शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ हद्दवाढीवर नगरपरिषदेची मोहोर

By admin | Updated: December 27, 2014 02:33 IST

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत यवतमाळ शहराच्या हद्दवाढीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावामुळे शहराच्या हद्दवाढीतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

यवतमाळ : नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत यवतमाळ शहराच्या हद्दवाढीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावामुळे शहराच्या हद्दवाढीतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता राज्य शासनाचा नगरविकास विभाग कार्य निर्णय घेतो यावरच लगतच्या ग्रामपंचायतींचे अस्तित्व अवलंबून आहे. नगरपरिषदेच्या सीमा आणि लगतच्या ग्रामपंचायतींची सीमा यात सरमिसळ झाली होती. शहरातील लगतच्या भागात तेवढीच लोकसंख्या असलेली वसाहत निर्माण झाल्याने विकास कामांचा अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. यवतमाळ शहराच्या मर्यादित विकासाला खऱ्या अर्थाने चालणा देण्यासाठी हद्दवाढ करणे हाच एकमेव उपाय शिल्लक आहे. त्याच दृष्टीकोणातून हा निर्णय सभागृहाने घेतला. शहरालगतच्या यवतमाळ ग्रामीण परिसराचा ग्रामपंचायत अथवा नगरपरिषदेत समावेश करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने थेट नगरविकास विभागाला आदेश देऊन यवतमाळ ग्रामीणचा परिसर समाविष्ट करण्याबाबत निर्देशित केले होते. जिल्हा परिषदेने यवतमाळ ग्रामीण क्षेत्र नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी नाहरकत दिली. त्यानंतर नगरपरिषदेने ४ एप्रिल २०१३ रोजी यवतमाळ ग्रामीण हा भाग नगरपरिषदमध्ये समाविष्ट केला. त्याचवेळी लगतच्या १० ग्रामपंचायतींचासुद्धा समावेश करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला होता. मात्र नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभागृहात हद्दवाढीच्या दृष्टीकोणातून कोणताच ठराव घेण्यात आला नाही. त्यामुळे यासंदर्भातील कार्यवाही पुढे सरकली नाही. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी एक मताने यवतमाळ शहरालगतच्या मोहा, डोर्ली, डोळंबा, भोसा, उमरसरा, गोधणी, वडगाव, पिंपळगाव, वाघापूर, लोहारा या ग्रामपंचायतींसह पांगरी हे उजाड गावही समाविष्ट करण्याचा ठराव घेतला. आता नगरपरिषदेच्या हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय राज्यशासनाला घ्यावयाचा आहे. लगतच्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येचा दबाव पाहता शहराच्या विकासाच्या दृष्टीने लवकरात लवकर हद्दवाढ करणे आवश्यक झाले आहे. भविष्यात अनेक मोठ्या समस्या निर्माण होण्यापूर्वीच नगरपरिषदेची हद्दवाढ करून येथील यंत्रणा कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.शिवाय हद्दवाढीच्या ठरावाला कायदेशीर आधार आहे. नगरपरिषदेच्या क्षेत्रापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे विलिनीकरण करणे आवश्यक आहे. याच कायद्याचा आधार घेऊन यवतमाळ नगरपरिषदेने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)