शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

दिग्रस तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:56 PM

तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेतकरी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दुष्काळी सवलती व मदत देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देदुष्काळी सवलती द्या : शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेतकरीमोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दुष्काळी सवलती व मदत देण्याची मागणी केली.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सर्व मोर्चेकरी एकत्रित आले. त्यानंतर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात झाली. शिवाजी चौक, शंकर टॉकिज चौक, दुगार्माता चौक, घंटीबाबा चौकमार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार किशोर बागडे यांच्यामार्फत मोर्चेकºयांनी शासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले. तत्पूर्वी चौकातचौकात फटाके फोडून मोर्चाचे स्वागत करण्यात आले.तहसील कार्यालय परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेला मानोरा येथील माजी आमदार अनंतकुमार पाटील, संजय देशमुख यांनी मार्गदर्शन केले. मोर्चेकऱ्यांनी निवेदनातून महाराष्ट्र शासनाने राज्यातील १८१ तालुक्यात दुष्काळ घोषित केला असून मदत व सवलतीत तफावत दिसत असल्याचा आरोप केला.या तफावतीमुळे तालुक्यातील शेतकरी बांधव विविध मदतीपासून वंचित राहण्याची स्थिती आहे. पीक पैसेवारी ४८ टक्के असूनही शासनामार्फत दिल्या जाणारे बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी १८ हजार व सहा हजार ८०० रुपयांच्या मदतीपासून शेतकरी बांधव वंचित राहणार आहे. हा अन्याय दूर करण्याची मागणी केली.तसेच तालुक्यातील शेतकरी पाल्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवसायिक आदी शैक्षणिक शुल्कात शुल्क माफी द्यावी, अशी मागणी केली. मोर्चात पंचायत समिती सदस्य अरविंद गादेवार, जावेद पटेल, जावेद पहेलवान, सै.अक्रम, रवींद्र अरगडे, दीपक वानखडे, साहेबराव पाटील, डॉ.प्रदीप मेहता, रामकृष्ण इंगोले, रमेश गाडे, दीपक कोठारी, सुदाम राठोडसह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या मोर्चाने दिग्रसकर नागरिकांचे लक्ष वेधले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाFarmerशेतकरी