शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

पारधी बांधवांचे घरकूल प्रमाणपत्राच्या चक्रव्यूहात

By admin | Updated: November 13, 2014 23:09 IST

शबरी घरकूल योजनेतून पारधी कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने पुढाकार घेतला. तब्बल ४० कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले.

किनवट : शबरी घरकूल योजनेतून पारधी कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने पुढाकार घेतला. तब्बल ४० कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र कागदपत्रांची पूर्तता कशी करावी असा प्रश्न या पारधी बांधवांपुढे निर्माण झाला आहे. गावोगाव भटकंती करणाऱ्यांना गाव आठ नमुना क्रमांक कोण देणार असा प्रश्न यंत्रणेसमोरही उभा ठाकला आहे.कुठल्याही स्तरावरचा माणूस हा आपल्या ऊराशी हक्काच्या घराच स्वप्न बाळगून असतो. संपूर्ण जीवनभर हक्काच्या चार भिंती उभारण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू असतो. त्यातच अतिशय मागासलेपणाच जीवन जगणाऱ्या पारधी कुटुंबाला हक्काच्या घराच स्वप्न पडणही दुरान्वये शक्य नाही. कुठे तरी गावकुसाबाहेर पाल ठोकून मजल दरमजल करत आपला संसार चालवायचा हाच त्यांचा नित्यक्रम असतो. नांदेड जिल्ह्यात २००१ च्या जनगणनेनुसार पारधी कुटुंबांची संख्याही दोन हजार ७१३ एवढी आहे. अतिदारिद्रयात जीवन जगणारी जमात म्हणून शासन दरबारी यांचा उल्लेख आहे. त्यामुळेच एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून आज पारधी कुटुंबांना ४० घरकूल मंजूर करण्यात आले. मंजुरी मिळाल्यानंतर एक लाख रुपये अनुदानाची ही योजना ७० हजार रुपयावर आणण्यात आली. राहण्याचा पत्ताच नसलेल्या पारध्यांकडे कागदपत्र येणार कुठून असा प्रश्न सर्वांनाच पडला. त्यामुळे मंजूर होवूनही घरकुलाचे काम रेंगाळले. याच कालावधीत ७० हजार रुपये आर्थिक मर्यादेची ही योजना पुन्हा एक लाख रुपये करण्यात आली. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी माळराण तुडविणाऱ्या पारध्यांना आता घरासाठी कागदपत्र गोळा करण्याकरिता भटकण्याची वेळ आली आहे. शिकार हा मूळ व्यवसाय असलेल्या पारध्यांचे वन विभागाचा ससेमिरा मागे लागल्यामुळे सातत्यानेच भटकंती सुरू असते. ‘उचलली पाल दुसऱ्या गावाला चाल’ या उक्तीप्रमाणे त्यांचा जीवनक्रम असतो. अशा स्थितीत २०११-१२ मध्ये मंजूर झालेले १९ घरकूल तर २०१३-१४ मध्ये मंजूर झालेले २१ घरकूल अद्यापही पूर्ण झाले नाही. ज्यांना गावाचा ठिकाणा नाही त्यांच्याकडे रविहासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, दारिद्रयरेषा प्रमाणपत्र, गाव नमुना आठ अ यासारखे प्रमाणपत्र येणार कुठून हा प्रश्न आहे. ठाव ठिकाणा नसल्याने शबरी घरकुल योजनेच्या लाभापासून हे पारधी बांधव वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ७ आॅगस्ट २०१४ च्या सुधारित शासन आदेशानुसार घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून ते ७० हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात आली आहे. एक लाखात किमान डोक्यावर छत करणे शक्य आहे. मात्र प्रमाणपत्राच्या चक्रव्यूहात अडकलेले घरकुलाचे स्वप्न आता कसे पूर्ण होणार याची चिंता या कुटुंबांना लागली आहे.शासनाने यांच्यासाठी अट शिथील करून वेगळ्या पद्धतीने योजना राबवावी, जेणेकरून शासनाचा उद्देश सफल होईल, अशी मागणीही या समाजातील व्यक्तींकडून होत आहे. (वार्ताहर)