शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

‘मेडिकल’चा बालरुग्ण विभाग वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:26 IST

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागात मोठी अनागोंदी सुरू आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या भरवशावरच इथला कारभार आहे. त्यातही बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर येथे प्रामाणिकपणे सेवा देतात.

ठळक मुद्देअसभ्य वर्तणूक : बालमृत्यूचे प्रमाणही वाढले, कनिष्ठ डॉक्टरांवरच भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागात मोठी अनागोंदी सुरू आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या भरवशावरच इथला कारभार आहे. त्यातही बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर येथे प्रामाणिकपणे सेवा देतात. बाकीचे आलेल्या रुग्णांना असभ्य भाषेत बोलून येथून हुसकावून लावण्याचाच प्रयत्न करत आहे. यामुळे याठिकाणी बालमृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येते.बाल रुग्ण विभागात शनिवारी पहाटे अकबर वसीम खान (वय २ वर्षे) रा.नबाबपूरा कळंब चौक या बालकाचा मृत्यू झाला. हा बालक आठ दिवसांपासून येथे उपचार घेत होता. रात्री अचानक तो मोठ्याने खोकलायला लागला. मात्र यावेळी वॉर्डात कोणीच उपलब्ध नव्हते. धावपळ करून डॉक्टरांना बोलाविण्यात आले. इन्चार्ज नर्स खोली कुलुपबंद करून झोपी गेली. त्यामुळे काही वेळ आलेल्या डॉक्टरची तारांबळ झाली. शेवटी नर्सला उठवून चाबी घेत औषधांचा साठा असलेली खोली उघडण्यात आली. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या विभागात मागील काही दिवसांपासून अनागोंदी असून केवळ कनिष्ठ डॉक्टरांवरच उपचाराची यंत्रणा अवलंबून आहे. सलमा शेख (२०) रा.सावनेर ही महिला आपल्या मुलीला घेऊन शुक्रवारी रात्री ११ वाजता रुग्णालयात आली. बाल रुग्ण विभागात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने असभ्य शब्दांचा वापर करत एवढ्या रात्री कशाला आली म्हणून हेळसांड केली. ही आपबीती सलमा शेख या महिलेने सांगितली. याशिवाय अंकुश प्रभूसिंग पवार हा मागील ११ दिवसांपासून आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात आहे. मोईन शेख, सैयद असलीम सैयद अलीना (रा.कळंब), जयश्री राठोड (रा.कोसदनी), शे. सुफियाना शे. फारूख (रा.डेहनकर ले-आऊट) या मुलांच्या पालकांनाही बाल रोग विभागात अतिशय कटू अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.बाल रोग विभागात रुग्ण दाखल झाल्यानंतर तो स्वत:हून कसा पळून जाईल, अशी व्यवस्था येथील यंत्रणेकडून निर्माण करण्यात आली. अर्थात या विभागात काही कर्तव्यदक्ष व मनमिळाऊ डॉक्टर आणि नर्सचाही स्टाफ असल्याचे सांगण्यात आले. मात्र यांच्या मर्यादा येत असून कामचुकारांकडून सातत्याने हेळसांडच केली जाते. आर्थिक परिस्थिती नसल्याने शासकीय रुग्णालयात येण्याशिवाय पर्याय नाही. अनेक दाम्पत्य रोजमजुरी सोडून १०-१५ दिवसांपासून मुलाजवळ आहे. अशास्थितीत घरी असलेल्या मुलांचा उदरनिर्वाह आणि उपचारासाठीचा पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. येथे डॉक्टर उडवाउडवी करून केवळ वेळ मारून नेत असल्याचे सांगण्यात आले.शासकीय रुग्णालयात सहज दृष्टीपथास येईल असे फेरबदल प्रभारी अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी केले आहे. मात्र रुग्णालयातील अंतर्गत यंत्रणा अजूनही सुस्तावलेलीच आहे. वरकरणीचा भपकेबाजपणा कमी करून खºया अर्थाने रुग्णांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.