शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

पंचायत समितीचा बेताल कारभार

By admin | Updated: October 19, 2015 00:21 IST

कुठल्याही प्रकारच्या कामासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची येथील पंचायत समितीत अडवणूक होते. एकूणच या कार्यालयाचा कारभार बेताल झाला आहे.

घाटंजी तालुक्यातील नागरिकांना त्रास : अधिकाऱ्यांचाही वचक संपला, कर्मचाऱ्यांची मनमानीघाटंजी : कुठल्याही प्रकारच्या कामासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची येथील पंचायत समितीत अडवणूक होते. एकूणच या कार्यालयाचा कारभार बेताल झाला आहे. कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. अधिकाऱ्यांचाही त्यांच्यावरील वचक संपल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट होत आहे. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. सुटीच्या अर्जाशिवाय गैरहजर राहणे, कार्यालयीन वेळेत उपस्थित न होणे, नेमून दिलेल्या टेबलवरील जबाबदारी पार पाडण्यात कुचराई करणे, असा प्रकार या पंचायत समितीत सुरू आहे. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घ्यावा लागतो. कार्यालयीन कामकाज सुरू होण्यासोबतच बहुतांश कर्मचारी पानटपरी किंवा चहा टपरीवर आढळून येतात. याच ठिकाणी त्यांचा शोध घ्यावा लागतो.पंचायत समितीमार्फत विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. मात्र सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या धोरणामुळे अनेक नागरिकांना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागते. कर्मचाऱ्यांच्या अशा वागण्याविषयी त्रस्त नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतरही काही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. कामधंदा सोडून ग्रामीण भागातील नागरिक या कार्यालयात पोहोचतात तेव्हा त्यांना कर्मचारीच उपलब्ध होत नाही. केव्हा येणार याविषयी कुणीही माहिती देत नाही. गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार नागरिकांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. (प्रतिनिधी)