शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कोतवालाच्या परीक्षेला पदवीधराची प्रश्नपत्रिका

By admin | Updated: March 8, 2015 02:01 IST

जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरू असून त्याकरिता चौथी पास हा निकष असताना प्रत्यक्षात पदवीधरालाही डोके खाजवायला लावेल एवढी कठीण प्रश्नपत्रिका काढली गेल्याच्या तक्रारी आहेत.

यवतमाळ : जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरू असून त्याकरिता चौथी पास हा निकष असताना प्रत्यक्षात पदवीधरालाही डोके खाजवायला लावेल एवढी कठीण प्रश्नपत्रिका काढली गेल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकारामुळे जिल्हाभरातील चौथी ते दहावी उत्तीर्ण शेकडो उमेदवार वंचित राहिले आहे. यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकच तालुक्यात कोतवाल पदाची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. प्रत्येक तालुक्यात किमान दोन डझन जागांची भरती होत आहे. उपविभागीय महसूल अधिकारी हे या भरती समितीचे अध्यक्ष असून तहसीलदार हे सचिव आहेत. अर्थात या भरतीची संपूर्ण प्रक्रिया राबविण्याचे, प्रश्नपत्रिका काढण्याचे, तपासण्याचे नियंत्रण एसडीओंकडे आहे. जिल्ह्यात प्रत्येक विभागात वेगवेगळ्या दिवशी लेखी परीक्षा घेतली गेली. मात्र या परीक्षेतील कठीण प्रश्नावलीविरुद्ध आता ओरड सुरू झाली आहे. शासनाच्या नियमानुसार कोतवाल पदासाठी चौथी उत्तीर्ण हा मूळ शैक्षणिक निकष आहे. त्यामुळे या निकषानुसार प्रश्नपत्रिका निघणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला सोडविता येईल, अशी प्रश्नपत्रिका एखादवेळी मान्य केली जावू शकते. मात्र प्रत्यक्षात अनेक तालुक्यांच्या प्रश्नपत्रिका या पदवीधर परीक्षांच्या समांतर असल्याच्या तक्रारी पुढे येवू लागल्या आहे. चौथी ते दहावी उत्तीर्ण उमेदवारांना कोतवाल पदापासून वंचित ठेवणे हा छुपा अजेंडा या मागे असल्याचा आरोपही होवू लागला आहे. विशेष असे या नोकर भरतीसाठी अनेक दलाल सक्रिय असून आर्थिक उलाढालही सुरू असल्याची चर्चा आहे. पदवीधरांसाठीही आव्हान ठरेल, अशी प्रश्नपत्रिका काढली गेल्याने कोतवालांच्या अनुकंपाधारक वारसांवरही अन्याय होतो आहे. संगणकाचे युग असल्याने सुशिक्षितच कोतवाल असावा, असे समर्थन प्रशासनातून केले जात असले तरी शासनाच्या त्या चौथी पास निकषाच्या आदेशाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कठीण पेपर काढला गेल्याने प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने युवक या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याची भीती आहे. बहुतांश तालुक्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यवतमाळ विभागातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. एसडीओ, तहसीलदारांनाच या भरती प्रक्रियेचे सर्वाधिकार दिले असल्याने अनेक ठिकाणी गौडबंगालाच्या तक्रारी आहेत. जिल्हा प्रशासनाचे या भरतीवर कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोप होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)