शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डाक खात्यातील ‘नागरिक वचन पत्र’ ठरले थोतांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 13:18 IST

डाक खात्यात कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचे निर्धारण केले गेले आहे. त्यासाठी ‘नागरिक वचन पत्र’ असे फलक प्रत्येक डाक कार्यालयात लावले गेले आहे. परंतु हे वचन पत्र थोतांड ठरत आहे.

ठळक मुद्देवेळेचे निर्धारण कागदावरचहमी दोन मिनिटांची, लागतात दोन तास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डाक खात्यात कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचे निर्धारण केले गेले आहे. त्यासाठी ‘नागरिक वचन पत्र’ असे फलक प्रत्येक डाक कार्यालयात लावले गेले आहे. परंतु हे वचन पत्र थोतांड ठरत आहे. कारण कोणत्याही कामासाठी दोन ते पाच मिनिटांची हमी डाक विभागाकडून दिली गेली असली तरी प्रत्यक्षात त्या कामांसाठी एक ते दोन तास लागतात. ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. हे चित्र कुण्या एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्यात बहुतांश हीच स्थिती आहे.स्पर्धेच्या युगात एकीकडे बँका झपाट्याने कात टाकत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन ग्राहकांना अधिक तत्परत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या तुलनेत डाक विभागाचा कारभार अद्यापही ‘दिन मे ढाई कोस’ असाच असल्याची ओरड ग्राहकांमधून ऐकायला मिळते.

कार्यालये चकाचक, व्यवस्था मात्र ‘जैसे थे’प्रमुख डाक कार्यालये चकाचक झाली असली तरी तेथील व्यवस्था व सुविधा मात्र जैसे थेच आहे. प्रत्येक डाक कार्यालयात ‘नागरिक वचन पत्र’ लागलेले आहेत. कोणते काम किती मिनिटात होईल, याची हमी त्यावर दिली गेली आहे. डाक सेवा, अल्प बचत, बचत पत्रे, आर्थिक बाजार, मयत दावा मामले यातील कामे किमान दोन मिनिटे व कमाल २० मिनिटात होईल, असे या हमी पत्रावर नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती याच्या उलटी आहे. ग्राहकांना कोणत्याही कामासाठी तासन्तास रांगेत रहावे लागते. साधी पास बुक एन्ट्री करायची असेल तर वारंवार येरझारा माराव्या लागतात.

‘लिंक नाही’ म्हणून यंत्रणेचे हातवर‘लिंक नाही’ हे ठेवणीतील उत्तर प्रत्येक वेळी पुढे करून डाक कर्मचारी स्वत:ची सुटका करून घेताना दिसतात. आधीच डाक कार्यालयांची संख्या कमी, त्यात एकाच कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. डाक कार्यालयांवर नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे. परंतु सेवा व्यवस्थित नसल्याने बहुतांश ग्राहकांनी डाक कार्यालयाकडे पाठ फिरवून बँकांना पसंती दिली आहे. आपल्याकडील ग्राहकांची गर्दी कमी झाली म्हणून तेथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता दिसत नाही किंवा ग्राहक वाढावे म्हणून या कर्मचाऱ्यांनी तसदी घेतल्याचे ऐकिवात नाही. ग्राहकांना तेथे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. विविध एजंट असले तरी ते बहुतांश कामे ग्राहकांनाच करायला सांगतात. स्वत: केवळ बसल्या ठिकाणावरून सूचना देतात.वयोवृद्ध तासन्तास रांगेतडाक विभागाच्या संथ सेवेमुळे वयोवृद्धांनासुद्धा तासन्तास रांगेत ताटकळत रहावे लागते. त्यांच्यासाठी प्रतीक्षागृहात पुरेशा खुर्च्या, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. डाक कार्यालयातील ही सर्व व्यवस्था पाहता ‘नागरिक वचन पत्र’ थोतांड ठरत असल्याचे दिसते. कर्मचारी कमी आहेत, लिंक नाही अशी कारणे पुढे करून डाक यंत्रणा स्वत:चा बचाव करताना दिसते. ‘बोलणे विकत घ्यावे लागेल’ अशी काही डाक कर्मचाऱ्यांची वर्तवणूक असल्याचे सांगितले जाते. एकूणच डाक सेवेवर ग्राहक समाधानी नसल्याचे स्पष्ट होते. काही तक्रारी असल्यास नेमकी कुणाकडे दाद मागावी, त्यांचे संपर्क क्रमांक हेसुद्धा डाक कार्यालयात नमूद नसतात. त्यामुळेच जनतेत विश्वास असूनही डाक सेवेबाबत नाराजी पहायला मिळते.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस