शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

पोलीस वसाहत की पोड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:25 PM

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीला जंगलाचे स्वरूप आले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे. वराह आणि मोकाट जनावरांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांचेही दुर्लक्ष : प्रचंड दुर्गंधी आणि वराहांमुळे डेंग्यूची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीला जंगलाचे स्वरूप आले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे. वराह आणि मोकाट जनावरांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे. नगरपरिषद प्रशासनालाही लक्ष देण्यास उसंत नाही. यामुळे हा संपूर्ण परिसर एखाद्या मागास पोडासारखा दिसत आहे. पोलीस कुटुंब वसाहतीमधून काढता पाय घेण्याच्या वाटेवर आहेत.पळसवाडी कॅम्प हा परिसर पोलीस वसाहत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पोलिसांचे कुटुंब वास्तव्याला आहेत. तरी या वसाहतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परिसरात काटेरी वृक्ष, काचकोऱ्या, झिंगुरड्याची झाडे, अंगाला चिकटणारे काटे पसरले आहेत. या वेढ्याने विद्युत डीपीलाही घेरले आहे. यामुळे वीज गुल होण्याचा प्रश्न मोठा झाला आहे. या भागात वारंवार वीज ‘ट्रिप’ होत आहे.या भागातील नाल्या आणि ‘शोकपिट’ बेवारस आहे. यातून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे, नाल्या आणि शोकपिट डासांच्या उद्रेकाचे केंद्र बनले आहे. यवमाळ शहरात डेंग्यूची साथ पसरली असताना नगरपरिषदेने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. या भागाचे नगरसेवक जगदीश वाधवानी यांचे या परिसराकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. पोलीस आणि कुटुंबीयांनी या वसाहतीच्या प्रश्नावर नगरसेवकाकडे वारंवार तक्रारी नोंदविल्या. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे संपूर्ण परिसराला जंगलाचे स्वरूप आले आहे. या भयावह स्थितीने पोलीस कुटुंबांमध्ये दहशत पसरली आहे. डेंग्यूच्या उदे्रकावर कशी मात करावी, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. समाजाला संरक्षण पुरविणाऱ्या पोलिसांना आपल्या कुटुंबीयांसाठीही संघर्ष करावा लागत आहे.आम्हाला वाळीत टाक ले काय?कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी लढतात. पण त्यांच्या कुटुंबीयांना नगरपरिषदेने वाळीत टाकले काय, असा प्रश्न या वसाहतीमधील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. भर उन्हाळ्यातील पाणीटंचाईतही या भागाकडे असेच दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी नोंदविली.पोलिसदादापुढे दुहेरी संकटगावगुंडांपासून सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या वसाहतीकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे गावगुंडांशी झुंजताना अनारोग्य आणि साथीच्या आजाराशीही झुंजण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. यातून पोलीस कुटुंबांमध्ये नगरपरिषदेप्रती रोष व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस