शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालाच्या परीक्षेला पदवीधराची प्रश्नपत्रिका

By admin | Updated: March 8, 2015 02:01 IST

जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरू असून त्याकरिता चौथी पास हा निकष असताना प्रत्यक्षात पदवीधरालाही डोके खाजवायला लावेल एवढी कठीण प्रश्नपत्रिका काढली गेल्याच्या तक्रारी आहेत.

यवतमाळ : जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरू असून त्याकरिता चौथी पास हा निकष असताना प्रत्यक्षात पदवीधरालाही डोके खाजवायला लावेल एवढी कठीण प्रश्नपत्रिका काढली गेल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकारामुळे जिल्हाभरातील चौथी ते दहावी उत्तीर्ण शेकडो उमेदवार वंचित राहिले आहे. यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकच तालुक्यात कोतवाल पदाची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. प्रत्येक तालुक्यात किमान दोन डझन जागांची भरती होत आहे. उपविभागीय महसूल अधिकारी हे या भरती समितीचे अध्यक्ष असून तहसीलदार हे सचिव आहेत. अर्थात या भरतीची संपूर्ण प्रक्रिया राबविण्याचे, प्रश्नपत्रिका काढण्याचे, तपासण्याचे नियंत्रण एसडीओंकडे आहे. जिल्ह्यात प्रत्येक विभागात वेगवेगळ्या दिवशी लेखी परीक्षा घेतली गेली. मात्र या परीक्षेतील कठीण प्रश्नावलीविरुद्ध आता ओरड सुरू झाली आहे. शासनाच्या नियमानुसार कोतवाल पदासाठी चौथी उत्तीर्ण हा मूळ शैक्षणिक निकष आहे. त्यामुळे या निकषानुसार प्रश्नपत्रिका निघणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला सोडविता येईल, अशी प्रश्नपत्रिका एखादवेळी मान्य केली जावू शकते. मात्र प्रत्यक्षात अनेक तालुक्यांच्या प्रश्नपत्रिका या पदवीधर परीक्षांच्या समांतर असल्याच्या तक्रारी पुढे येवू लागल्या आहे. चौथी ते दहावी उत्तीर्ण उमेदवारांना कोतवाल पदापासून वंचित ठेवणे हा छुपा अजेंडा या मागे असल्याचा आरोपही होवू लागला आहे. विशेष असे या नोकर भरतीसाठी अनेक दलाल सक्रिय असून आर्थिक उलाढालही सुरू असल्याची चर्चा आहे. पदवीधरांसाठीही आव्हान ठरेल, अशी प्रश्नपत्रिका काढली गेल्याने कोतवालांच्या अनुकंपाधारक वारसांवरही अन्याय होतो आहे. संगणकाचे युग असल्याने सुशिक्षितच कोतवाल असावा, असे समर्थन प्रशासनातून केले जात असले तरी शासनाच्या त्या चौथी पास निकषाच्या आदेशाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कठीण पेपर काढला गेल्याने प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने युवक या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याची भीती आहे. बहुतांश तालुक्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यवतमाळ विभागातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. एसडीओ, तहसीलदारांनाच या भरती प्रक्रियेचे सर्वाधिकार दिले असल्याने अनेक ठिकाणी गौडबंगालाच्या तक्रारी आहेत. जिल्हा प्रशासनाचे या भरतीवर कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोप होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)