शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

भाजपा राजवटीमुळे राजकीय, सामाजिक स्थैर्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:28 IST

सध्याच्या भाजपा राजवटीमुळे भारतीय राजकीय आणि सामाजिक स्थैर्याला मोठा धोका आहे. नोटाबंदीचा निर्णय हे त्याचे उदाहरण. काळा पैसा तर काही परत आला नाही.

ठळक मुद्देभालचंद्र मुणगेकर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सध्याच्या भाजपा राजवटीमुळे भारतीय राजकीय आणि सामाजिक स्थैर्याला मोठा धोका आहे. नोटाबंदीचा निर्णय हे त्याचे उदाहरण. काळा पैसा तर काही परत आला नाही. सर्वसामान्यांना मात्र प्रचंड त्रास झाला, अजूनही होत आहे. जीएसटीसारख्या चांगल्या आणि गरजेच्या कायद्याचे या सरकारने वाटोळे केले आहे. केवळ योजनांचे नाव बदलून श्रेय लाटणारा भाजपा हा पक्ष गेम चेंजर नसून केवळ नेम चेंजर आहे, अशी टीका नियोजन आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी समारोहानिमित्त जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने डॉ. भालचंद्र मुणगेकर व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मुणगेकर पुढे म्हणाले, इंदिरा गांधींनी ज्या विपरित परिस्थितीत राजकारण सांभाळले, तोच आदर्श ठेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी २०१९ च्या दृष्टीने कामाला लागण्याची गरज आहे. भाजपा हे या देशाची धर्मनिरपेक्षता, समानता या संकल्पनांसाठी संकट आहे. हे संकट २०१९ मध्ये आपोआप टळणार नाही. देश एकत्र ठेवायचा असेल तर काँग्रेसने आंदोलनात उडी घेतली पाहिजे. मुस्लिम राष्ट्र ही संकल्पना जीनांच्याही आधी सावरकरांनी मांडली. हिंदूधर्म वेगळा आणि हिंदूत्व वेगळे. हिंदू राष्ट्राला विरोध म्हणजे हिंदू धर्माला विरोध नव्हे. हिंदूत्व हे असे राजकीय तत्वज्ञान आहे, जे लोकशाही, सर्वसमावेशक विकास आणि समानतेचा विरोध करते. हिंदूराष्ट्र म्हणजे मूठभर लोकांचे सरकार. त्यात १० कोटी आदिवासी, २० कोटी दलित आणि ५० कोटी ओबीसींना कोणतेही स्थान नाही. हा धोका लक्षात घेतला तर सध्या भाजपामध्ये असलेल्या ओबीसींचे मेंदू सुधारण्याची गरज आहे, असा घणाघातही डॉ. मुणगेकर यांनी केला.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कर्तृत्व समजावून सांगताना कुमार केतकर म्हणाले, जागतिक मंदीत भले भले देश नेस्तनाबूत झालेले असतानाही डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था टिकवून ठेवली. या यशाच्या मूळाशी इंदिरा गांधीचे कर्तृत्व आहे. त्यांनी फार पूर्वी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. त्यामुळे मंदीतही देश तरला. धर्मवादी संस्थांचा धोका ओळखूनच इंदिरा गांधींनी राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन संकल्पना समाविष्ट केल्या. त्यासाठी कोणीही चळवळी नव्हत्या केल्या. पण देशाचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतो आहे. जयप्रकाश नारायण यांनी लष्करी हुकूमशाहीकरिता चिथावनी दिल्यामुळेच इंदिरा गांधींना आणीबाणी लागू करावी लागली. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वत:च निवडणुका लावल्या. त्यांच्यावर ४८ आयोग लावूनही त्यांच्याविरुद्ध एकही पुरावा मिळू शकला नाही. आज अनेकांच्या डोक्यात हिंदू राष्ट्राची वावटळ शिरली आहे. पण हिंदूराष्ट्र केल्यास देशाची फाळणी अटळ आहे.या कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंतराव पुरके, शिवाजीराव मोघे, माजी आमदार विजय खडसे, विजयाताई धोटे, काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा, जीवन पाटील आदी उपस्थित होते.