शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
3
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
4
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
5
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
6
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
7
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
8
९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
9
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
10
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
11
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
12
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
13
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
14
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
15
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
16
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
17
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
18
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
19
Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!
20
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण

पैनगंगा नदी पात्रला आले वाळवंटाचे रुप

By admin | Published: February 20, 2017 1:28 AM

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र गत काही दिवसापूर्वी कोरडे पडले असून ...

पाणीटंचाईची चाहूल : ५० गावातील नागरिक होणार प्रभावित उमरखेड : विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र गत काही दिवसापूर्वी कोरडे पडले असून यामुळे उमरखेड तालुक्यातील ५० गावात पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. जनावरांच्या पाण्यासह विविध समस्या निर्माण होणार आहे.उमरखेड तालुक्याची जीवनदायिनी पैनगंगा यावर्षी पुन्हा कोरडी पडली आहे. गत काही वर्षांपासून पैनगंगा नदी कोरडी पडत असल्याने नदी तीरावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षीही पैनगंगा कोरडी झाल्याने भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवटपिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, चिंचोली संगम, मार्लेगाव, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरुस, देवसरी, कारखेड, लोहरा, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, सिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, बिटरगाव, भोजनगर, जेवली, पेंदा, सोनदाबी, मोरचंडी, जवराळा, गाडी-बोरी, मुरली, सहस्त्रकुंड, पिंपळगाव, खरबी, परोटी वन यासह अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या नदीच्या काठावर गावागावातील नळ योजना आहे. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच पैनगंगेचे पात्र कोरडे पडायला लागले होते. नदी पात्रात ठिकठिकाणी डबके साचले आहे. आता तर काही भागात नदीचे वाळवंट झाले आहे. याच पैनगंगा नदीवर मोटारपंप लावून अनेक जण रबीचा हंगाम घेतात. परंतु नदी आटल्याने सिंचन करणे कठीण झाले आहे. अनेकांची रबी पिके धोक्यात आली आहे. पूर्वी बाराही महिने वाहणारी पैनगंगा इसापूर येथे धरण बांधल्यापासून उन्हाळ्यात आटायला लागली आहे. तर पावसाळ्यात अतिरिक्त पाणी सोडल्याने पुराचा फटका सहन करावा लागतो. दरवर्षी उन्हाळ्यात इसापूर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो. तब्बल तीन महिने या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होतो. पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहे. (शहर प्रतिनिधी)पाण्यासाठी भटकंतीपैनगंगा नदी कोरडी पडल्याने विदर्भातील ५० आणि मराठवाड्यातील ३० गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. यावेळी नदीच्या तीरावरील नळ योजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.