शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पंचायत समितीचा बेताल कारभार

By admin | Updated: October 19, 2015 00:21 IST

कुठल्याही प्रकारच्या कामासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची येथील पंचायत समितीत अडवणूक होते. एकूणच या कार्यालयाचा कारभार बेताल झाला आहे.

घाटंजी तालुक्यातील नागरिकांना त्रास : अधिकाऱ्यांचाही वचक संपला, कर्मचाऱ्यांची मनमानीघाटंजी : कुठल्याही प्रकारच्या कामासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची येथील पंचायत समितीत अडवणूक होते. एकूणच या कार्यालयाचा कारभार बेताल झाला आहे. कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. अधिकाऱ्यांचाही त्यांच्यावरील वचक संपल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट होत आहे. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. सुटीच्या अर्जाशिवाय गैरहजर राहणे, कार्यालयीन वेळेत उपस्थित न होणे, नेमून दिलेल्या टेबलवरील जबाबदारी पार पाडण्यात कुचराई करणे, असा प्रकार या पंचायत समितीत सुरू आहे. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घ्यावा लागतो. कार्यालयीन कामकाज सुरू होण्यासोबतच बहुतांश कर्मचारी पानटपरी किंवा चहा टपरीवर आढळून येतात. याच ठिकाणी त्यांचा शोध घ्यावा लागतो.पंचायत समितीमार्फत विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. मात्र सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या धोरणामुळे अनेक नागरिकांना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागते. कर्मचाऱ्यांच्या अशा वागण्याविषयी त्रस्त नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतरही काही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. कामधंदा सोडून ग्रामीण भागातील नागरिक या कार्यालयात पोहोचतात तेव्हा त्यांना कर्मचारीच उपलब्ध होत नाही. केव्हा येणार याविषयी कुणीही माहिती देत नाही. गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार नागरिकांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. (प्रतिनिधी)