शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

डाक खात्यातील ‘नागरिक वचन पत्र’ ठरले थोतांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 13:18 IST

डाक खात्यात कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचे निर्धारण केले गेले आहे. त्यासाठी ‘नागरिक वचन पत्र’ असे फलक प्रत्येक डाक कार्यालयात लावले गेले आहे. परंतु हे वचन पत्र थोतांड ठरत आहे.

ठळक मुद्देवेळेचे निर्धारण कागदावरचहमी दोन मिनिटांची, लागतात दोन तास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डाक खात्यात कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचे निर्धारण केले गेले आहे. त्यासाठी ‘नागरिक वचन पत्र’ असे फलक प्रत्येक डाक कार्यालयात लावले गेले आहे. परंतु हे वचन पत्र थोतांड ठरत आहे. कारण कोणत्याही कामासाठी दोन ते पाच मिनिटांची हमी डाक विभागाकडून दिली गेली असली तरी प्रत्यक्षात त्या कामांसाठी एक ते दोन तास लागतात. ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. हे चित्र कुण्या एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्यात बहुतांश हीच स्थिती आहे.स्पर्धेच्या युगात एकीकडे बँका झपाट्याने कात टाकत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन ग्राहकांना अधिक तत्परत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या तुलनेत डाक विभागाचा कारभार अद्यापही ‘दिन मे ढाई कोस’ असाच असल्याची ओरड ग्राहकांमधून ऐकायला मिळते.

कार्यालये चकाचक, व्यवस्था मात्र ‘जैसे थे’प्रमुख डाक कार्यालये चकाचक झाली असली तरी तेथील व्यवस्था व सुविधा मात्र जैसे थेच आहे. प्रत्येक डाक कार्यालयात ‘नागरिक वचन पत्र’ लागलेले आहेत. कोणते काम किती मिनिटात होईल, याची हमी त्यावर दिली गेली आहे. डाक सेवा, अल्प बचत, बचत पत्रे, आर्थिक बाजार, मयत दावा मामले यातील कामे किमान दोन मिनिटे व कमाल २० मिनिटात होईल, असे या हमी पत्रावर नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती याच्या उलटी आहे. ग्राहकांना कोणत्याही कामासाठी तासन्तास रांगेत रहावे लागते. साधी पास बुक एन्ट्री करायची असेल तर वारंवार येरझारा माराव्या लागतात.

‘लिंक नाही’ म्हणून यंत्रणेचे हातवर‘लिंक नाही’ हे ठेवणीतील उत्तर प्रत्येक वेळी पुढे करून डाक कर्मचारी स्वत:ची सुटका करून घेताना दिसतात. आधीच डाक कार्यालयांची संख्या कमी, त्यात एकाच कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. डाक कार्यालयांवर नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे. परंतु सेवा व्यवस्थित नसल्याने बहुतांश ग्राहकांनी डाक कार्यालयाकडे पाठ फिरवून बँकांना पसंती दिली आहे. आपल्याकडील ग्राहकांची गर्दी कमी झाली म्हणून तेथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता दिसत नाही किंवा ग्राहक वाढावे म्हणून या कर्मचाऱ्यांनी तसदी घेतल्याचे ऐकिवात नाही. ग्राहकांना तेथे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. विविध एजंट असले तरी ते बहुतांश कामे ग्राहकांनाच करायला सांगतात. स्वत: केवळ बसल्या ठिकाणावरून सूचना देतात.वयोवृद्ध तासन्तास रांगेतडाक विभागाच्या संथ सेवेमुळे वयोवृद्धांनासुद्धा तासन्तास रांगेत ताटकळत रहावे लागते. त्यांच्यासाठी प्रतीक्षागृहात पुरेशा खुर्च्या, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. डाक कार्यालयातील ही सर्व व्यवस्था पाहता ‘नागरिक वचन पत्र’ थोतांड ठरत असल्याचे दिसते. कर्मचारी कमी आहेत, लिंक नाही अशी कारणे पुढे करून डाक यंत्रणा स्वत:चा बचाव करताना दिसते. ‘बोलणे विकत घ्यावे लागेल’ अशी काही डाक कर्मचाऱ्यांची वर्तवणूक असल्याचे सांगितले जाते. एकूणच डाक सेवेवर ग्राहक समाधानी नसल्याचे स्पष्ट होते. काही तक्रारी असल्यास नेमकी कुणाकडे दाद मागावी, त्यांचे संपर्क क्रमांक हेसुद्धा डाक कार्यालयात नमूद नसतात. त्यामुळेच जनतेत विश्वास असूनही डाक सेवेबाबत नाराजी पहायला मिळते.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस