शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

फुलसांवगी शाळेला पाचव्या दिवशीही टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:47 IST

शिक्षकांच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून येथील केंद्रीय शाळेला टाळे लागले आहे. मात्र शिक्षण विभाग अद्याप उदासीन असल्याने आता २८ जुलै रोजी पालकांनी फुलसावंगी ते महागाव राज्य मार्गावरच शाळा भरविण्याचा पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशासन उदासीन : शनिवारी राज्य मार्गावर भरविणार वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कफुलसावंगी : शिक्षकांच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून येथील केंद्रीय शाळेला टाळे लागले आहे. मात्र शिक्षण विभाग अद्याप उदासीन असल्याने आता २८ जुलै रोजी पालकांनी फुलसावंगी ते महागाव राज्य मार्गावरच शाळा भरविण्याचा पवित्रा घेतला आहे.येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंत ३६५ विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे शिक्षकांची १३ पदे मंजूर आहे. मात्र केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी पालक व नागरिकांनी १२ जुलै रोजी शिक्षण विभाला निवेदन दिले. मात्र शिक्षक न मिळाल्याने २० जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकले. पाच दिवस उलटून गेल्यानंतरही शिक्षण विभाग जागा न झाल्याने आता पालकांनी रस्त्यावरच शाळा भरविण्याचा इशारा दिला आहे.२८ जुलै रोजी सकाळी १० वाजता फुलसावंगी ते महागाव या राज्य मार्गावर शाळा भरविण्याचा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला असून तसे निवेदन महागावचे तहसीलदार, गटविकास आधिकारी, ठाणेदार आदींना देण्यात आले. यावेळी अमर दळवे, अजय देशपांडे, योगेश बाजपेई, याकूब खान, शशिकांत नाईक, अनिल गवळी, रघू बाभळे यांच्यासह पालक व नागरिक उपस्थित होते.अधिकारी, शिक्षण विभागाचे दुर्लक्षशिक्षकांची वारंवार मागणी करूनही अधिकारी आणि शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत आहे. यामुळे पालक संतापले आहे. शाळेला कुलूप ठोकूनही प्रशासन दाद देत नसल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता चक्क राज्य मार्गावरच शाळा भरवून शासनाचा निषेध केला जाणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण