शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘मेडिकल’चा बालरुग्ण विभाग वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:26 IST

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागात मोठी अनागोंदी सुरू आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या भरवशावरच इथला कारभार आहे. त्यातही बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर येथे प्रामाणिकपणे सेवा देतात.

ठळक मुद्देअसभ्य वर्तणूक : बालमृत्यूचे प्रमाणही वाढले, कनिष्ठ डॉक्टरांवरच भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागात मोठी अनागोंदी सुरू आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या भरवशावरच इथला कारभार आहे. त्यातही बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर येथे प्रामाणिकपणे सेवा देतात. बाकीचे आलेल्या रुग्णांना असभ्य भाषेत बोलून येथून हुसकावून लावण्याचाच प्रयत्न करत आहे. यामुळे याठिकाणी बालमृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येते.बाल रुग्ण विभागात शनिवारी पहाटे अकबर वसीम खान (वय २ वर्षे) रा.नबाबपूरा कळंब चौक या बालकाचा मृत्यू झाला. हा बालक आठ दिवसांपासून येथे उपचार घेत होता. रात्री अचानक तो मोठ्याने खोकलायला लागला. मात्र यावेळी वॉर्डात कोणीच उपलब्ध नव्हते. धावपळ करून डॉक्टरांना बोलाविण्यात आले. इन्चार्ज नर्स खोली कुलुपबंद करून झोपी गेली. त्यामुळे काही वेळ आलेल्या डॉक्टरची तारांबळ झाली. शेवटी नर्सला उठवून चाबी घेत औषधांचा साठा असलेली खोली उघडण्यात आली. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या विभागात मागील काही दिवसांपासून अनागोंदी असून केवळ कनिष्ठ डॉक्टरांवरच उपचाराची यंत्रणा अवलंबून आहे. सलमा शेख (२०) रा.सावनेर ही महिला आपल्या मुलीला घेऊन शुक्रवारी रात्री ११ वाजता रुग्णालयात आली. बाल रुग्ण विभागात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने असभ्य शब्दांचा वापर करत एवढ्या रात्री कशाला आली म्हणून हेळसांड केली. ही आपबीती सलमा शेख या महिलेने सांगितली. याशिवाय अंकुश प्रभूसिंग पवार हा मागील ११ दिवसांपासून आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात आहे. मोईन शेख, सैयद असलीम सैयद अलीना (रा.कळंब), जयश्री राठोड (रा.कोसदनी), शे. सुफियाना शे. फारूख (रा.डेहनकर ले-आऊट) या मुलांच्या पालकांनाही बाल रोग विभागात अतिशय कटू अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.बाल रोग विभागात रुग्ण दाखल झाल्यानंतर तो स्वत:हून कसा पळून जाईल, अशी व्यवस्था येथील यंत्रणेकडून निर्माण करण्यात आली. अर्थात या विभागात काही कर्तव्यदक्ष व मनमिळाऊ डॉक्टर आणि नर्सचाही स्टाफ असल्याचे सांगण्यात आले. मात्र यांच्या मर्यादा येत असून कामचुकारांकडून सातत्याने हेळसांडच केली जाते. आर्थिक परिस्थिती नसल्याने शासकीय रुग्णालयात येण्याशिवाय पर्याय नाही. अनेक दाम्पत्य रोजमजुरी सोडून १०-१५ दिवसांपासून मुलाजवळ आहे. अशास्थितीत घरी असलेल्या मुलांचा उदरनिर्वाह आणि उपचारासाठीचा पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. येथे डॉक्टर उडवाउडवी करून केवळ वेळ मारून नेत असल्याचे सांगण्यात आले.शासकीय रुग्णालयात सहज दृष्टीपथास येईल असे फेरबदल प्रभारी अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी केले आहे. मात्र रुग्णालयातील अंतर्गत यंत्रणा अजूनही सुस्तावलेलीच आहे. वरकरणीचा भपकेबाजपणा कमी करून खºया अर्थाने रुग्णांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.