शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सक्तीच्या रजेविरोधात न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

सक्तीची रजा दिली जात असल्याने कामगारांचे होणारे नुकसान संघटनेच्या माध्यमातून प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून लक्षात आणून दिले. आजची परिस्थिती नैसर्गिक आपत्ती आहे, मंदी नाही हे महामंडळाला पटवून देण्यात आले. तरीही कामगारांना २० दिवसांची सक्तीची रजा देण्यात आली आहे. यवतमाळ विभागातील ७०० ते ८०० लोकांना रजेवर पाठविण्यात आले आहे. यामध्ये चालक, वाहक, यांत्रिक, वाहतूक नियंत्रक या प्रकारातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देएसटी कामगार संघटना : आर्थिक नुकसान होण्याची कामगारांना भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राबविलेल्या सक्तीची रजा धोरणाविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने अखेर न्यायालयात धाव घेतली. प्रशासनस्तरावर तोडगा निघत नसल्याने संघटनेचे यवतमाळ विभागीय सचिव राहुल धार्मिक यांनी येथील औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर प्रशासनाला बाजू मांडण्यासाठी ११ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे.सक्तीची रजा दिली जात असल्याने कामगारांचे होणारे नुकसान संघटनेच्या माध्यमातून प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून लक्षात आणून दिले. आजची परिस्थिती नैसर्गिक आपत्ती आहे, मंदी नाही हे महामंडळाला पटवून देण्यात आले. तरीही कामगारांना २० दिवसांची सक्तीची रजा देण्यात आली आहे. यवतमाळ विभागातील ७०० ते ८०० लोकांना रजेवर पाठविण्यात आले आहे. यामध्ये चालक, वाहक, यांत्रिक, वाहतूक नियंत्रक या प्रकारातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.कर्मचाऱ्यांना सलग २० दिवसांची सुटी दिल्यास तीन आठवडे विश्रांती बुडते. शिल्लक असलेल्या २० दिवसांच्या रजेचे नुकसान होते. या सुट्या संपल्यानंतर पुढील काळात सुट्या घ्यायच्या असल्यास बिनपगारी राहील, असेही सांगितले जाते. या सर्व प्रकारात कामगारांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने कामगार संघटनेने सक्तीची रजा हा प्रकार थांबविण्याची मागणी रेटून धरली. प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. खर्चात बचतीच्या नावाखाली महामंडळाने कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे सुरू केले असल्याचा आरोप आहे. कामगार करार २०१२-२०१६ मधील कलम ५५ नुसार परिस्थितीचा विचार होणे गरजेचे असल्याचे प्रशासनाला सांगितले गेले. अखेर संघटनेला न्यायालयात धाव घ्यावी लागली.खर्च वाचविण्यासाठी विविध फंडेएसटी महामंडळाने खर्च वाचविण्यासाठी विविध फंडे वापरणे सुरू केले आहे. या प्रकारात कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. आधी रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली. आता काही कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. आधीच मागील काही महिन्यांपासून नियमित पगार नसल्याने कर्मचारी वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशातच त्यांच्या अनेक प्रकारच्या हक्कांवर आघात केले जात असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :state transportएसटी