शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

यवतमाळ हद्दवाढीवर नगरपरिषदेची मोहोर

By admin | Updated: December 27, 2014 02:33 IST

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत यवतमाळ शहराच्या हद्दवाढीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावामुळे शहराच्या हद्दवाढीतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

यवतमाळ : नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत यवतमाळ शहराच्या हद्दवाढीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावामुळे शहराच्या हद्दवाढीतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता राज्य शासनाचा नगरविकास विभाग कार्य निर्णय घेतो यावरच लगतच्या ग्रामपंचायतींचे अस्तित्व अवलंबून आहे. नगरपरिषदेच्या सीमा आणि लगतच्या ग्रामपंचायतींची सीमा यात सरमिसळ झाली होती. शहरातील लगतच्या भागात तेवढीच लोकसंख्या असलेली वसाहत निर्माण झाल्याने विकास कामांचा अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. यवतमाळ शहराच्या मर्यादित विकासाला खऱ्या अर्थाने चालणा देण्यासाठी हद्दवाढ करणे हाच एकमेव उपाय शिल्लक आहे. त्याच दृष्टीकोणातून हा निर्णय सभागृहाने घेतला. शहरालगतच्या यवतमाळ ग्रामीण परिसराचा ग्रामपंचायत अथवा नगरपरिषदेत समावेश करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने थेट नगरविकास विभागाला आदेश देऊन यवतमाळ ग्रामीणचा परिसर समाविष्ट करण्याबाबत निर्देशित केले होते. जिल्हा परिषदेने यवतमाळ ग्रामीण क्षेत्र नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी नाहरकत दिली. त्यानंतर नगरपरिषदेने ४ एप्रिल २०१३ रोजी यवतमाळ ग्रामीण हा भाग नगरपरिषदमध्ये समाविष्ट केला. त्याचवेळी लगतच्या १० ग्रामपंचायतींचासुद्धा समावेश करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला होता. मात्र नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभागृहात हद्दवाढीच्या दृष्टीकोणातून कोणताच ठराव घेण्यात आला नाही. त्यामुळे यासंदर्भातील कार्यवाही पुढे सरकली नाही. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी एक मताने यवतमाळ शहरालगतच्या मोहा, डोर्ली, डोळंबा, भोसा, उमरसरा, गोधणी, वडगाव, पिंपळगाव, वाघापूर, लोहारा या ग्रामपंचायतींसह पांगरी हे उजाड गावही समाविष्ट करण्याचा ठराव घेतला. आता नगरपरिषदेच्या हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय राज्यशासनाला घ्यावयाचा आहे. लगतच्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येचा दबाव पाहता शहराच्या विकासाच्या दृष्टीने लवकरात लवकर हद्दवाढ करणे आवश्यक झाले आहे. भविष्यात अनेक मोठ्या समस्या निर्माण होण्यापूर्वीच नगरपरिषदेची हद्दवाढ करून येथील यंत्रणा कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.शिवाय हद्दवाढीच्या ठरावाला कायदेशीर आधार आहे. नगरपरिषदेच्या क्षेत्रापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे विलिनीकरण करणे आवश्यक आहे. याच कायद्याचा आधार घेऊन यवतमाळ नगरपरिषदेने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)