शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलीस वसाहत की पोड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:26 IST

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीला जंगलाचे स्वरूप आले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे. वराह आणि मोकाट जनावरांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांचेही दुर्लक्ष : प्रचंड दुर्गंधी आणि वराहांमुळे डेंग्यूची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीला जंगलाचे स्वरूप आले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे. वराह आणि मोकाट जनावरांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे. नगरपरिषद प्रशासनालाही लक्ष देण्यास उसंत नाही. यामुळे हा संपूर्ण परिसर एखाद्या मागास पोडासारखा दिसत आहे. पोलीस कुटुंब वसाहतीमधून काढता पाय घेण्याच्या वाटेवर आहेत.पळसवाडी कॅम्प हा परिसर पोलीस वसाहत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पोलिसांचे कुटुंब वास्तव्याला आहेत. तरी या वसाहतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परिसरात काटेरी वृक्ष, काचकोऱ्या, झिंगुरड्याची झाडे, अंगाला चिकटणारे काटे पसरले आहेत. या वेढ्याने विद्युत डीपीलाही घेरले आहे. यामुळे वीज गुल होण्याचा प्रश्न मोठा झाला आहे. या भागात वारंवार वीज ‘ट्रिप’ होत आहे.या भागातील नाल्या आणि ‘शोकपिट’ बेवारस आहे. यातून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे, नाल्या आणि शोकपिट डासांच्या उद्रेकाचे केंद्र बनले आहे. यवमाळ शहरात डेंग्यूची साथ पसरली असताना नगरपरिषदेने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. या भागाचे नगरसेवक जगदीश वाधवानी यांचे या परिसराकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. पोलीस आणि कुटुंबीयांनी या वसाहतीच्या प्रश्नावर नगरसेवकाकडे वारंवार तक्रारी नोंदविल्या. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे संपूर्ण परिसराला जंगलाचे स्वरूप आले आहे. या भयावह स्थितीने पोलीस कुटुंबांमध्ये दहशत पसरली आहे. डेंग्यूच्या उदे्रकावर कशी मात करावी, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. समाजाला संरक्षण पुरविणाऱ्या पोलिसांना आपल्या कुटुंबीयांसाठीही संघर्ष करावा लागत आहे.आम्हाला वाळीत टाक ले काय?कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी लढतात. पण त्यांच्या कुटुंबीयांना नगरपरिषदेने वाळीत टाकले काय, असा प्रश्न या वसाहतीमधील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. भर उन्हाळ्यातील पाणीटंचाईतही या भागाकडे असेच दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी नोंदविली.पोलिसदादापुढे दुहेरी संकटगावगुंडांपासून सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या वसाहतीकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे गावगुंडांशी झुंजताना अनारोग्य आणि साथीच्या आजाराशीही झुंजण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. यातून पोलीस कुटुंबांमध्ये नगरपरिषदेप्रती रोष व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस