्धांनासुद्धा तासन्तास रांगेत ताटकळत रहावे लागते. त्यांच्यासाठी प्रतीक्षागृहात पुरेशा खुर्च्या, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. डाक कार्यालयातील ही सर्व व्यवस्था पाहता ‘नागरिक वचन पत्र’ थोतांड ठरत असल्याचे दिसते. कर्मचारी कमी आहेत, लिंक नाही अशी कारणे पुढे करून डाक यंत्रणा स्वत:चा बचाव करताना दिसते. ‘बोलणे विकत घ्यावे लागेल’ अशी काही डाक कर्मचाऱ्यांची वर्तवणूक असल्याचे सांगितले जाते. एकूणच डाक सेवेवर ग्राहक समाधानी नसल्याचे स्पष्ट होते. काही तक्रारी असल्यास नेमकी कुणाकडे दाद मागावी, त्यांचे संपर्क क्रमांक हेसुद्धा डाक कार्यालयात नमूद नसतात. त्यामुळेच जनतेत विश्वास असूनही डाक सेवेबाबत नाराजी पहायला मिळते.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस